दैनिक पंचांग शुक्रवार, दि. १९ जुलै २०२४

प्रदोष, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, आषाढ शुलपक्ष, मूळ २६|५५, सूर्योदय ०६ वा. २७ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि. मेष : आज आपल्या आयुष्यात आपल्या नातलागांची व मित्रांची चांगली भूमिका रहाणे शय आहे. योजनांमध्ये केलेला बदल इतर कामे करण्यासाठी प्रवृत्त करेल. वृषभ : आजचा दिवस व्यापार क्षेत्रातील चांगली बातमी आणणारा आहे. मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल. घरातील वातावरण आनंददायी राहील. घराबाबत काही योजना बनवाल. नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. मिथुन : प्रेमीजनांसाठी आजचा दिवस आनंदाने परिपूर्ण असेल. नवी सुरुवात कराल आणि पूर्ण विश्वासाने त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न कराल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. कर्क : कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडाल. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या कामांसाठी श्रम करावे लागतील. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. सिंह : नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. आपली इच्छा असेल तर दिवास्वप्नही खरी ठरू शकतात. बळात वाढ होईल. लोकांबरोबर काही विषयांवर संमती द्यावी लागू शकते. कन्या : आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. देवाण-घेवाण टाळा. आनंददायी क्षण आयुष्यभर स्मरणात रहातील. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. तूळ : स्वतःला इतर लोकां समोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे विचार पटतील. आर्थिक विषयांमध्ये सावगिरी बाळगा. धावपळ जास्त होईल. वृश्चिक : महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले सहकार्य तुमची उत्तम राजकीय जाण दाखवेल. वेळ अनुकूल आहे. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. धनु : आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. सुख-शांतीचे वातावरण राहील. हुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल. मकर : अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक वार्ता मिळतील. यापार-व्यवसायात कौटुंबिक सभासदांचा सहयोग मिळेल. कुंभ : आरोग्य उत्तम राहील. देवाणय्घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. शत्रूंवर प्रभाव वाढेल. लेखन कार्यात प्रगती होईल. शत्रूंपासून सावध राहा. हसत खेळत वेळ जाईल. मीन : मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. वाहने काळजीपूर्वक चालवा. मानसिक सुखय्शांतीचे वातावरण राहील. जोखिम असलेल्या कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये. संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

माणसाला किती दात असतात

माणसाला किती दात असतात प्रौढ माणसाला एकूण ३२ दात असतात. वरील जबड्यात सोळा व खालच्या जबड्यात सोळा. यात निम्मे दात डाव्या बाजूला व निम्मे उजव्या बाजूला असतात. वरच्या व खालच्या जबड्यातील प्रत्येकी सोळा दातांमध्ये पटाशीचे चार दात, दोन सुळे, चार उपदाढा व सहा दाढा असे दात असतात. माणसाच्या बाबतीत खायचे व दाखवायचे दात वेगळे नसतात. मग भले एखाद्याला कोणी काहीही म्हणो! उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये माणसाच्या जबड्याचे हाड लहान होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शेवटी येणार्‍या दाढांसाठी (अक्कल दाढांसाठी) जबड्यात जागाच शिल्लक राहत नाही. त्यामुळे कधी कधी ह्या दाढा उगवतच नाहीत. कधी वेड्यावाकड्या येतात. त्या जर गालाच्या दिशेने उगवू लागल्या तर खूप त्रास होतो व त्या काढून टाकाव्या लागतात. कालांतराने सर्व मानवांना २८ दात असण्याची शयता नाकारता येत नाही. थोडयात म्हणजे आधुनिक मानवाला अक्कलदाढांची गरज नाही. हे निसर्गाच्या ध्यानात आले असावे. अक्कलदाढा व अक्कल यांचा तसा अर्थाअर्थी काहीच संबंध नसल्याने घाबरून जाण्याचे कारण नाही!

सुविचार

जे आपली प्रशंसा करतात ते लोक आपल्याला आवडतात, पण आपण ज्यांची प्रशंसा करतो ते लोक आपल्याला आवडत नाहीत.

