प्रसूतिपश्‍चात नैराश्यावर करा मात…

‘स्लमडॉग मिलियनेअर‘ अभिनेत्री फ्रीडा पिंटो सध्या मातृत्वाचा अनुभव घेत आहे. तिचा मुलगा दोन वर्षांचा आहे. हॉलिवूड अभिनेत्री प्रसूतिनंतरच्या काळाबद्दल मोकळेपणाने बोलते. एका मुलाखतीत तिने सांगितले की, मुलगा झाल्यानंतर तीन महिने ती खूप घाबरली होती. तिला उदास वाटत होते. यातून बाहेर पडण्यासाठी आपण एका थेरपिस्टची मदत घेतली असे तिने एका मुलाखतीत सांगितले. बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डीसोबतही असेच घडले. तिने पहिले मूल झाल्यानंतर आलेल्या मानसिक अस्थिरतेबद्दल सांगितले. तिच्या संसारिक आयुष्यावर याचा मोठा परिणाम झाला. ‘जागतिक आरोग्य संघटने‘च्या मते 22 टक्के स्त्रिया प्रसूतिनंतर नैराश्याने त्रस्त असतात. आई होणे ही सर्वात चांगली भावना असली तरी बाळाला जन्म दिल्यानंतरच्या काळात चिंता आणि दुःख वाटणे ही एक वेगळी समस्या आहे. महिलांना अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रसूतिपश्‍चात उदासीनता जाणवणे ही एक मानसिक समस्या आहे. यामुळे तुमचे विचार, भावना किंवा कृती यावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच ही एक गंभीर समस्या मानली जाते. गर्भधारणेपासून प्रसूतिपर्यंतचा आव्हानात्मक काळ हे पोस्ट डिप्रेशनचे कारण असू शकते.

गर्भधारणा झाल्यावर महिलांमध्ये मानसिक आणि भावनिकदृष्ट्या अनेक बदल होतात. प्रामुख्याने हॉर्मोनल बदलांमुळे ही समस्या उद्भवू शकते. गर्भधारणेदरम्यान इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन्स वाढू लागतात. इतकेच नाही, तर या दरम्यान थायरॉइड कमी होण्यास सुरुवात होते. यामुळे नीट झोप येत नाही. प्रेग्नन्सीदरम्यान वाढलेले वजन आणि नवजात बाळाची काळजी ही प्रसूतिपश्‍चात आलेल्या नैराश्याची प्रमुख कारणे असू शकतात. प्रत्येक स्त्रीमध्ये याची वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. भूक न लागणे, दिवसभर उदास राहणे, सतत चिंता वाटणे आणि विनाकारण रडू येणे, झोपेची कमतरता, थकवा, अशक्तपणा जाणवणे यातील कोणतेही लक्षण आढळते. कोणत्याच कामात रस नसणे, सतत चिडचिड होणे, राग येणे हीसुद्धा लक्षणे अनेक महिलांमध्ये दिसून येतात. प्रसूतिनंतर आलेल्या नैराश्यावर काय उपचार करायचा हे लक्षणांवर अवलंबून असते. यासाठी डॉक्टर कधी औषधे तर कधी समुपदेशनाचा सल्ला देतात. नैराश्य टाळण्यासाठी महिलांनी प्रसूतीनंतर जीवनशैलीत बदल करावा, दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढावा, योगासने आणि व्यायाम करावा. तणावग्रस्त वातावरणातून ब्रेक घ्यावा, पोषक पदार्थांचे सेवन करावे तसेच जीवनातील बदल स्वीकारावा आणि काही समस्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर कराव्यात असा सल्ला दिला जातो. तसंच आपल्या आणि बाळाच्या आनंदासाठी आणि आरोग्यासाठी आपणच जबाबदार आहोत हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.

फळांवर मीठ टाकताय? सावधान!

