नगर – युवा पिढीला उध्वस्त करणार्या बिंगो जुगारवर जिल्ह्यात पोलीसांनी तात्काळ बंदी घालून कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) अल्पसंख्यांक आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन अल्पसंख्यांक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष गुलाम अली शेख यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे. अहमदनगर जिल्ह्यात बिंगो जुगार जोमात सुरू आहे. ऑनलाइन बिंगोमुळेच अनेक लोकांचे संसार उद२ध्वस्त होत असून, युवा वर्ग जुगार व व्यसनाच्या आहारी जात आहे.
बिंगो जुगारवर बंदी असताना देखील त्यावर कारवाई होत नाही. पोलीस प्रशासन कोणाच्या आशीर्वादाने बिंगो चालकांना अभय देत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. जिल्ह्यात शहरात व तालुयात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या बिंगो जुगारवर कारवाई करुन ते कायमचे बंद होण्यासाठी पोलीस प्रशासनाने भूमिका घेण्याची मागणी रिपाई अल्पसंख्यांक आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा ६ डिसेंबरपासून पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बालिकाश्रम रस्त्यावरील घटना; २ अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
नगर – विडी कामगार महिलेच्या गळ्यातील साडे तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने दुचाकीवरील दोघांनी ओरबाडले. शुक्रवारी (दि. १) सकाळी साडे दहाच्या सुमारास बालिकाश्रम रस्त्यावरील जय शंकर मेन्स वेअरच्या समोर ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. शारदा रघुनाथ गाजुल (वय ६७ रा. जाधव मळा, बालिकाश्रम रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी त्यांच्या घरीच बिड्या बनविण्याचे काम करतात. त्यांनी बनविलेल्या बिड्या नवरंग व्यायामशाळा, तोफखाना येथे असलेल्या कंपनीमध्ये पोहच करण्यासाठी त्या शुक्रवारी सकाळी घराबाहेर पडल्या होत्या.
बिड्या कंपनीत पोहच केल्यानंतर त्या बालिकाश्रम रस्त्यावरून घरी जात असताना जय शंकर मेन्स वेअरच्या समोर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडले. यामध्ये अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण, एक तोळ्याची सोन्याची चेन असा एक लाख पाच हजार रुपये किमतीचे साडे तीन तोळ्याचे दागिने चोरीला गेले आहेत. दागिने चोरणार्या चोरट्यांनी फिर्यादीला जोराचा ध क्का दिल्याने त्या खाली कोसळल्या. त्यानंतर चोरटे साताळकर हॉस्पिटलच्या दिशेने पसार झाले.
फिर्यादीने आरडाओरडा केल्याने घटनास्थळी गर्दी जमा झाली. त्यातील एका तरुणाने चोरट्यांचा दुचाकीवरून पाठलाग केला असता ते तोपयरत पसार झाले घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला असून बालिकाश्रम रस्त्यावरील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०१८ साली काढलेल्या परिपत्रकानुसार राष्ट्रीयपुरुष, थोर व्येी यांच्या जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करणे या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र.ज.पु.ति.२२१८/ प्र.क्र.१९५/२९ दि.२६/१२/२०१८ संदर्भानुसार श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबरला साजरी करण्याचा आदेश काढण्यात आला आहे, त्याचे पालन व्हावे. त्यानुसार ८ डिसेंबर रोजी नगर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात यावी, असे आवाहन नाशिक विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी केले आहे.
शासनाच्या आदेशाप्रमाणे शासकीय व निमशासकीय कार्यालय तसेच शैक्षणिक संस्था श्री संत संतांजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी आधिकृत फोटोचा वापर करण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. सदर फोटो फ्रेम मिळण्यासाठी श्री संताजी फ्रेम वर्क, परसराम सैंदर, शिंपीगल्ली, तेलीखुंट, नगर. श्री दत्त फ्रेमिंग वर्स, बाळासाहेब देशपांडे दवाखान्यासमोर, नगर. ओंकार सुपर स्टोअर्स, महाजनगल्ली, नगर किंवा अधिक माहितीसाठी हरिभाऊ डोळसे (मो.९८२२२७१८०७) यांच्याशी संपर्क साधावा.