मधुमेहींसाठी काकडी वरदान

मधुमेहींसाठी काकडी वरदान सकाळी उठल्यावर डोकं दुखत असेल तर किंवा फ्रेश वाटत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी काकडीच्या फोडी खाव्यात. मधुमेहींसाठीसुद्धा काकडी उपयुक्त आहे. काकडीत असलेल्या स्टेरॉल्समुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करायला मदत होते. काकडीत पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि फायबर असल्यामुळे रक्तदाब सुरळीत राहण्यास मदत होते. तसेच स्नायूंचे दुखणे, पायात वात येणे यासारखे विकार दूर करण्याची क्षमता यात असते.

टोमॅटोचे लोणचे

टोमॅटोचे लोणचे साहित्य : चारशे ग्रॅम लाल मोठे टोमॅटो, दहा-पंधरा लाल सुया मिरच्या, दहा-बारा लसूण पाकळ्या बारीक चिरून, एक मोठा चमचा चिंचेचा कोळ, चवीला मीठ, अर्धी वाटी चिरलेला गूळ, दोन मोठे चमचे तेल फोडणीसाठी, मोहरी, हिंग, हळद, चिमूटभर मेथी पूड. कृती : चिंचेचा कोळ, थोडे पाणी आणि मिरच्या घालून एक-दोन मिनिटे उकळावा. गार झाल्यावर मिसरमधून फिरवून एकजीव करावा. दोन-तीन वाट्या उकळत्या पाण्यात टोमॅटो घालून पाच मिनिटे झाकून ठेवावे. साले काढून तुकडे करून घ्यावे. तेलाची फोडणी करावी. त्यात मेथी पूड, चिरलेला लसूण आणि मिरच्या घातलेला चिंचेचा कोळ घालून परतावे, टोमॅटो मीठ, गूळ घालून उकळून घट्ट करावे.

शांत झोपेसाठी

शांत झोपेसाठी * बॉसबेड शयतो नसावा. तसेच, त्यात अंथरुण व पांघरुणे ठेवलेली असल्यास ती वारंवार बाहेर काढून धुवून, वाळवून पुन्हा आत ठेवावीत. यात पितळी किंवा स्टेनलेस स्टीलची जास्तीची भांडी, विजेची उपकरणे, नादुरूस्त वस्तू ठेवू नयेत. कारण त्यामुळे त्यावर शांत झोप लागत नाही. * स्टडी टेब ल भिंतीला चिकटलेले असावे व त्याचे बुकशेल्फ बंद असावे.

भजी स्वादिष्ट, कुरकुरीत होण्यासाठी

बेसनात बे्रड दूधात भिजवून मिसळावा व त्या बेसनाची भजी बनवावीत. भजी स्वादिष्ट, कुरकुरीत होतील.

यामुळे सनटैन दूर होतो

* ऑलिव्ह ऑईलमध्ये थोडासा संत्र्याचा रस घालून त्याने सुद्धा मालिश करावे. यामुळे त्वचेला ‘क‘ आणि ‘ई‘ जीवनसत्व मिळते. * दह्यामध्ये काकडी किसून ते चेहर्‍यावर लावा. यामुळे सनटैन दूर होतो व त्वचा मुलायम होते. संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

“मन्या, तुझ्या घड्याळात वाजले किती?” बंडूने विचारले, “पाच वाजले” मन्या म्हणाला, “माझ्या घड्याळात सव्वापाच वाजले आहेत.” “नाही. माझं घड्याळ रेडियो टाईम आहे.” ‘माझंही रेडियो टाईम आहे?” “तुझ्याकडे कोणता रोडियो आहे?” “फिलिप्स!” “मग बरोबर. माझ्याकडे ‘बुश’ आहे.’