फळे खाल्ल्याने शरीराला खूप फायदा होतो. शरीराला जीवनसत्त्वे, लोह आणि फायबरसारखी पोषक तत्त्वे मिळतात. एवढेच नाही, तर रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. त्याच वेळी ते चयापचय देखील मजबूत करते; मात्र फळांच्या सॅलेडमध्ये किंवा फळांसोबत मीठ खाण्याचीसवय असेल तर लगेच बंद करा. मीठ किंवा चाट मसाला घालून फळे खाणे चवीसाठी उत्तम असले तरी शरीरासाठी हानिकारक असते. मीठ टाकून खाल्ल्याने फळांमधील मूळ पोषक घटक नष्ट होतात. फळांवर मीठ टाकताच पाणी बाहेर पडू लागते. त्यामुळे फळांचे पोषण कमी होते. असे वारंवार केल्याने किडनीच्या आजारची शक्यता उद्भवते. फळांमध्ये मीठ मिसळल्याने त्वचेच्या ऍलर्जीची शिकार होऊ शकता. शरीराला सूज येऊ शकते. उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास फळे आणि मीठ मिसळून खाण्याची चूक करू नये. अशाने रक्तदाब वाढू शकतो. हृदयरुग्णांनीही फळांसोबत मीठ खाऊ नये. महत्त्वाचे म्हणजे, एका वेळी एकच फळ खावे. फ्रूट चाट खायला आवडत असेल तर फक्त गोड किंवा आंबट फळांची कोशिंबीर करावी. आंबट आणि गोड फळे एकत्र खाऊ नयेत. फळे कापल्यानंतर तासाभराच्या आत खावीत.

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये कोट्यवधींनी वाढ!

आजघडीला भारतात मधुमेहाचे दहा कोटीहून अधिक रुग्ण आहेत. 2019 मध्ये ही संख्या सात कोटी होती. म्हणजेच, केवळ चार वर्षांमध्ये चार कोटी नागरिकांना मधुमेहाची लागण झाली आहे. टक्केवारीनुसार ही वाढ 44 टक्के आहे. अधिक धक्कादायक म्हणजे सुमारे साडेतेरा कोटी नागरिक प्री-डायबेटिक आहेत. म्हणजेच, त्यातील एक तृतीयांश नागरिकांना कधीही मधुमेह होऊ शकतो. ही आकडेवारी ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ ने ब्रिटनच्या ‘लॅन्सेट’ या प्रतिष्ठित वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित केली आहे. गोवा, पुदुच्चेरी आणि केरळ या राज्यांमध्ये मधुमेहाचे प्रमाण सर्वाधिक आहे. उत्तर प्रदेशमध्ये एका मधुमेह रुग्णामागे चार ‘प्री-डायबेटिक’ केसेस आहेत, अशी माहितीही ‘लॅन्सेट’मध्ये देण्यात आली. लठ्ठपणा, संथ जीवनशैली आणि कौटुंबिक इतिहास ही मधुमेहाची तीन प्रमुख कारणे आहेत. ‘आयसीएमआर’च्या अहवालानुसार, भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दहा कोटींहून अधिक आहे. 2019 मध्ये ही संख्या सात कोटी इतकी होती. काही विकसित राज्यांमध्ये ही संख्या स्थिर होत आहे; मात्र इतर अनेक राज्यांमध्ये मोठी वाढ दिसत आहे.

