घरात भांडणे होत असतील उपाय
* जर एखाद्या घरात वास्तुदोषांमुळे
वारंवार भांडणे होत असतील तर अशा घरात
खास करून आजारी माणसाच्या खोलीत
त्याच्या बिछान्याजवळ थोडेसे मीठ पाण्यात
मिसळून काचेच्या बाऊलमध्ये ठेवावे लाभ
होतो.
* काही कारणाने एखाद्या खोलीत
नैसर्गिक प्रकाश, ऊन, हवा येत नसेल तर
अशा खोल्या बेडरूम म्हणून वापरण्याच्या
दृष्टीने लाभदायी ठरत नाहीत. अशा खोल्यांम
ध्ये २-३ जागी चिनी माती, काच व
प्लॅस्टिकच्या प्लेटमध्ये थोडे खडे मीठ ठेवा.
यामुळे हा दोष कमी होतो.
* तिजोरीचे तोंड कोणत्याही
दरवाजाच्या बरोबर समोर येणार नाही याची
दक्षता घ्या.
वास्तू
वास्तू
जर तुमच्या घरातील एखादे टॉयलेट हे
घराच्या पूर्व, उत्तर आणि पूर्वोत्तर दिशेला येत
असेल, तर हा फार मोठा असा वास्तुदोष
मानला जातो. यामुळे सुख, आरोग्य व समृद्धी
या तिन्हींवर गंभीर नकारात्मक प्रभाव निर्माण
होतो.
हा वास्तुदोष दूर करण्यासाठी थोडी
चिनी माती, काच वा प्लॅस्टिकच्या प्लेटमध्ये
२-३ मुठी खडे समुद्री मोठ घ्या व ती प्लेट
घरात ठेवा. या प्लेटमधील मीठ १५-२०
दिवसांनी बदलत राहा. टॉयलेटचा वास्तुदोष
हा या उपायामुळे बर्याच प्रमाणात नियंत्रित
केला जातो.
नाचणीचे लाडू
नाचणीचे लाडू

साहित्य – १ किलो नाचणी भाजून दळून आणावी. तीन वाट्या पीठ, १ वाटी साजूक तूप, २ वाट्या गूळ अगर पिठीसाखर, १ वाटी कणीक, चारोळ्या, १ चमचा जायफळ पूड.
कृती – ३ वाट्या नाचणी पीठ, १ वाटी कणीक एकत्र करून तुपावर खमंग भाजून घ्यावे. पीठ गरम असतानाच गूळ चिरून
घालावा. अर्धी वाटी दुधाचा शिपका द्यावा (कोमट पिठात पिठीसाखर मिसळावी). पीठ, जायफळ पूड, गूळ एकत्र चांगले मिसळावे. लागल्यास दूध, तूप घालावे. लाडू वळावेत. ५-६ चारोळ्या प्रत्येक लाडवावर दाबून बसवाव्यात. छान दिसतात. रोगप्रतिकारशक्ती नाचणीत आहे. भरपूर प्रमाणात लोह आहे. नाचणीचा लाडू रोज खायला हरकत नाही.
शिंगाने दिला दगा
शिंगाने दिला दगा
एका कुरणात पोटभर चरल्यावर एक सांबर पाणी पिण्यासाठी तळ्याकाठी आले. पाणी पीत असता त्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले. पाण्यात पडलेले प्रतिबिंब पाहताच सांबर मनात म्हणाले, “माझी शिंगे किती सुंदर दिसतात! त्याला फुटलेले फाटे तर अवर्णनीयच! माझे सुंदर डोळे माझ्या सौंदर्यात भर घालतात, तर माझे तोंड मला किती शोभून दिसते! माझ्या अंगावरील केस माझ्या सौंदर्याला चार चांद लावतात!” पण पायाकडे दृष्टी जाताच सांबर फारच नाराज झाले. म्हणाले,” माझे हे बारीक पाय मात्र किती खराब दिसतात. माझ्या सुंदर शरीराची शोभा या पायांनी फार कमी केली. त्यापेक्षा हे पाय नसते, तर बरे झाले असते.” असा विचार सांबर करतो आहे, तोच जवळच दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. वाघाची चाहूल लागताच सांबर चौखूर धावू लागले. वाघ त्याचा पाठलाग करू लागला. थोड्याच वेळात सांबर वाघापासून खूप दूर गेले. धावता धावता एके ठिकाणी त्याची सुंदर दिसणारी शिंगे एका झाडाच्या पारंब्यात अडकली. शिंगे सोडवायचा प्रयत्न सांबर करू लागले, पण ती जास्तच अडकत चालली. इतयात वाघाने त्याला गाठले. एकाच ढांगेत त्याची मान आपल्या जबड्यात आवळली. मरता-मरता सांबर मनात म्हणाले,” हाय रे दैवा, ज्या पायांना मी दूषण दिले, त्यांनी संकटापासून मला दूर नेले आणि माझा घात केला. या शिंगांमुळेच माझे मरण ओढवले.” तात्पर्य ः नुसत्या दिखाऊपणावर न जाता एखाद्याचे गुण विचारात घेणे केव्हाही शहाणपणाचे ठरते