दैनिक पंचांग गुरुवार, दि. १८ जुलै २०२४

वामन पूजन, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, आषाढ शुलपक्ष, ज्येष्ठा २७|२५, सूर्योदय ०६ वा. २७ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि. मेष : प्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कामांमध्ये प्रगती होईल. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. शत्रू पराभूत होतील. वृषभ : आपल्या धाडसात वाढ होण्याची शयता आहे. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा. इच्छेवर आणि मनस्थितीवर संयम ठेवाल. मिथुन : आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. पैशाच्या बाबतीत आपली नड भागेल. कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शयता आहे. कर्क : आपल्या व्यवसायात काहीतरी चांगले घडून येणार आहे. वाहने काळजीपूर्वक चालवा. एखाद्या विशिष्ट योजनेला हातावेगळे करण्यात बराच वेळ जाईल. व्यापारय्व्यवसायात स्थिती सुखद राहील. सिंह : आपल्या शत्रूंवर आपला प्रबळ प्रभाव राहील. भावनाशील असल्यामुळे नुकसान होणे शय आहे. वेळ अनुकूल आहे. जोखिम असलेले कार्ये टाळाल. कन्या : आज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक विषयांमध्ये आपणास समर्थन मिळेल पण एखाद्याला जामीन देणे टाळा. शांत राहाल. तूळ : कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल. वृश्चिक : आपली प्रसिद्धी वाढण्याची शयता आहे. आपले धाडस वाढेल. कार्यक्षेत्रात वेगाने कार्य कराल. आरोग्य उत्तम राहील. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. धनु : आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. महत्वपूर्ण कार्यात यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. मकर : व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. आर्थिक पक्षाबाबत सावध राहाल. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश मिळेल. कुंभ : व्यवसायात प्रगती कराल. स्थिती अनुकूल राहील. आरोग्य उत्तम राहील. आरोग्य मध्यम राहील. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. इतरांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो. मीन : आर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवाल. कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा समजण्यात मदत मिळेल. संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

शत्रुकडून ‘सुलताना’ लकब मिळविणारी ‘चांदबिबी’ हे जगातील एकमेव उदाहरण

  नगर – १३ जुलै सुलताना चांदबीबीचा ४२४ वा शहीद दिवस. मुर्तजा निजाम यांच्यानंतर अहमदनगर निजामशाहीवर मोगल दक्षिणेतून हल्ले होऊ लागले. तेव्हा अहमदनगर वाचविण्यासाठी चांदबिबी हीने अहमदनगर येथे परतण्याचा निर्णय घेतला. अकबर पुत्र मुराद यानी अहमदनगर किल्ल्यावर हल्ला केला. पण अनेक दिवस लढवून किल्ला ताब्यात येत नव्हता. शेवटी किल्ल्याची एक भिंत दारू गोळ्याने उडवली, परंतु सकाळी उठून पाहतो चांद बीबी व तिच्या सैन्याने ती रात्रीतून पुन्हा उभी केली. तिचे शौर्य पाहून राजपुत्र मुराद यानी तिला सुलताना ही लकब दिली. व ते करून तो वरहाड प्रांताकडे निघून गेला.नंतर त्याचा भाऊ राजपुत्र दानीयाल याने किल्ल्याला वेढा दिला. अनेक महिने तो वेढा चालू होता. शेवटी त्याने एका सरदारला फितूर केले. त्यांनी दगाबाजीने सुलताना चांदबिबीवर तिच्या महालात हल्ला केला. त्यात ती व तिच्या सत्तर अंगरक्षक मैत्रिणी या शहीद झाल्या. त्यांचे प्रेत ही त्या राहत असलेल्या महाला जवळील मछली बावडी येथे सापडले. त्यात एका रत्नजडित सँडल वरून सुलताना चांदबीबी यांचे प्रेत ओळखले गेले. त्या सँडलची रत्नांची किंमत त्याकाळी तीन लक्ष होती. असे समकालीन इतिहासकारांनी नोंद केली. ते सँडल राजपुत्र दानियाल याने पुढे आग्रा येथे पाठवले असे अभिवादन करताना मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष इंजि. अभिजीत वाघ यांनी सांगितले. अहमदनगर निजामशाहीची राणी सुलताना चांदबीबी यांच्या ४२४ व्या शहीद दिनानिमित्त मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने त्यांच्या कबरीवर फुलं अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अभिजीत वाघ, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफ दुलेखान, जीवन फाउंडेशनचे अध्यक्ष आरिफ सय्यद,उर्जिता फाउंडेशनच्या संध्या मेढे, मुस्कान असोसिएशनचे अध्यक्ष शफकत सय्यद, आर्कि. फिरोज शेख, तंन्जिमे उर्दु अदबचे अध्यक्ष सय्यद खलील, आय बी शहा, ईस्माईल शेख, फिरोज शेख आदी उपस्थित होते. उपस्थितांनी चांदबीबीच्या कबरीचा शोध लावून प्रथमच त्यांना अभिवादन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले, व असाच अहमदनगरचा इतिहास शोधून ते समाजापुढे आणण्याचे त्यांना आवाहन केले. पुढे बोलताना अभिजीत वाघ म्हणाले की, युद्ध संपले की शत्रुत्व संपते. राजपुत्र दानियाल यांनी सुलताना चांदबीबी हीची कबर शाही कब्रस्तान बागरोजा येथे बांधण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे अहमद निजामशहा यांच्या कबरीच्या उत्तर पूर्व कोपर्‍यात जी कबर आहे ती सुलताना चांद बीबी हिची आहे. अनेक वर्ष इतिहासप्रेमी मंडळ यांनी त्यावर संशोधन केले आहे. तसेच तिच्या अंगरक्षक सहेली यांचे पण कबरी बागरोजेच्या पश्चिम दरवाजा समोरील जागेत जो गंजे शहीदा आहे तिथे आहे. पुढे काही वर्षानंतर मीर अबु तुराब मशदी याने चांदबिबीच्या अस्थी इराण येथे नेल्या व तेथे चांदबीबीची कबर मशद इमाम रजा यांच्या दर्गा परिसरात आहे यासंबंधीचे शोध चांदबीबीच्या कबरीचा हे पुस्तक लवकरच इतिहास प्रेमी मंडळ प्रसिद्ध करणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मखदूम सोसायटी व इतिहासप्रेमी मंडळाच्या सर्व सदस्यांनी भरपूर प्रयत्न केले.