देशातील किमान 13.6 कोटी नागरिक प्री-डायबेटिक आहेत, असे अभ्यासात दिसून आले. गोव्यामध्ये 26.4 टक्के, पुदुच्चेरीमध्ये 26.3 टक्के आणि केरळमध्ये 25.5 टक्के इतका मधुमेहाचा प्रसार दिसून आला. येत्या काही वर्षांमध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि अरुणाचल प्रदेश यासारख्या राज्यांमधील रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा या अहवालात देण्यात आला. गोवा, केरळ, तामिळनाडू आणि चंदीगडमध्ये मधुमेहाच्या रुग्णांपेक्षा प्री-डायबेटिक रुग्ण कमी असल्याचे ‘मद्रास डायबेटिक रिसर्च फाऊंडेशन’चे अध्यक्ष आणि अहवालाचे पहिले लेखक डॉ. रणजित मोहन अंजना यासंदर्भात बोलताना म्हणाले. पुद्दुचेरी आणि दिल्लीमध्ये हे प्रमाण बर्‍यापैकी समान आहे. यानुसार तेथील रुग्णांची संख्या स्थिर होत आहे, असे म्हणता येईल. परंतु शास्त्रज्ञांनी मधुमेहाचे मोजके रुग्ण असलेल्या राज्यांमध्ये प्री-डायबेटिक लोकांची संख्या जास्त असल्याचे नोंदवले आहे.

तरुण वयात हाडे ठिसूळ…

वाढत्या वयानुसार हाडे ठिसूळ व्हायला सुरूवात होते. हे नैसर्गिक असले तरी सध्या तरुणाईमध्ये हाडांची समस्या दिसून येत आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. काही वर्षांपूर्वी फक्त वयस्कर व्यक्तींम ध्येच हाडांशी संबंधित आजार आढळून येत होते; परंतु हल्ली तरुणांनाही याचा सामना करावा लागत आहे. अचानक बसून उठता हाडांचा कट-कट असा आवाज येतो. आपल्यातील बरेचजण याकडे दुर्लक्ष करतात. मात्र यामुळे गंभीर समस्येला सामोरे जावे लागू शकते. बेथनी इस्ट्न या महिलेच्या बाबतीत अशीच एक घटना घडली. टॉयलेट सीटवर बसल्यावर तिच्या गुडघ्याची हाडे मोडल्याची घटना समोर आली. ही महिला इंग्लंडची रहिवासी असून गुडघ्याच्या ट्युमरशी झुंजत आहे. पायर्‍या चढून खोलीत जाताना अचानक तिच्या उजव्या पायात त्रास सुरू झाला. यामुळे ती थोडा वेळ थांबली आणि टॉयलेट सीटवर बसली. बसताना तिला गुडघ्याची हाडे मोडल्याचा आवाज आला. तेव्हा तिला प्रचंड वेदना जाणवल्या. बेथनीला जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी गुडघ्याचा ट्युमर असल्याचे समोर आले. तिच्या गुडघ्याची मऊशार गादी कमकुवत झाली आहे. डॉक्टरांना ट्युमरमुळे गुडघा आणि जांघेतील हाडं बदलावी लागली.

हा आजार झालेले 99 टक्के रुग्ण ऑपरेशननंतर पूर्णत: चालू-फिरू शकत नाहीत. यासाठी त्यांना नव्याने चालायला शिकावं लागेल. तसंच रुग्ण कधीही उंच टाचेचे सँडल घालू शकत नाहीत, असे बेथनीने सांगितले. आपल्याला ऑपरेशननंतर चालण्यात यश आल्याचेही तिने सांगितले. आता बेथनी या आजारासंबंधी जनजागृती करते. तीव्र वेदना जाणवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाह- नही तिने केले आहे. अमेरिकेतील ‘जॉन हॉपकिन्स मेडिसीन’च्या म्हणण्यानुसार, हा मोठ्या पेशींच्या ट्युमरमधील दुर्मिळ आणि धोकादायक आजार आहे. या प्रकारचा ट्युमर दोन हाडांच्या सांध्यांमध्ये वाढतो. हा ट्युमर फक्त गुडघेच नाही, तर डोळे, हात आणि पाय येथील हाडांमध्येही वाढताना दिसतो.

दातदुखीची विविध कारणं

अनेकांना दातदुखीचा त्रास होतो. कॅव्हिटीमुळे दातदुखीची समस्या निर्माण होते हे खरं असलं तरी यामागे इतर काही कारणंही असू शकतात.

