सामना ऍलर्जीचा

जगभरातल्या माणसांना विविध पदार्थांची ऍलर्जी असते. मासे, गाईचं दूध, अंडी आणि शेंगदाण्याची ऍलर्जी असणार्‍यांची संख्या बरीच जास्त आहे. शेंगदाण्याची ऍलर्जी असेल तर ऍनाफिलॅक्सिस नावाचा विकार होऊ शकतो. हा गंभीर स्वरूपाचा विकार आहे. यामुळे रूग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. 20 पैकी एका मुलाला तर 50 पैकी एका प्रौढाला अन्नपदार्थांची ऍलर्जी होण्याची शक्यता असते. त्यात दाण्याची ऍलर्जी असणार्‍यांची संख्या जास्त असते. पण यावरचा उपाय शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे. या विकारावर दीर्घकालीन उपचारांचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. हा विकार पूर्णपणे बरा होण्यासाठीचं औषधही लवकरच शोधलं जाईल, अशी आशा यामुळे निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये हे संशोधन करण्यात आलं. या प्रयोगासाठी दाण्याची ऍलर्जी असलेल्या मुलांना प्रोबायोटिक तसंच पीनट प्रोटिनचा डोस देण्यात आला. साधारण 18 महिन्यांपर्यंत हा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगाच्या अंती 80 टक्के मुलं दाण्यांचं सेवन करू शकली. शास्त्रज्ञांच्या दृष्टीने हा मैलाचा दगड मानला जात आहे.

पोषक आहार महत्त्वाचा

दैनंदिन जीवनात आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवं. सकाळी गरम पाण्यात लिंबू आणि मध घालून प्या तसंच उकडलेल्या किंवा परतलेल्या भाज्या खा. दिवसभरात दोन ते तीन कप ग्रीन टी प्या. भरपूर पाणी प्या. आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. नियमित व्यायाम करा. ताजी फळं, भाज्या खा. फळांचे रस घ्या. चहा- कॉफीचं प्रमाण कमी करा. नारळपाणी, लिंबू पाणी प्या. मिठाचं प्रमााण कमी करा. आहारात पापड, लोणची घेऊ नका. तेलकट पदार्थांना फाटा द्या. शांत झोप घ्या. पुरेशा झोपेमुळे तुम्ही ताजेतवाने होऊ शकता. उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. या काळात पाणी भरपूर पिणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीराची ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत होते.

लहान मुलांमधील स्थूलता

देशभरात लहानग्यांमधील स्थूलतेत प्रचंड वाढ झाली आहे. स्थूलपणा भविष्यात अनेक विकारांना निमंत्रण देतो. विशेषत: शहरी भागातील मुलांमध्ये स्थूलपणा वाढताना दिसतोय. भविष्याच्या दृष्टीनं ही फार गंभीर समस्या आहे. म्हणूनच याकडे वेळेत लक्ष देऊन लहानग्यांच्या स्थूलतेवर उपाययोजना करणं गरजेचं आहे. याबाबत जाणून घेऊ या…

मूल स्थूल आहे हेच आपण स्वीकारत नाही. आपलं मूल बारीकसं असणं आई-वडिलांनाच आवडत नाही. त्यामुळे मुलांच्या स्थूलतेकडे फारसं लक्षही दिलं जात नाही. लहान मुलांमधील स्थूलतेकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर त्यांना भविष्यात मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, आर्थ्रायटिस असे घातक विकार जडू शकतात, असा इशारा तज्ज्ञ मंडळी देतात.

बिस्किटं, चॉकलेट्स, हवाबंद पदार्थांचा भरणा आपल्याकडे असतो. झटपट होणारे ‘रेडी टू इट’ पदार्थ मुलांना दिले जातात. पिझ्झा, बर्गर अशा फास्टफूडच्या अतिरेकामुळे लहानग्यांमध्ये ही समस्या वाढताना दिसतेय. मुलांच्या आहारात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करायला हवा.

स्मार्टफोन, संगणकाचा वापर वाढलाय. अभ्यासाच्या प्रचंड ताणामुळं मुलं मैदानी खेळ कमी खेळतात. घरात बसून टिव्ही बघणं किंवा पीसीवर गेम्स खेळण्यावर त्यांचा भर असतो. जास्त कॅलरीयुक्त भोजन आणि कमी हालचाल यामुळे मुलांमध्ये स्थूलता वाढतेय. त्यामुळे मुलांना मैदानी खेळ खेळायला पाठवायला हवं.