भक्तिमार्ग आणि समतेची शिकवण देणार्‍या संत परंपरेचा विद्यार्थ्यांनी साकारला देखावा

हिंद सेवाच्या प्राथमिक विभागाचा आगळावेगळा उपक्रम नगर – बागडपट्टी येथील हिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी आकर्षक अशी वेशभूषा करून ज्ञानेश्वरीचे लेखन करणारे संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा आशीर्वाद घेताना छत्रपती शिवाजी महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत महमंद महाराज शेख, संत जनाबाई, विठ्ठल, रुमि णी तसेच वारकरी यांची सुंदर वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारली होती. शाळेचे चेअरमन मधुसूदन सारडा यांच्या हस्ते पांडुरंगाची व संतांची पूजा करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे व शिक्षक उपस्थित होते. संतांनी दिलेल्या समतेची व ममतेची शिकवण्याची स्वतंत्र आकर्षक कमान देण्यात आली होती. या सुंदर संत परंपरेच्या देखाव्या जवळच संतांची माहिती असणारे फलक लावण्यात आले होते. मुलांनी दिवसभर फलकाचे वाचन करून ज्ञान आत्मसात केले. संतांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषेचा चालता बोलता हा कार्यक्रम घेण्यात आला. मुलांनी समर्पकपणे उत्तरे देत बक्षिसे जिंकली. कार्यक्रमात सौ. वैजयंती तुंगार व त्यांच्या सहकार्‍यांनी भजनी मंडळी ग्रुप ने संताचे अभंग व श्री विठ्ठल भजन व भारुड या कार्यक्रमाने विद्यार्थी व पालक मंत्रमुग्ध झाले. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, पंढरीचा राजा माझा विठ्ठल, पाऊले चालती पंढरीचे वाट, या शेजारणीने बरं नाही केलं बया मला पंढरीला नेला ग बया, रुप पाहता लोचणी अशी भक्तीमय मधुर गीते गायिली. पंढरीचा राजा पांडुरंगाचे अलंकार, वस्त्रे तसेच वारकरी संप्रदायातील वाद्ये मृदुंग, टाळ, वीणा, चिपळ्या, हार्मोनियम, तबला हे वारकरी संप्रदायाचे साहित्य आकर्षक मांडणी करून टेबलावर विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक उपस्थित होत

विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या परंपरेचे पाईक व्हावे :अनंत देसाई यांचे प्रतिपादन