दातांमध्ये टोचल्यासारखं दुखत असेल आणि काही खाल्ल्यावर किंवा चावल्यावर वेदनांमध्ये वाढ होत असेल तर हे जंतूसंसर्गाचं किंवा दात तुटल्याचं लक्षण असू शकतं. अशा वेळी तातडीने दंततज्ज्ञांना भेटायला हवं. दातांच्या वेदनेचं कारण शोधून काढण्यासाठी क्ष-किरण चाचणी केली जाते.

दातांच्या आरोग्याशी संबंधित नसणार्‍या काही कारणांमुळेही दातदुखी निर्माण होऊ शकते. सायनससारख्या त्रासामुळे दात दुखू शकतात.

संवेदनशीलता हे दातांच्या वेदनेचं एक कारण असू शकतं. गोड किंवा थंड पदार्थ खाल्ल्यावर दातांमध्ये झिणझिण्या आल्यासारखं वाटत असेल तर तुमचे दात संवेदनशील झाले आहेत असं समजावं.

आरोग्य सखी स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र चाळीशीनंतरही टिकवा तारुण्य

0

तर फ्रेंक्चर भरून येण्यास वेळ लागतो. कधी-कधी कायमचे अपंगत्व येते. चाळिशीनंतर डोळ्यांना चष्मा लागला तर चष्म्याचा वापर न चुकता करावा. म्हणजे आपोआपच दुर्घटना टळते. बयाच वेळेला मधुमेह झालेला असल्यामुळे दृष्टी कमी झालेली असते. अशा वेळी समोरील वाहन दिसत नाही. म्हणून शक्यतो रात्री वाहन चालवणे टाळावे. कामभावना ही सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी उपजतच निर्माण झालेली प्रेरणा आहे. म्हणूनच आयुर्वेदिय ग्रंथकारांनी जीवन सफल होण्यासाठी धर्म-अर्थ-काम-मोक्ष ही चार उद्दिष्टे महत्त्वाची मानली आहेत. पती-पत्नीमधील शारीरिक संबंध हा त्यांच्यामधील साधलेला अत्यंत एकरूपतेचा संवाद असतो. जो त्यांना आयुष्यभर एकमेकांची साथ देण्यासाठी, संसारामध्ये काही संकटे आली तरी त्या संकटांना सामर्थ्याने तोंड देण्यासाठी, एकमेकांमधील कलह मिटवण्यासाठी, शरीर व मन संतुलनासाठी मदत करतो. ज्या दांपत्यांचे लैंगिक जीवन आनंदी व समाधानपूर्वक आहे. त्यांच्यामध्ये वार्धक्य अवस्था उशिरा सुरू होते, हे सिद्ध झाले आहे. म्हणूनच चिरकाल तारुण्य टिकवायचे असेल, तर कामजीवन तृप्त असले पाहिजे. जीवनामध्ये ताणतणाव कमी करण्यासाठी, स्वतः मध्ये आत्मविश्वास जागृत करण्यासाठी, संकटांना सामोरे जाण्याचे बळ मिळण्यासाठी व तारुण्य टिकवण्यासाठी, पती-पत्नीमध्ये लैंगिक संबंध समाधानकारक असायला हवे.