नगर – मुंबई येथील दादरचे नामांतर चैत्यभूमी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन रिपाईच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. तर या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर ५ डिसेंबर पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, दानिश शेख, गुलाम शेख, संदीप वाघचौरे, संतोष पाडळे, विजय शिरसाठ, नईम शेख, अजीम खान, आदिल शेख, सुधीर गायकवाड, हुसेन चौधरी, निशांत शेख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतिस्थळ असलेले दादर (मुंबई) येथील चैत्यभूमी समस्त आंबेडकर समाजाचे ऊर्जा स्थान आहे.देशातील समस्त आंबेडकरी जनता व बौध्द अनुयायांचे हे एक श्रध्दास्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबर रोजी या चैत्यभूमीवर दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. या स्मारक स्थळाला महाराष्ट्र शासनाने अ वर्ग पर्यटन स्थळ व तीर्थस्थळाचा दर्जा २ डिसेंबर २०१६ रोजी दिला आहे. दादर परिसर चैत्यभूमीच्या नावाने ओळखला जात असून, दादरचे नामांतर चैत्यभूमी करण्याची संपूर्ण आंबेडकरी जनतेची मागणी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या नामांतरासाठी अनेकदा आंबेडकरी चळवळीतील कार्यकत्यारनी राज्य सरकारकडे मागणी केलेली आहे. मात्र त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले. शासनाचे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी व मुंबई येथील दादरचे नामांतर चैत्यभूमी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने करण्यात आली आहे. जो नामांतर होत नाही, तोपयरत उपोषण सुरु राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
नगर – नगर तालुयातील टाकळी काझी ते भातोडी गाव दरम्यान साधारण ८ किलोमीटर एवढे रस्त्याचे काम खूप मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहे. सदर रस्त्यासाठी शासनाने मागील वषारमध्ये ४ कोटी रुपये एवढा निधी मंजूर केला व रस्त्याची निविदा होऊन जवळपास आजपयरत १० महिने एवढा कालावधी झालेला आहे. वर्षभरापूर्वी निविदा होऊन निधी येऊन ठेकेदार नेमून देखील रस्त्याचे काम रखडलेल्या अवस्थेत असल्याच्या निषेधार्थ जन-आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय अभियंता संजय भावसार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, उपाध्यक्ष दीपक गुगळे, सचिव अमित गांधी, शहर अध्यक्ष शहानवाज शेख, ऋषिकेश पवार आदी उपस्थित होते. पुढे निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजी व वेळ काढून पणामुळे निधी मंजूर असतानाही रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. गावातली सर्वसामान्य नागरिकांना या रस्त्यावरून दळणवळण करताना अनेक खड२ड्यांचा सामना करावा लागत आहे.
या भागातील लोकप्रतिनिधींनी वर्षभरापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण होईल असे नागरिकांना आश्वासन दिले होते. मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामूळे आजपयरत अनेक निष्पाप नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड२ड्यांमुळे अपघात होऊन आपला जीव गमावलेला आहे. त्यामूळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी रस्त्याची पाहणी करावी तसेच येणार्या १५ दिवसाच्या आत रस्त्याचे काम करावे अन्यथा १६ व्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
नगर – व्यावसायिकाला दोन अनोळखी इसमांनी लाकडी दांडयाने मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि. २९) रात्री साडे नऊच्या सुमारास नगर- मनमाड रस्त्यावरील बोल्हेगाव ब्रिज जवळ घडली. शिवम राजेंद्र उदारे (वय २१ रा. केदारे मंगल कार्यालयाशेजारी, भिंगार) असे मारहाण झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास बोल्हेगाव येथील राजयोग इलेटि ्रक दुकानातून नगर-मनमाड रस्त्याने घरी जात असताना त्यांना ब्रिज जवळ विना नंबरच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडविले. त्या इसमांनी तोंडाला रूमाल बांधलेले होते.
दुचाकीवरील मागे बसलेल्या इसमाने फिर्यादीची कॉलर पकडली तर मागे बसलेल्या इसमाने लाकडी दांडयाने मारहाण करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मारहाण करणारे दोघे अनोळखी त्यानंतर घटनास्थळावरून पसार झाले. फिर्यादी यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार नेहुल करीत आहेत.
नगर – सा.बां.विभाग महाराष्ट ्र शासनाचे शासन निर्णय नुसार नगर तालुयातील रामा ५८ ते खारे कर्जुने-हिंगणगाव-निमगाव वाघा-केडगाव- बुरुडगाव-वाकोडी-वाळुंज ते रामा५८ (प्रजिमा- १७०) रस्त्यावर कि.मी.१५/२०० मध्ये लहान पुलाचे व जोड रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी २कोटी अंदाजीत खर्चाचे बांधकामास मान्यता देण्यात आलेली होती. त्यानुसार केडगाव वेस ते देवी रोडवर मतकर वस्ती लगत नवीन बांधकाम करणे व पोच मार्गाचे खडीकरण,मजबुतीकरण, डांबरीकरण,मुरुम बाजुपट्टी, कच्चे गटर्सचे काम प्रस्तावित करण्यात आलेले होते.