दादा चौधरी विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त दिंडीची मिरवणूक नगर – दिंडी ही महाराष्ट्राची प्राचीन परंपरा आहे. सर्व वारकरी श्री विठ्ठलाचे ओढीने पंढरपूरला दरवर्षी आषाढी एकादशीला जात असतात. या दिंडीतून वृक्षारोपण, रक्तदान, स्त्री शिक्षण असे सामाजिक संदेश देत असतात. विद्यार्थ्यांनी या दिंडीत सहभागी होऊन महाराष्ट्राच्या परंपराचे पाईप व्हावे, असे प्रतिपादन दादा चौधरी विद्यालयाचे चेअरमन आनंद देसाई यांनी केली आहे. हिंद सेवा मंडळाच्या दादा चौधरी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त शहरातून दिंडीची मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी व सेनापती दादा चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर हिंद सेवा मंडळाचे माजी कार्याध्यक्ष अजित बोरा यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची आरती करण्यात आली. याप्रसंगी दादा चौधरी विद्यालयाचे चेअरमन अनंत देसाई, मुख्याध्यापिका कु. जामगावकर, मेहेर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या प्रा.अनुरीता झगडे, सौ.नंदा कानिटकर, वर्षा गुंडू, जयसुधा ताटी, श्रीमती घोडेकर, गोविंद धर्माधिकारी, नंदे सर, दीपक शिंदे, भोसले सर, प्रसाद सामलेटी, मनोज हिरणवाळे, सुजय रामदासी आदी उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी ज्ञानोबा, माऊली, तुकाराम, जय हरी विठ्ठल, श्री विठ्ठलाच्या नामाचा जय जयकार केला. दिंडीची मिरवणूक दादा चौधरी विद्यालय, पटवर्धन चौक, लक्ष्मी कारंजा, नवी पेठ, कापड बाजार, नेता सुभाष चौक, चितळे रोड येथून दादा चौधरी विद्यालयात समारोप करण्यात आला.

जैन संतांना ‘विहार यात्रेत’ पाेलीस संरक्षण देण्यात यावे

सुरक्षेच्या बाबतीत आमदार सत्यजित तांबे यांची मागणी मान्य  नगर – जैन समाज हा भारतातील एक अल्पसंख्याक समुदाय असून भारतातील जैन देशाच्या अर्थव्यवस्थेच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. अल्पसंख्यांक समुदाय या नात्याने मला सभागृहाचे लक्ष भारतीय जैन संत किंवा भिक्षूंच्या रक्षणाच्या अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्नाकडे वेधायचे आहेत. जैन समाजात त्याग, भक्ती व निस्वार्थ सेवेमुळे जैन संतांना त्यांच्या समाजात सर्वाेच्च स्थान आहे. हे संत एका ठिकाणाहून दुसèया ठिकाणी काेणत्याही माेटर वाहनाचा वापर न करता चालून प्रवास करतात. दुर्दैवाने अशी विहार यात्रा असताना जैन संत सुरक्षित नसल्याचे वेळाेवेळी आढळून आले आहे. विहार यात्रा करत असताना जैन संताना अनेक वेळा अपघातांना सामाेरे जावे लागले अनेक वेळा भीषण अपघातामुळे संतांचे अपघाती निधन हाेते. त्यामुळे महाराष्ट्र समाज उभारणीत संतांचाफार माेठा वाटा असतानाही विहार यात्रेत त्यांचे रक्षण ही करू शकत नाही. अशी भावना जैन समाजात वाढीस लागत आहे. त्यामुळे जैन संतांना विहार यात्रेत पाेलीस संरक्षण द्यावे अशी मागणी विधान परिषदेमध्ये आ. सत्यजित तांबे यांनी उपस्थित केली असता मागणीला उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र \डणवीस यांनी व सरकारने तत्काळ मागणी मान्य करून संबंधित विभागाला निर्देश दिले. पारनेर तालुका जैन महासंघाचे उपाध्यक्ष प्रसाद कर्नावट व जैन समाजाच्या वतीने आमदार सत्यजित तांबे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र \डणवीस व सरकारचे जाहीर आभार मानण्यात आले.

आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव

प्रा. अनुरीता झगडे यांचे प्रतिपादन : मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात नगर – आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव आहे. या उत्सवात लहान-मोठे असे सर्वजण सहभागी होतात. आषाढी एकादशीच्या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने व भक्ती भावाने शाळेतील विद्यार्थी सहभागी होत असतात. विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची संस्कृती परंपरा याची माहिती व्हावी. यासाठी दरवर्षी दिंडीचे आयोजन करण्यात येते, असे प्रतिपादन मेहेर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या प्रा. अनुरीता झगडे यांनी केले आहे. सालाबाद प्रमाणे हिंदसेवा मंडळाच्या मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त शाळेचे चेअरमन जगदीश झालानी यांच्या मार्गदर्शनानुसार दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल, रुमिणी, वारकरी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, मुक्ताई अशा विविध वेशभूषा करून सहभाग नोंदविला. याप्रसंगी दादा चौधरी विद्यालयाचे चेअरमन अनंत देसाई, हिंद सेवा मंडळाचे माजी कार्याध्यक्ष अजित बोरा, मेहेर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या प्रा.अनुरीता झगडे आदींसह शाळेतील सर्व शिक्षिका शिक्षकेतर क