लहान मुलं चॅट करता करता किंवा टीव्ही बघत जेवतात. यामुळे गरजेपेक्षा जास्त अन्न पोटात जातं. मुलांनी खाण्याकडे जास्त लक्ष द्यायला हवं. याची काळजी पालकांनीच घ्यायला हवी.

थायरॉइडमुळेही मुलांमध्ये स्थूलपणाची समस्या उद्भवते. याची चाचणी करून घ्यायला हवी. पालकांनी स्वत:मध्ये काही बदल करून घ्यायला हवेत. मुलांना व्यायाम करायला प्रोत्साहन द्यायला हवं. मुलांना बागेत नेऊन तिथे खेळू द्यायला हवं. यामुळे स्थूलपणाची समस्या दूर होऊ शकेल.

आरोग्यदायी चणे

चणे अत्यंत आरोग्यदायी मानले जातात. कर्बोदकं, प्रथिनं, तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर, कॅल्शियम आणि लोह हे घटक मुबलक प्रमाणात असतात. रोज रात्री 50 ग्रॅम चणे भिजवून दुसर्‍या दिवशी सकाळी खाल्यानं आरोग्यविषयक अनेक लाभ होतात. चण्यांमुळे होणार्‍या आरोग्यविषयक लाभांबद्दल जाणून घेऊ.

चण्यांमध्ये प्रथिनं भरपूर प्रमाणात असल्यानं भूक लवकर लागत नाही. यामुळे वजन नियंत्रणात ठेवायला तसंच कमी करायला मदत होते.

चण्यांमधला ग्लायसेमिक इंडेक्स बराच कमी असतो. तसंच यातल्या फायबर आणि प्रथिनांमुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहायला मदत होते.

चण्यांमध्ये लोहाचं मुबलक प्रमाण असल्यानं ऍनिमिया असलल्यांसाठी ते लाभदायक ठरतात.

यात अल्फा लिनोलेनिक आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात. यामुळे शरीरातलं कोलेस्ट्रॉल कमी होण्यासोबतच हृदयविकारापासून बचाव होतो.

कमी झोपेची समस्या असणार्‍यांनी चणे खावेत. यात अमिनो ऍसिड, ट्रायप्टोफॅन आणि सेरोटोनिन हे घटक असतात. यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते.

चण्यांमध्ये कॅल्शियमचं प्रमाणही मुबलक असतं. यामुळे हाडं बळकट होतात.

चण्यांमधील फॉस्फसरमुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि किडनीतलं अतिरिक्त मीठ बाहेर पडण्यास मदत होते.

चणे खाल्ल्याने ताणतणाव दूर व्हायला मदत होते.

चण्यातील पोषक घटकांमुळे अशक्तपणा दूर होतो. चण्यातील फॉस्फरस, मँगनीजसारख्या खनिजांमुळे त्वचाविकार दूर होतात.

जागतिक किडनी दिनानिमित्तानं…

किडनी हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव. शरीरातील विषारी घटक मूत्रमार्गे बाहेर टाकणं हे किडनीचं प्रमुख कार्य मानलं जातं. या कार्यात अडथळे आले तर अनेक विकारांना निमंत्रण मिळू शकतं. किडनीचं कार्य बंद पडलं तर डायलिसिसला पर्याय नसतो. किडनीच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी 2006 पासून मार्च महिन्याच्या दुसर्‍या गुरूवारी जागतिक किडनी दिन पाळला जातो. यंदा 10 मार्च हा दिवस जागतिक किडनी दिन म्हणून पाळला जाणार आहे. किडनीचं आरोग्य आणि किडनी विकारांबाबत जागरूकता निर्माण करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. आपल्या सर्वांगिण आरोग्याच्या दृष्टीनं किडनी या अवयवाचं असलेलं महत्त्व या निमित्तानं अधोरेखित केलं जातं. दरवर्षी एक थीम घेऊन हा दिवस साजरा केला जातो. यंदा लहान मुलांमधील किडनी विकार ही थीम असून त्यात किडनी विकाराच्या प्रतिबंधावर भर देण्यात येणार आहे. वेळीच उपाय योजले तर मुलांमधील किडनी विकारांनाप्रतिबंध करता येतो, असा संदेश या माध्यमातून देण्यात येणार आहे.