त्यासाठी तांत्रिक मान्यता र क्कम रु.१,६५,४६,३७६/- चा निधी मंजुर करण्यात आला होता. तदनंतर कार्यकारी अभियंता अहमदनगर सा.बा.विभाग यांचे कार्यालयाकडून१४/१०/२०२१ रोजी सदर कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला होता सदरील आदेशान्वये काम सुरु करण्यात आलेले होते.कार्यारंभ आदेशानुसार कामाची मुदत ही १२ महिन्यांची होती.
त्यानुसार १४/१०/२०२२ रोजीच कामाची मुदत संपलेली आहे. तरी देखील काम आजही अपुर्णच आहे. अपुर्ण असल्यामुळे त्या रस्त्यावरुन जाणार्या येणार्या नागरीकांना वर्षभरापासुन प्रचंड धुळीचा त्रास होत आहे. सा.बा.विभागातील ज्या अधिकारी व कर्मचार्यांवर नमुद काम पुर्ण करुन घेण्याची जबाबदारी सोपवलेली आहे ते सर्वजण आपल्या कर्तव्यात कसुर करीत आहेत. सदर कामाच्या बदल्यात १,२१,९४,९४३/- इतया रकमेचे काम अपुर्ण असतानाही बिल अदा करण्यात आलेले आहे. त्यामुळे अॅड.वैभव कदम यांनी जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता सा.बां.मंडळ, कार्यकारी अभियंता सा.बां.विभाग यांना कायदेशीर नोटीस पाठवून सदरचे अपूर्ण काम तात्काळ सुरू करण्यात यावे अन्यथा न्यायालयात दाद मागणार असल्याचे नोटिसीत नमूद केले आहे.
नगर-अहमदनगर मनपा क्षेत्रातील सुमारे ७७६ रस्त्यांच्या कामांमध्ये गुणवत्तेचे बनावट थर्ड पार्टी रिपोर्ट, टेस्ट रिपोर्ट तयार करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची ऑनलाईन तक्रार शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे केली होती. दरम्यान, शुक्रवारी मुंबई येथे नांगरे यांची काळे यांनी समक्ष भेट घेत सुमारे पंचवीस मिनिटे चर्चा केली. यावेळी त्यांनी पुरावे देखील सादर केले. भ्रष्टाचाराची मोठी व्याप्ती लक्षात घेता जलद गतीने याबाबत पुढील कार्यवाही करण्याची मागणी यावेळी त्यांनी केल्याची माहिती मुंबईतून दिली. वरळी येथील कार्यालयात यावर तपशीलवार चर्चा झाल्याचे काळे यांनी सांगितले. यावेळी ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे उपस्थित होते. काळे म्हणाले, नगर शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेला निकृष्ट कामे कारणीभूत आहेत.
अधिकारी, ठेकेदार आणि त्यांना पाठीशी घालणारे मनपातील काही नगरसेवक, लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी यांनी संगनमत करून बनावट गुणवत्ता प्रमाणपत्र जोडून त्या आधारे खोटी कागदपत्र तयार करून नगर शहराला खड२ड्यात घालत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. यामुळे सर्वसामान्य नगरकर मात्र जीव मुठीत धरत रोज खड२ड्यांमधून प्रवास करत आहेत. शहरात रस्ते नावाला सुद्धा उरलेले नाहीत. अनेकांना यामुळे अनेक आजार जडले.
नागरिकांना नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. या सगळ्याचे मूळ हे शहरातील ७७६ रस्त्यांच्या कामात झालेला भ्रष्टाचार यामध्ये दडलेले आहे. शासकीय तंत्रनिकेतनच्या चौकशी अहवालामध्ये बनावट गुणवत्ता प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र ते होऊन देखील मनपा प्रशासन राष्ट ्रवादी काँग्रेस पक्षाशी निगडित असणार्या ठेकेदारांना आणि अधिकार्यांना वाचविण्यासाठी भ्रष्टाचार दडपत त्यांना पाठीशी घालत आहेत. नगर शहरामध्ये चांगले रस्ते नागरिकांना मिळायचे असतील तर अशा प्रकारे भ्रष्टाचार करणारे अधिकारी, ठेकेदार यांना तपास झाल्यानंतर निश्चितपणे बेड्या पडतील. त्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल असा विश्वास काळे यांनी नांगरे पाटील यांच्या भेटीनंतर व्ये केला आहे. पुढील आठवड्यात एसपी घारगे, एसपी राकेश ओलांची भेट घेणार विश्वास नांगरे पाटील यांनी अँटी करप्शन नाशिक परीक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर – घारगे यांना याबाबत तात्काळ पुढील कारवाई करण्याचे आदेश दूरध्वनीद्वारे दिले आहेत. काळे यांनी देखील याबाबत दूरध्वनीवरून घारगे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली आहे.