विधाते विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सारसनगरला रंगला दिंडी सोहळा

पारंपारिक वाद्यांचा गजर, टाळ-मृदूंगाचा निनाद व जय हरी विठ्ठलाच्या घाेषाने नागरिक भारावले नगर – कै. दामाेधर विधाते (मास्तर) प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त सारसनगर भागातून उत्साहात दिंडी काढली. बाल वारकèयांच्या दिंडीत श्री विठ्ठल-रुक्मिणी व विविध संत व वारकèयांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थी सर्वांचे आकर्षण ठरले. पारंपारिक वाद्यांच्या गजरात व लेझीम, झांज पथकासह दिंडी काढण्यात आली हाेती. पांढरी टाेपी, कपाळी गंध, पायजमा, बंडी या पाेशाखातील लहान मुले, तर रंगीबेरेंगी साड्या परिधान करुन मुली डाेक्यावर तुलसी वृंदावन घेऊन दिंडीत सहभागी झाल्या हाेत्या. टाळच्या गजरात ज्ञानाेबा… तुकाराम… च्या जयघाेषाने परिसर निनादला. संस्थेचे सरचिटणीस प्रा. शिवाजीराव विधाते यांच्या हस्ते पालखीचे पूजन करुन दिंडीला प्रारंभ करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के, संताेष सुसे, शिक्षक सविता साेनवणे, लता म्हस्के, निता जावळे, मीनाक्षी घाेलप, सारिका गायकवाड, श्रीमती पेंटा, राधाकिसन क्षीरसागर, याेगेश दरवडे, भाऊसाहेब पुंड, अमाेल मेहेत्रे, सचिन बर्डे आदींसह विद्यार्थी व पालक उपस्थित हाेते. सारसनगर भागातील प्रमुख मार्गावरुन या दिंडीचे मार्गक्रमण झाले. दिंडी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली हाेती. या लहान वारकèयांचे परिसरात उत्साहात स्वागत करण्यात आले. मुलींनी दिंडीत ुगड्यांचा ेर धरला हाेता. शाळेत विद्यार्थ्यांचा नियाेजनबध्द रिंगण साेहळा पार पडला. यावेळी हातात भगवे ध्वज घेऊन विद्यार्थी धावले. प्रा. शिवाजीराव विधाते म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये दिंडीच्या माध्यमातून आपली संस्कृती जाेपसण्याचे कार्य हाेत आहे. अशीच परंपरा कायम ठेऊन विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण दिले जात आहे. बाल वारकèयांची दिंडी पाहून पंढरपूरला आल्याचा भास निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

केडगावात रंगली राजर्षी शाहू बालक मंदिरच्या विद्यार्थ्यांची दिंडी

नगर – केडगाव येथील राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे राजर्षी शाहू बालक मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली होती. दिंडीत बाल वारकरी उत्साहात सहभागी झाले होते. संस्थेचे सचिव बबनराव कोतकर व खजिनदार प्रल्हाद साठे यांच्या हस्ते आरती करून दिंडीला प्रारंभ करण्यात आला. हातात भगवे ध्वज, टाळ-मृदूंगचा निनाद, जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करीत बाल वारकर्‍यांनी शाळे पासून ते शाहूनगर बस स्टॉप पर्यंत दिंडी काढली. विठ्ठल, रुमिणी व संतांच्या वेशभूषेत घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. बाल वारकर्‍यांनी केलेल्या ज्ञानोबा… तुकाराम…च्या गजराने केडगाव परिसर दणाणला. पांढरी टोपी, कपाळी गंध, पायजमा, बंडी या पोशाखातील लहान मुले, तर रंगीबेरेंगी साड्या परिधान करुन मुलीं दिंडीत सहभागी झाल्या होत्या. हातात टाळ घेऊन विद्यार्थ्यांनी जय हरी विठ्ठलाचा घोष केला. तर मुलींनी फुगड्यांचा फेर धरला होता. ठिकठिकाणी नागरिकांनी दिंडीचे स्वागत करुन कौतुक केले. शाळेच्या प्रांगणात अभंग, गवळण, कीर्तन, भारुड, भक्ती गीतांसह विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. बालदिंडीसाठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आर. व्ही. म्हस्के याचे मार्गदर्शन लाभले. यावेळी एम.एस. जगदाळे, के.के. भोर, एस.एन. काकडे, वाय.बी. काळे, एस.के. करांडे, ए.एस. सोनवणे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.