किडनी हा शरीरातील अत्यंत गुंतागुंतीचा पण उपयुक्त असा अवयव आहे. आपल्या रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्याचं तसंच लाल रक्तपेशींची निर्मिती करण्याचं आणि हाडांचं आरोग्य राखण्याचं काम किडनी करत असते. यासोबत सोडियम, पोटॅशियमसारख्या खनिजांची पातळी नियंत्रणात राखण्याचं कार्यही किडनी करते. रक्तातलं आम्लाचं प्रमाण नियंत्रणात ठेवलं जातं. मूत्राची निर्मितीही किडनीमुळे होते. अशा अत्यंत महत्त्वाच्या अवयवाची काळजी घ्यायला हवी. भारतातील आकडेवारीवर नजर टाकली तर किडनी विकारांचं गांभीर्य लक्षात येईल. प्रत्येक एक लाख लोकसंख्येपैकी 100 जणांना किडनीशी संबंधित विकार होतात. देशात वर्षाला 90,000 किडनी प्रत्यारोपणांची तर महाराष्ट्रात वर्षाला दहा हजार किडनी प्रत्यारोपणाची गरज असते. डायलिसिसची गरज असणार्‍या रूग्णांपैकी फक्त 22.5 टक्के रूग्णांना उपचार मिळतात. तर फक्त 2.5 टक्के लोकांमध्ये किडनी प्रत्यारोपण केलं जातं. लहान मुलांमध्येही किडनी विकारांचं प्रमाण बरंच जास्त आहे. जीवनशैलीतील बदलांमुळे किडनी विकारांचं प्रमाण वाढताना दिसतंय. धूम्रपान किडनीचा मुख्य शत्रू आहे. धूम्रपानामुळे किडनी विकार होण्याची शक्यता 50 टक्क्यांनी वाढते. जुनाट किडनी विकार बरे होत नाहीत. त्यावर दीर्घकालीन उपचार घ्यावे लागतात. धूम्रपानामुळे किडनीला होणार्‍या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे त्यांचं कार्य मंदगतीनं होतं. भारतात कॅन्सर आणि हृदयाशी संबंधित विकारांनंतर किडनीविकार सर्वात घातक मानले जातात. किडनीशी संबंधित विकार हे भारतातील मृत्यूंमागचं तिसरं सर्वात प्रमुख कारण आहे. त्यामुळे धूम्रपान सोडणं, आरोग्यदायी पदार्थांचं सेवन, भरपूर पाणी पिणं आणि वेळोवेळी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी या मार्गांनी किडनी विकारांना आळा घालता येऊ शकतो.

आरोग्यदायी उन्हाळ्यासाठी…

प्रत्येक पदार्थाचं स्वत:चे असे गुणविशेष असतात. या गुणविशेषानुसार आहारात त्या त्या पदार्थांचा आहारातील समावेश नेमका कधी करायचा हे ठरत असतं. हिवाळ्यात शरीराला उष्णता देणारे तिळासारखे पदार्थ आपण खाल्ले. आता उन्हाळ्यात काही पदार्थांचा आहारात समावेशं आत्यंतिक गरजेचा आहे. दुसरीकडे काही पदार्थांना आहारातून हद्दपार करायला हवं. आरोग्यदायी उन्हाळ्यासाठी कसा असावा आहारविहार? जाणून घेऊ.

उन्हाळा आरोग्यदायी ठरण्यासाठी रसाळ फळं, ताज्या भाज्या, सॅलेड यांना आहारात वरचं स्थान असायला हवं. या दिवसात डिहायड्रेशनची समस्या डोकं वर काढते. त्यामुळे शरीरात भरपूर पाणी राहणं गरजेचं आहे. त्यामुळे कलिंगड, टरबुज यासारखी रसाळ फळं आणि टॉमेटो, काकडीसारख्या थंडावा देणार्‍या फळभाज्या यांचा समावेश आहारात करा.

कोकम सरबत आणून ठेवा. नारळ पाणी, लिंबू पाणी पित राहा. ताक, फळांचे रस, शोरबा अशा द्रवपदार्थांचं सेवन करा. यामुळे शरीरातील इलेक्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात राहून तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळू शकेल. तसंच पोषक घटकही भरपूर मिळतील.