चाळिशीनंतर आरोग्याच्या कुठल्याही तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये. चक्कर येणे, थकल्यासारखे वाटणे, घाम येणे, छातीत धडधडणे, उदास वाटणे असे कुठलेही शारीरिक व मानसिक लक्षण असले तरीही वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करावेत. जर या वयात रक्तदाब, मधुमेह आणि पाळीबद्दलच्या समस्या असतील तर त्याची नियमितपणे औषधे घ्यावीत. औषधांमध्ये कॅल्शिअम, ’ब’ जीवनसत्त्वाच्या गोळ्या नियमितपणे व रक्तदाब असेल तर त्याचीही गोळी नियमितपणे घ्यावी. औषधे वेळेवर घ्यावीत. बन्याचशा स्त्रिया औषधे वेळेवर घेण्यामध्ये चालढकल करतात. परंतु असे केल्याने आरोग्य धोक्यात येते म्हणून आरोग्यदायी जीवनप्रणाली आपलीशी करण्यासाठी या सर्व नियम ांचे पालन करणे गरजेचे आहे. जसजसा काळ जातो तसतसे वय वाढत असते. काळ कोणासाठीही थांबत नाही. परंतु चाळिशीतही अगदी तरुणींना लाजवेल असा उत्साह टिकवणे, तेवढ्याच क्षमतेने, आत्मविश्वासाने, स्वावलंबीपणे एखादे काम मन लावून आनंदाने करणे गरजेचे आहे. शरीर व मन निरोगी, आनंदी ठेवून ’मी छान आहे’ असा आत्मविश्वास स्त्रीच्या मनामध्ये निर्माण झाला तर पुढील आयुष्य सुखाचे होईल.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

आंतरिक बल (भाग – 1)-मन एक रेडीयो स्टेशन है

137 सालों से ईश्वरीय ने ही गॉंव में ईश्वरीय कनेडा, टोरन्टो के ब्रह्माकुमार ब्राइन भाई, जो 37 सालों से ध्याान और राजयोग का अभ्यास कर रहे है और अपने ही गॉंव में, विश्व विद्यालय की एक शाखा खोलकर कई आत्माओं को बनाने के निमित्त बने हैं, वे जगदीश भाई के साथ के भावपूर्ण अनुभव प्रकार सुना रहे हैं – सन 1980 में जब मैं यूनिवर्सिटी में दूसरे साल की इंजीनियरिंग पढ़ रहा था, तब क्रिसमस मनाने घर गया था। उस समय मेरी बहन ने मुझे ज्ञान का सात दिन का कोर्स दिया। वह चाहती थी कि मैं ब्रह्माकुमार बनें। जब वह बाबा का परिचय दे रही थी, योग की दृष्टि दे रही थी तब मुझे कानों में बाबा की ध्वनि सुनायी पड़ी। इस अनुभव से मुझे शिव बाबा में निश्चय होता गया। लौकिक में मैं एक जियोलॉजिकल इंजीनियर हूँ। । उसके बाद मैं दादी जानकी से मिला, दादी ने मुझे लन्दन में सात महीनों तक रखा। उसके बाद मुझे मधुबन भेजा गया। मधुबन में मैं लगभग चार महीने रहा। मधुबन में बेहद के परिवार से मिला। उन दिनों भ्राता बृजमोहनजी से मेरा मिलना हुआ। दादी प्रकाशमणि जी ने मुझे दिल्ली भेजा ’प्युरिटी’ पत्रिका में सेवा करने के लिए। वहॉं भ्राता जगदीश से मिलना हुआ। ’दि वर्ल्ड रिन्युअल’ अंग्रेज़ी मैगज़ीन के कुछ लेखों का करेक्शन करने की सेवा भी मुझे मिली। उस मैगज़ीन में जगदीश भाई के ही लेख ज़्यादा होते थे। उनका करेक्शन भी मैं करता था। जगदीश बड़े विनम्र थे। जब मैं उनके लेखों का करेक्शन करता था, वे बड़ी नम्रता से स्वीकार करते थे।