बारा इमाम कोठला येथे हिंदू-मुस्लिम बांधवांसाठी भंडारा

  नगर – मोहरमनिमित्त बारा इमाम कोठला येथे हिंदू-मुस्लिम बांधवांसाठी भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले होते. भंडारा वाटपाचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे, ट्रस्टचे विश्वस्त दस्तगीर सय्यद जहागीरदार, सादिक सय्यद, निसार सय्यद, निहाल सय्यद, सय्यद जुबेर, मुजावर रफा सय्यद, खालीद सय्यद, आरिफ सय्यद, जिशान जहागिरदार, हसैन सय्यद, अदनान सय्यद, साहेबान जहागिरदार, असेल सय्यद, शहबाज बॉसर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. संग्राम जगताप म्हणाले की, कोठला येथे मागील दशकापासून ट्रस्टच्या वतीने भंडारा वाटपाचे आयोजन केले जाते. या भंडार्‍याचा हिंदू-मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येने लाभ घेतात. ट्रस्टचे काम अत्यंत चांगले असून, सर्वांना बरोबर घेऊन ट्रस्ट काम करीत आहे, असे ते म्हणाले. ट्रस्टने ५०० किलोचा भंडारा आयोजित केला होता. याचा सगळ्यांनी लाभ घेतला. अन्नधान्य सर्वश्रेष्ठ दान असते व सरबत वाटप करण्यात आले. नगर जिल्ह्यातून व महाराष्ट्रातून येणारे भाविकांना अन्नदानाचा चांगला लाभ मिळाला. वायफळ खर्च न करता भाविकांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचा ट्रस्टचा मानस आहे. याचा आदर्श यंग पार्टी व सोशल लबने घ्यावा. यावेळी बोलताना दस्तगीर बडेसाहेब जहागिरदार म्हणाले, परंपरेनुसार भंडारा आयोजित करण्यात येत आहे. ट्रस्टच्या वतीने आयोजित भंडार्‍याचा लाभ सर्व जाती-धर्माचे लोक घेतात. आमची पाचवी पिढी ट्रस्टच्या माध्यमातून विविध कामे करीत आहे. कोठला परिसरात आणि असेच चालू राहणार आहे. सामाजिक काम आहे, असे दस्तगीर म्हणाले.

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाचा दिंडी साेहळा उत्साहात

  घाेड्यांच्या रथामधील स्वार विठ्ठल, रुक्मिणी व संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष नगर – रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त बाल वारकरी दिंडी साेहळ्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. हातात भगवे ध्वज, टाळ-मृदूंगचा निनाद, जय हरी विठ्ठल, ज्ञानाेबा-तुकाेबांचा जयघाेष करीत बाल वारकèयांनी शहरातून दिंडी काढली. विठ्ठल, रुक्मिणी व संतांची वेशभूषा करून घाेड्यांच्या रथात स्वार झालेल्या बाल वारकèयांनी सर्वांचे लक्ष वेधले. ज्ञानाेबा… तुकाराम… च्या जयघाेषाने शहरातील परिसर बाल दिंडीने निनादला. पांढरी टाेपी, कपाळी गंध, पायजमा, बंडी या पाेशाखातील लहान मुले, तर रंगीबेरेंगी साड्या परिधान करुन मुलीं दिंडीत सहभागी झाल्या हाेत्या. हातात टाळ घेऊन विद्यार्थ्यांनी जय हरी विठ्ठलाचा घाेष केला. तर मुलींनी ुगड्यांचा ेर धरला हाेता. ठिकठिकाणी नागरिकांनी बाल वारकऱ्यांचे स्वागत करुन काैतुक केले. कापड बाजार, नवी पेठ व अर्बन बँक मार्गे दिंडी पुन्हा शाळेत पाेहचली. शाळेच्या प्रांगणात अभंग, गवळण, कीर्तन, भारुड, भक्ती गीतांसह विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. बालदिंडीसाठी प्राथमि क विभागाचे मुख्याध्यापक शिवाजी लंके व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेत पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी पंगतीत बसून साबुदाणा खिचडी, \राळाचा एकत्र आस्वाद घेतला. दिंडीचे संचलन प्रदीप पालवे यांनी केले. दिंडी साेहळा यशस्वी करण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षिक, शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.

अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या कार्याची दखल देशपातळीवर घेतली जात आहे.

आमदार संग्राम जगताप यांचे प्रतिपादन, मॅगो ब्लड डोनेशन कॅम्प २०२४ नगर – समाजामध्ये आपण काम करीत असताना समाजाचे काहीतरी देणे लागते या भावनेतून अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशन जिल्हास्तरावर मॅगो ब्लड डोनेशन कॅम्पचे आयोजन करीत आपले कर्तव्य पार पडत असतात विचार हा सकारात्मक असला पाहिजे, त्यातून चांगले उपक्रम राबवले जातात, रक्तदान शिबिरे ही काळाची गरज असून गरजू रुग्णांपर्यंत मदतीचा हात पोहोचला जातो, नगर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असून या ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध असल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचार घेण्यासाठी येत असतात यावेळी रक्ताची आवश्यकता पडते या रक्तदान शिबिराचा उपयोग नक्कीच गरजू रुग्णांना होईल, नगर मोबाईल असोसिएशनचे सामाजिक कार्य राज्यस्तरावर असून त्याची दखल देशपातळीवर घेतली जात आहे, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले टिळक रोड नंदनवन लॉन येथे अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने ब्लड डोनेशन कॅम्प २०२४ चे उद्घाटन आ. संग्राम जगताप व जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, महाराष्ट्र मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित जगताप, जिल्हाध्यक्ष अजित पवार, गणेश भोसले, अविनाश घुले, प्रा. माणिकराव विधाते, संजय चोपडा, विकी जगताप, गिरीश अग्रवाल, कमलेश भिंगारवाला, यश मेहता, रितेश सोनीमंडलेचा, सतीश लोढा, सुदाम वाडेकर, श्रीपाल ओहस, प्रकाश भागानगरे, दगडू मामा पवार, संभा पवार, अमित बुरा, गोरख पडोळे, अतुल रच्चा, मनीष चोपडा, संजय जाधव, संतोष बलदोटा, रितेश सोनीमंडलेचा, साजिद खान, हिरा खूबचंदानी, प्रितम तोडकर, राहूल सोनीमंडलेचा आदींसह पदाधिकारी सदस्य उपस्थित होते जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, असोसिएशनचा रक्तदान शिबिराचा उपक्रम सकारात्मक आहे, जिल्हाभरातील मोबाईल व्यावसायिक एकत्र येऊन समाजासाठी आरोग्यदायी उपक्रम राबवत युवकांमध्ये ऊर्जा व प्रेरणा देणारा आहे असे ते म्हणाले अजित जगताप म्हणाले की, असोसिएशनच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून कै. भावेश सोलंकी यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर घेतले जात आहे, आता या शिबिराला मोठे स्वरूप प्राप्त झाले असून जिल्हाभरातील सुमारे ३ हजार ५०० मोबाईल व्यावसायिक व ग्राहक रक्तदान करत असतात, समाजामध्ये रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता भासत असते, त्यांना तातडीने रक्त उपलब्ध व्हावे यासाठी असोसिएशन एक दिवस आपले दुकान बंद ठेवून रक्तदान शिबिरामध्ये भाग घेत असतात या रक्ताचा उपयोग डायलेसिस, थैलासीमिया व शस्त्रक्रिया करणार्‍या रुग्णांना होईल संग्राम भैय्या सोशल फाउंडेशन यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते असे ते म्हणाले दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अजित पवार यांनी केले अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित मॅगो ब्लड डोनेशन कॅम्प मध्ये आ. संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी रक्तदान करत सामाजिक उपक्रमाला प्रोत्साहन दिले. रक्तदान करण्यासाठी शहरातील सर्व रक्तपिढ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये मोबाईल व्यावसायिक, ग्राहक व महिलांनी सहभाग घेत सुमारे ३ हजार ५०० रक्त पिशव्यांचे संकलन झाले अशी माहिती अजित जगताप यांनी दिली.