दिवसाला 10 ते 12 ग्लास पाणी प्या. सोबतच पोषक घटकही मिळवा. स्ट्रॉबेरी, किवी किंवा अगदी बासिलचा समावेश आहारात करा. ? हिरव्या पालेभाज्या खा. पालेभाज्या पोषक गुणांची खाण मानली जातात. यात कॅन्सरविरोधी घटक असतात. रक्तातलं कोलेस्ट्रॉल कमी करण्याची क्षमता यात असते.

थंड सूप्स घ्या. काकडी, टॉमेटो, पालक यांचं सूप आहारात घेता येईल. आईस टी, आईस कॉफीचा पर्यायही आहे. पण हे पर्याय दैनंदिन आहारात नको.

अतिरिक्त प्रथिनं या दिवसात टाळायला हवीत. प्रथिनं पचायला बरीच जड असतात. त्यामुळे प्रथिनयुक्त आहार घेतल्यानं मळमळणं, निरूत्साही वाटणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात. तुमचं वजन 57-58 किलो असेल तर आहारात प्रथिनांचं प्रमाण 57-58 ग्रॅमपेक्षा कमी असणं चांगलं.

 

साहित्य सहवास – ‘ऊन…’

0

हिवाळ्यात तो पहाटे उठला. खरं तर थंडीमुळे त्याला काहीही करणं अशक्य वाटु लागलं. वेळ पुढे-पुढे जाऊ लागली. कोवळ्या उन्हात बसला. छान वाटलं. आणखी थोड्या वेळाने ऊन खूपच छान वाटलं. दिवसभर याच उन्हात बसुन रहावसं त्याला वाटलं. मे महिन्यात सकाळी दहा वाजेनंतरचं ऊन त्याला चटके देऊ लागलं. दुपारी बारा वाजेनंतरचं ऊन त्याला विस्तवासारखं जाणवलं. उगवणारा सूर्य संध्याकाळी मावळतो. उन्हाचंही लहानपण, तरुणपण, म्हातारपण असतंच. हिवाळ्यात हवहवसं वाटणारं ऊन, उन्हाळ्यात नको वाटतं. भर उन्हात काम करणार्‍या व्यक्ती पाहिल्या की आपल्याला निश्चितच वाईट वाटतं. उन्हाळ्यात कोकम सरबत, ऊसाचा रस, लस्सी, आईस्क्रिम, थंडगार ताक, फ्रिजमधलं पाणी आपल्याला अत्यावश्यक वाटतं. एखादी व्यक्ती म्हणते की त्या दिवशी ऊन ’मी’ म्हणत होतं. अर्थात हा मी, त्याच्या स्वतः बद्दलचा नाहीय तर ’कडक ऊन’ अशा अर्थाचा आहे. दूसरी एखादी व्यक्ती म्हणतेच ना की तो अमुक ऊन स्वभावाचा आहे. एखादी आई आपल्या लेकराला, भाकरी करतांना म्हणते की भाकरी ऊन आहे, घे जेऊन लगेच. उन्हाळ्यातील कडक उन्हाचा आपण धिक्कार करतो पण हेच कडक ऊन हवं असतंच ना कपडे वाळण्यासाठी, उन्हाळ्यातील शेवाया, पापड, कुरड्यासाठी. कडक उन्हामुळे पाण्याची वाफ होऊन वर जाते. वाफेचं रुपांतर ढगात होतं. ढगांतुन पाऊस पडतो. कोवळं ऊन जेवढं गरजेचं आहे तेवढंच ’मी’ म्हणणारं ऊनसुध्दा गरजेचं आहे. ’ऊन स्वभावाचा’ म्हणजेच रागीट स्वभावाचा.