बाजार पेठेतील परवाना शुल्क वाढीच्या विरोधासाठीचे दोन दिवसीय धरणे आंदोलन झाल्यानंतर पुढील आठवड्यात घारगे यांची नाशिक येथील कार्यालयात भेट घेऊन पुरावे सादर करणार आहे. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओलांकडे देखिल शासनाच्या आस्थापनेच्या नावे बनावट शि क्के, लेटर हेड, दस्तऐवज तयार केल्याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देणार असल्याची माहिती काळे यांनी दिली आहे.
नगर- नगर शहरातील बालिकाश्रम रस्त्यावर झालेल्या ओंकार उर्फ गामा भागानगरे खून प्रकरणातील फरार आरोपी बबलू सरोदे याच्यावर शनिवारी (दि.२) सकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी त्याला सावेडी नाका येथून उचलून जबर मारहाण करत माळीवाडा येथील फुलसौंदर चौकात आणून टाकले. या हल्ल्यात सरोदे याचा पाय फ्रॅचर झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ओंकार उर्फ गामा भागानगरे याचा २० जूनला पहाटे १ वाजण्याच्या सुमारास तलवारीने वार करत खून करण्यात आला होता. या खुनी हल्ल्यातील मुख्य आरोपी गणेश हुच्चे, नंदू बोराटे यांच्यासह संदिप गुडा, रवी अप्पासाहेब नामदे, वैभव बबन हुच्चे, सागर प्रवीण गुडा, अनिकेत सोळंके या आरोपींना यापूर्वीच पोलिसांनी अटक केलेली आहे. यातील बबलू सरोदे हा तेव्हापासून फरार होता. तो इतक्या दिवस पुणे, मुंबई येथे राहत होता. त्याची बहिण उपनगरात राहत असल्याने तिच्या घरी जाण्यासाठी तो शनिवारी (दि.२) सकाळी १० च्या सुमारास सावेडी नाका परिसरात उतरला.
त्याला तेथे काही जणांनी पकडले व उचलून बालिकाश्रम रोडमार्गे लाकडी दांडयाने बेदम मारहाण करत या खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या गणेश हुच्चे याच्या माळीवाडा परिसरातील फुलसौंदर चौकात असलेल्या हॉटेलसमोर आणून टाकले. या घटनेची माहिती मिळताच कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव व पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक माळीवाडा येथे दाखल झाले. पोलिसांनी जखमी सरोदे याला उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यात सरोदे याचा पाय फ्रॅचर झाला असून शरीरावर अन्य ठिकाणीही मुकामार लागलेला आहे. या हल्लेखोरांची नावे बबलू सरोदे याने पोलिसांना सांगितली असून, त्याच्यावर उपचार सुरु असल्याने त्याचा सविस्तर जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांनी सांगितले.
रताळ्याचा राजस पाकसाहित्य : दीड किलो रताळी, दोन
नारळांचा चव, सहा-सात वाट्या साखर,
पाव किलो खवा, ट्रुटी-फ्रुटी, आवडीनुसार
सुकामेवा, रताळी परतण्याइतपत साजूक तूप,
दोन वाट्या दूध.
कृती : रताळी स्वच्छ धुऊन, सालं
काढून टाकावीत, किसणीवर किसून घ्यावीत.
साजूक तुपावर कीस चांगला परतावा. नंतर
नारळाचा चव घालून परतावा. नंतर खवा
घालून परतावा.
साखर+दूध घालून पुन्हा परतावा
आणि हलव्याइतपत घट्ट झाल्यावर खाली
उतरवावा.
खाली उतरवून त्यात आवडीनुसार
काजू, बदाम, टुटीफ्रुटी घालून सजवा. जास्त
गोड हवं असल्यास साखर जास्त घालावी.
मात्र रताळ्यालाही अंगची गोडी असते हे
लक्षात घेऊन साखरेचं प्रमाण ठरवावं.
वेफर्स पांढरे राहण्यासाठी
* बटाट्याचे वेफर्स बनवताना पाण्यात
चिमूटभर तुरटी टाकली तर वेफर्स पांढरे
राहतात.
* दूध पूर्ण दिवस चांगले राहण्यासाठी
त्यात छोटी वेलची पूड टाकावी.
* प्रफुल्लित, आनंददायक
वातावरणासाठी रात्री झोपताना सौम्य
सुगंधाचा सेंट, अगरबत्ती, सुगंधित फुले यांचा
वापर करावा.