उनको देखकर मुझे ऐसा लगा जैसे कि मेरे पिता हैं। उनके मन में सबके प्रति जो प्यार था, यज्ञसेवा के प्रति जो अथकपन था और दैवी परिवार की एकता के प्रति उनका जो परिश्रम था- वो बहूत अदभुत था। मैंने देखा, कुमारों में उमंग- उत्साह भरने में, बहनों की कोई भी समस्या हो उसका निवारण करने में, उनका समर्थन करने में, अलौकिक जीवन में उनके स्थिर होकर चलने में उन्होंने बहुत ही योगदान दिया। मेरे ईश्वरीय जीवन की शुरुआत में उन्होंने मुझे बहुत-सी बातों की जानकारी दी। उन्होंने मुझे बताया कि बाबा के प्रति, यज्ञ के प्रति हमारी कैसी भावना होनी चाहिए और ईश्वरीय सेवा में कैसे बहनों को आगे रखना है। उन्होंने बताया कि हम जितना बहनों को आगे रखेंगे और सम्मान करेंगे उतना सेवा भी आगे बढ़ेगी और हमारा पुरुषार्थ भी निर्विघ्न चलता रहेगा। वे अपने अनुभव सुनाया करते थे कि बाबा से उनको कैसे मदद मिलती थी, बाबा कैसे कई विकट परिस्थितियों में बचाते हैं इत्यादि। उनके अनुभवों की बातें मेरे दिल को छू लेती थीं। उनकी क्लासेस ज्ञान की गहराई में ले जाती थीं। जो भी उनकी क्लासेस सुनता था, महसूस करता था कि वे बड़े ज्ञानी हैं और अनुभवी हैं। वे किसी भी विषय पर बोल सकते थे, वे बड़े मेधावी थे, बड़े पढ़े-लिखे महान् चिन्तक थे। ऐसे बुद्धिजीवी को अन्यत्र मैंने देखा नहीं और मिला नहीं।

(प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालय)

जीवन चक्र-कर्म चक्र

एकदा गुरुगोविंद सिंहजी महाराज घोड्यावर बसून कुठेतरी जात होते. त्याच वेळी एक स्त्री त्यांच्या घोड्यासमोर येऊन उभी राहिली आणि संतान प्राप्तीसाठी भीक मागू लागली. तिला मुलबाळ नव्हते आणि तिला मुलबाळ होणार ही नव्हते कारण ती वांझ होती. सच्चे बादशाह म्हणाले, बाई, तु आणखीन कोणताही वर माग पण ती बाई आपल्या मागणीवरच अडून राहिली आणि संतान प्राप्तीचीच इच्छा प्रगट केली. यावर गुरूसाहेब म्हणाले इथे तर कुठेच कागद किंवा कलम नाही तर मी कसा लिहू? मग विचार करून म्हणाले, इथे एक मडक्याचा तुटलेला तुकडा पडलेला आहे, तो मला दे. जेव्हा गुरूजींना तो तुकडा दिला, तेव्हा त्यांनी त्याच्यावर आपला आदेश लिहिला – ’1’ म्हणजे एक मुल पण तेव्हा घोडा खिदळला आणि त्या ’1’ अक्षराचे 7 मध्ये परिवर्तन झाले आणि त्या वांझ स्त्रीला सात मुले झाली. अशाच तर्‍हेची घटना माझ्याबरोबरही घडली. मी संत कृपालसिंहजींकडून दीक्षा घेतली होती. माझे लग्न नातेवाईकांमध्येच झाले. त्या घरी खुप दुःख होते, कारण की मला संतान प्राप्ती झाली नव्हती पण माझे पती माझ्यावर खुप प्रेम करीत असत. हळूहळू भांडण एवढे वाढले की माझे पती पण माझ्या विरुद्ध वागायला लागले आणि मामला घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचला. आमचा घटस्फोट झाला. आता मी खुप दुःखी झाले. माझे मन उदास झाले होते. आमच्या घराजवळ एक सत्संगी परिवार राहत होता. पती, पत्नी आणि दोन मुले. अचानक पत्नीचा मृत्यु झाला. माझ्या घरच्या माणसांनी थोड्या दिवसानंतर त्यांच्या नातेवाईकांचा सल्ला घेऊन माझे लग्न तिथे करून टाकले. हे कुटुंब खुप सुखी कुटूंब होते. मी लवकरच त्या मुलांत रमले आणि मुलेही मला सख्या आईपेक्षा जास्त प्रेम करू लागले. आमचे प्रेम आई मुलांचे झाले. माझ्या नवर्‍याने मला लेडी डॉक्टरकडे तपासासाठी नेले. डॉक्टरने स्पष्ट सांगितले की ही आई होऊ शकत नाही. मध्यंतरी आम्ही मोठ्या मुलाचे लग्नपण लावून दिले. आमच्या लग्नाला आता पाच वर्षे पुर्ण झाली होती. काही दिवसानंतर माझ्या पतीची पाटन्याला बदली झाली. ते मला सोबत घेऊन जाण्यास तयार होते. मला मुलांपासून दूर जाणे नको वाटत होते पण नाईलाज होता. जाण्याअगोदर मी महाराज दर्शनसिंहजींच्या जवळ गेले. माझे अश्रु निरंतर वहात होत. महाराजजींनी विचारले, काय झाले? मी म्हटले, महाराज मला आपल्या मुलांना सोडून जावे लागत आहे. त्यांच्या मनात कोणास ठाऊक काय होते? ते एकदम आपल्या मौजमध्ये म्हणाले, तू जा. महाराज जी आणखीन देतील’, त्यांचे वचन अटल होते. वेळ आल्यावर आमच्या घरी एका मुलीचा जन्म झाला. याप्रमाणे जगाने ज्या बाईला वांझ म्हटले होते, तिला दयाल पुरूष संत दर्शनसिंहजी महाराजांनी आईची पदवी मिळवून दिली. आज त्यांच्या आशिर्वादाने आमचे कुटुंब खुप सुखी आहे. काही क्लेश नाही, कोणतेही दुःख नाही, हे सर्व त्यांच्याच कृपेने शक्य झाले.