आपल्या मनातही ऊन असतंचना ? छे! शक्य नाही. मनात ऊन असुच शकत नाही. ऊन तर बाहेर असतं. दोघांचा वाद सुरु होतो. मुद्यावरचं भांडण गुद्यावर येतं. एकमेकांना शिव्या, अपशब्दांची लाखोली वाहिली जाते. हा व्देष, ही नकारात्मकता, हे वाईट शब्द म्हणजे सुध्दा ऊनच. मे महिन्यातल्या कडक उन्हाचा धिक्कार करुन, व्देष- तिरस्कार करुन काहीही साध्य होणार नाही. ऊन स्वभावाचा अर्थात रागीट स्वभावाचा काहीही फायदा होत नसतो. कोवळं ऊन हवहवसं वाटतं कारण ड जीवनसत्व कोवळ्या उन्हातुन मिळतं. तसं सकारात्मक विचारांचं कोवळं ऊन आपल्याला अधिकाधिक चांगल्या प्रकारे घडवतं, वाढवतं. उन्हाळ्यातलं अगदीच सकाळचं ऊन, दुपारचं ऊन, संध्याकाळचं ऊन या प्रत्येक ऊन्हाची स्वतःची अशी ओळख आहे, अर्थ आहे. ऊन स्वभावाचे होत जाऊ तर माणसं आपल्यापासून दुरावतील. माणसं दुरावली की आपली प्रगती थांबणार. सहवासातल्या मित्राचा, परिचिताचा, नातेवाईकाचा ऊन स्वभाव असेल तर त्याला, ऊन स्वभावाचे तोटे लक्षात आणुन दिले पाहिजे. माझ्याकडुन होणार्‍या कृतीमुळं अनेकांचं नुकसान होणार असेल तर ते ’मी म्हणणारं ऊन’ असेल. वेगवेगळ्या प्रकारचं ऊन, सजीवांच्या वाढीसाठी देणार्‍या सूर्यदेवाचे ऋण व्यक्त करुया. फक्त एकदाच प्रश्न विचारा – ’ऊन नसतं तर ?’ ह्या एकाच प्रश्नामुळे, अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील. कोवळं ऊन अर्थात नम्रपणा हा स्वप्रगतीसाठी फारच आवश्यक आहे. ऊन नसतंच तर पाण्याची वाफ झाली नसती, मग पाऊस पडला नसता. पाऊस पडला नसता तर पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असता. धान्य, भाजीपाला शेतात पिकलाच नसता. ऊन म्हणजेही निसर्गच. वर्षानुवर्षे सजीवांना ऊन देणार्‍या सूर्य देवाच्या ऋणात राहुया.

सुनील राऊत

माळीगल्ली, भिंगार,अ नगर., मो.9822758383

आंतरिक बल (भाग – 1)-मन एक रेडीयो स्टेशन है

के मन को जलाती है। जलने से बदबू निकलती है। फूलों को महक को देती है। गुस्सा करने से ऑक्सीजन की कमी पड़ जाती है यही कारण है कि गुस्से को कम करने के लिये ठंडा पानी पीना एक पुरानी तरकीब है, जो कारगर है, क्योंकि पानी पीने से ऑक्सीजन की कम पूरी हो जाती है। इसे एक बार जरूर अजमा कर देखें। इसके अलावा सकारात्मक विचारों की अपनाकर आप बहुत आसानी से मन को शांत रख सकते हैं। यही नियम और यही विधि से रत, अपमान, निंदा-चुगली आदि विचारों पर भी विजय पा सकते हैं। ये आदतें ये वृत्तियां हो असल में कर्म का फल है। हमें बाजार से कोई भी चीज खरीदनी हो तो हमें उसका सैंपल दिखाया जाता है। ऐसे ही हम कोई भी संकल्प करते हैं तो उसका परिणाम क्या होगा उसका सैंपल हमें संकल्प करते ही महसूस होता है। अगर किसी के लिये बुरा सोचते हैं तो कुदरत फल के रूप में टेस्ट करने के लिये सैंपल देती है। यह सैंपल है अच्छा न लगना। हमें बुरा-बुरा लगना। सोचो सैंपल ही इतना कड़वा है तो फल कैसा होगा। कितना कड़वा होगा। इस संकेत को समझकर योग्य कर्म करें। कुदरत का संकेत हर कर्म में मिलता रहता है। उसको समझ कर श्रेष्ठ कार्य करो। अगर किसी को गलत राय देते हैं तो आपको बेचैनी होने लगती है। आपकी राय मानकर उसने जो गलत कार्य किया उसका हिस्सा आपको भी मिलेगा। आप किसी से ईर्ष्या करते हैं तो उस समय मन में जलन की महसूसता होती है। भविष्य में इसका फल आप बहुत सारे व्यक्ति आपसे नफरत करेंगे।

(प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालय)

अंतरीय अंतरिक्ष के अचरज-अमरत्व का विज्ञान

बढ़ते हैं, तो हमारी आँखों में आँसू आते तो हैं, मगर आँख से टपकते नहीं। अंग्रेजी के प्रसिद्ध कवि, पर्सी बाइश शैले कहा है, हमारे सबसे मीठे गीत वो होते हैं, जिनमें दुःख और बेचैनी की चर्चा की गयी हो। वे सीधे हमारे दिलों की गहराइयों और आत्मा की गहराइयों से निकलते हैं और जो उन्हें सुनते हैं, उनको द्रवित कर जाते हैं। हमारी पीड़ा और वेदना ऐसी होती है कि हम सो भी नहीं पाते। जैसा कि मैंने एक शे’र में कहा ए जाने ख्वाब, तेरे शबिस्ताने ख्वाब से । जो भी गया, वो दीदा-ए-बेख्वाब ले गया । ओ मेरे सपनों की जान, ऐ मेरे प्रियतम, जो भी आपके असंख्य दर्पणों वाले शयन कक्ष में गया, उसकी आँखों से नींद सदा के लिए उड़ गयी। मेरा एक और शेर है : दिल से निकल के हर सदा, क्यों न दिलों में डूब जाय। साज़ मेरा लतीफ है नग़मा तेरा लतीफतर ॥ यह शेर उस समय लिखा गया था, जब मैं अचानक ही एक कवि के रूप में प्रसिद्ध हो गया। यह सब इतने थोड़े से समय में हुआ, कि मेरे साहित्यिक मित्र भी हैरान रह गये। कई मित्रों ने पूछा कि कैसे मैं इतनी जल्दी मशहूर हो गया। यह शेर उसका जवाब था । मेरी सफलता का रहस्य मेरे साज़, अर्थात मेरी शायरी में नहीं मिलेगा। इसका राज मेरी शैली, लय, अनुप्रास, या मेरे शेरों की अन्य खूबियों में भी नहीं हैं।

(कृपाल आश्रम, अहमदनगर)

लोभाचे फळ

अकबराने कोणताही अवघड किंवा गुढ प्रश्न विचारावा आणि बिरबलाने आपल्या बुद्धिचातुर्याने उत्तर द्यावे असे नेहमी घडत असे. बिरबलही प्रत्यक्ष उदाहरणातून असे उत्तर देत असे की बादशहा अकबरासह दरबारातील सर्व मानकरी आश्चर्यचकित होत असत. एकदा अकबराने बिरबलाला विचारले की, ’राजउद्यानातील कोणीही पाहिलेली नाही अशी आश्चर्यकारक गोष्ट तू मला दाखवू शकशील का? त्यावर बिरबलाने तात्काळ ‘हो’ ’म्हटले. त्यासाठी बिरबलाने राजमहालातून भरपूर मध मागवून घेतलं. त्या शाही उद्यानात वातमृग येत असे. हा अतिशय दुर्मीळ आणि मानवाची चाहूल लागताच क्षणात पळून जाऊन दिसेनासा होणार प्राणी, बिरबलाने आणलेला सर्व मध त्या उद्यानातील गवतावर पसरवून टाकला.

थोड्यावेळाने वातमृग आला. खाता खाता त्याला गवत गोड लागल्याने तो गवत खाण्यात गुंगू होऊन गेला. वातमृगाने तेथील सारे गवत खाऊन संपविले, तेव्हा बिरबलाने आपल्या जवळील मधमिश्रित थोडे थोडे गवत त्याच्यासमोर टाकत टाकत त्याला राजवाण्यात गवत खाण्यात गुंगलेला वातमृग राजवाड्यात आला. बिरबल म्हणाला, महाराज, हे पाहा उद्यानातील वेगळे आश्चर्य, जो वातमृग माणसाची चाहूल लागताच क्षणात दिसेनासा होतो तो आज भर दरबारात आला आहे. राजाने आपल्या प्राणीसंग्रहालयाचे वैभव वाढविण्यासाठी लगेच त्या वातमृगाला आपल्या प्राणी संग्रहालयात दाखल केले. आणि वातमृग कैद झाले.

तात्पर्य – लोभ आवरता आला नाही की घात हा ठरलेलाच असतो.