(कृपाल आश्रम, अहमदनगर)

निवड

अतिशय श्रीमंत असलेल्या देवरामने एक सुंदर मंदिर तयार करून घेतले. मंदिरात देवाची मूर्ती स्थापन करून त्याची दररोज पूजा करण्यासाठी पूजारी ठेवला. मंदिरात गरीब भक्त साधू-संत असे लोक आले तर त्यांना 4-5 दिवस रहाता यावे, त्यांना रोज खाण्यास मिळावे त्यासाठी मंदिराच्या नावाने घेतलेल्या शेतीच्या उत्पन्नावर मंदिरातील खर्च भागत होता. देवराम यांना मंदिरातील सर्व कामावर देखरेख ठेवण्यासाठी एका सज्जन माणसाची आवश्यकता होती. माझ्या मनाला जो योग्य वाटेल असा सज्जन माणूस मी स्वतः निवडण्याचा प्रयत्न करीन. या विचाराने दररोज देवराम मंदिराच्या परिसरात जाऊन बसत असत. दर्शनास येणार्‍या जाणार्‍या प्रत्येक माणसाचे निरीक्षण करत असत. एकदा मंदिरात आलेल्या व्यक्तिकडे त्यांचे लक्ष गेले. देवरामांनी त्याला जवळ बोलावले आणि विचारले, तुम्ही या मंदिराच्या व्यवस्थापकाचे काम कराल का? त्यासाठी एका सज्जन व्यक्तिची गरज आहे. तुम्ही मला योग्य वाटता. तो गरीब माणूस म्हणाला, ते कसे काय? त्यावर देवराम म्हणाले, मंदिराच्या रस्त्यावर जो दगड आहे त्याचा थोडासा कोपरा वर आला होता. त्याला ठेचकाळून बरेच लोक पडत होते. पण फक्त तुम्ही तो दगड उकरून काढून बाजूला फेकून दिला. हे सर्व मी पाहात होतो. त्यावर गरीब माणूस म्हणाला, रस्त्यावर पडलेले दगड काटे बाजूला फेकून देणं हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे. त्या व्यक्तिचे हे मत ऐकल्यावर देवरामांनी त्या सज्जन माणसाची मंदिराच्या व्यवस्थापक पदी नेमणूक केली.

तात्पर्य – जी माणसे कर्तव्याची जाण ठेवून त्याचे पालन करतात, तीच खरी सज्जन.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज -व्हिटॅमीन डी चा सर्वोत्तम खाद्य स्त्रोत कोणता?

व्हिटॅमिन डी ची कमतरता ही खूप माणसांमध्ये असते. भारतात सुद्धा आता 80%-90% लोकांम ध्ये कमतरता आहे पण भारतात व्हिटॅमिन डी चे शरीरातील प्रमाण तुम्ही सांगितल्या शिवाय तपासले जात नाही. फार पूर्वी उन्हातान्हात काम करणार्‍यांची संख्या अधिक होती पण आता कार मध्ये फिरणारे आपण किंवा दिवसभर ऑफिसमध्ये, शाळेत, घरात इत्यादी ठिकाणी बसणारे सर्वजण उन्हात फार कमी वेळ असतो. सकाळचे कोवळे ऊन आपण लहान बाळाला देतो कारण या उन्हात राहिलो तर आपले शरीरात व्हिटॅमिन डी तयार करते. पण सकाळच्या कोवळ्या उन्हात रोज बाहेर फिरणे आपल्याला शक्य होईलच असे नाही तर आपण व्हिटॅमिन डी साठी काय खावे ते आता पाहू – हा मासा सगळ्यात जास्त स्त्रोत आहे व्हिटॅमिन डी चा अमेरिका, जपान या देशात जास्त प्रमाणात ते खातात. रावस हा तुम्ही इंडियन salmon म्हणून व्हिटॅमिन डी साठी खाऊ शकता. इंडियन मॅक्रेल म्हणजे बांगडा हा उत्तम स्त्रोत आहे. या व्यतिरिक्त तुम्ही cod liver oil च्या गोळ्या घेऊ शकता.

मी पाहिले आहे की भारतात खूप शाकाहारी लोक मशरूमचे सेवन करत नाहीत पण मशरूम हा एकमेव भाज्यांमधून मिळणारा व्हिटॅमिन डी चा स्त्रोत आहे. मशरूम बाजारातून आणले की सकाळी दुपारी 10 ते 3 या वेळेत उन्हात ठेवावे. मशरूम न धुता शक्यतो पेपर टॉवेल ने पुसून घ्यावे. अमेरिकेत खूप प्रकारचे मशरूम मिळतात आता भारतात सुद्धा दोन-तीन प्रकारचे मिळतात. मशरूमच्या चकत्या करून किंवा तुकडे करून नुसते पॅनमध्ये परतून (टॉस करून त्याला पाणी सुटते ते आटून मशरूमचा रंग बदलतो आणि छान वास सुटतो तोपर्यंत) त्यात तिखटमीठ घालून खाल्ले तरी छान लागतात किंवा पिझ्झा सॉसमध्ये परतून किंवा वाफवलेल्या सिमला मिरची सोबत छान लागतात. मशरूम सूप छान लागते. मशरूम जरुर खावेत. बरेच अंड्यातील पिवळा बलक फेकून देतात किंवा खात नाहीत पण यातूनही व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात मिळते. याव्यतिरिक्त संत्री, सोया दूध, चीझ हे सर्व पदार्थ खाऊन सुद्धा व्हिटॅमिन डी च्या गोळ्या नियमित घेत रहाव्यात. शरीरातील हाडांच्या बळकटीसाठी खूप गरजेचे आहे डी जीवनसत्त्वाचे योग्य प्रमाण. तेंव्हा डी जीवनसत्वाचे प्रमाण तपासा आणि ते योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी आवर्जून प्रयत्न करा.