* मधुर संगीत निर्माण करणारे
भिंतीवरील घड्याळ घरातील शुभ सकारात्मक
उर्जेचे संतुलन करते, असे फेंगशुईने मानले
आहे. किचनमध्ये जर एखादा वास्तुदोष असेल
तर त्यात दगडी व धातूची दक्षिणमुखी गणेश
प्रतिमा स्थापन करावी.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
गुलाबी थंडी आणि कोवळा लुसलुशीत हुरडा, निसर्गरम्य वातावरण यांचे अनोखे नाते आहे. नगर-दौंड रोडवरील पांजरपोळ गोरक्षण संस्थेने सुमारे ४१ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात प्रथमच हस्तीमल मुनोत व स्व.शांतीलाल बोरा यांच्या संकल्पनेतून हुरडा उत्सव सुरू केला. शहरातील लोकांची आवड ओळखून दूरदृष्टीने सुरू केलेला हा उपक्रम आज राज्यात, देशात लोकप्रिय झाला आहे. यंदाही संस्थेत हुरडा पार्टी उत्सव सुरू झाला आहे, अशी माहिती संस्थेचे मानद सचिव किशोर मुनोत यांनी दिली. हुरडा उत्सव शुभारंभ संस्थेचे उपाध्यक्ष श्रीगोपाल धूत यांच्या हस्ते हुरड्याच्या भट्टीची विधीवत पूजा करून करण्यात आला. ऊसाच्या रसाच्या चरकाची पूजा प्रेमराज बोथरा यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत, उपाध्यक्ष सतीश डुंगरवाल, शरद मुनोत, दैनिक नवा मराठाचे संपादक सुभाष गुंदेचा, किशोर मुनोत, मानद सहसचिव मणिकांत भाटे, नरेंद्र लोहाडे, कार्यकारी मंडळ सभासद नंदलाल मणियार, संजय बोरा, प्रविण गांधी, प्रेमराज बोथरा, सी.ए., आयपी अजय मुथा, मनोज गुगळे, गौतम मुनोत, सल्लागार अॅड. शरद पल्लोड, निमंत्रित विजय कोथिंबीरे, अमोल पोखरणा, अभय गांधी, भूषण भंडारी, आलोक मुनोत, व्यवस्थापक महेश मुनोत, उप व्यवस्थापक राजकुमार पितळे आदी उपस्थित होते. या वर्षी अत्यंत कमी पावसामुळ सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्यास सुरुवात होत आहे. याही परिस्थितीत संस्थेने झालेल्या थोड्याफार पावसावर व संस्थेतील विहीर/बोअरवेलच्या पाण्यावर हुरड्याची पेरणी केली.
हुरडा पार्टीची सुरुवातच प्रथम संस्थेने केल्यानंतर आज सर्वत्र महाराष्ट्रात त्यातही प्रामुख्याने अहमदनगर, पुणे, बीड व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात हुरडा महोत्सवाची नोव्हेंबर अखेरपासून ते जानेवारी अखेरपर्यंत लगबग मोठ्या प्रमाणावर पहावयास मिळते. पुर्वी सणावाराच्या, कार्यक्रमाच्या निमित्ताने नातेवाईक, मित्र परिवार एकमेकांना भेटत होते, त्याचप्रमाणे हुरडापार्टीच्या निमित्ताने मुद्दामहून एकत्र भेटत आहेत. पूर्वीच्या काळामध्ये एकत्र कुटुंबपध्दती होती, परंतु आजच्या काळामध्ये या स्पर्धेच्या युगात इच्छा असूनही कुटूंब एकत्र राहू शकत नाही. शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने लोकांना घरापासून दूर जावे लागते. परंतु हुरडा पार्टीच्या निमित्ताने लोक एकमेकांना निश्चितच भेटतात. तसंच मित्र मैत्रिणींची २५-२५ वर्षे भेट होत नाही. परंतु आजकाल बरेच माजी विद्यार्थी हुरडा पार्टीच्या निमित्ताने एकत्र येवून जुन्या आठवणींना उजाळा देतात हेच खरे हुरडा पार्टीचे यश म्हणावे लागेल. हुरडा पार्टी हे सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे साधन झालेले आहे. आजच्या काळात लोकांमध्ये हॉटेलिंग, फास्टफुड खाण्याचे प्रमाण वाढले आहे व त्याचे दुष्परिणाम वेगवेगळ्या आजाराच्या निमित्ताने भेडसावत आहे. त्याच्यापुढे अत्यंत सात्विक, नैसर्गिक व आरोग्यावर कुठलाही परिणाम न करणारा हुरडा व त्यासोबत महाराष्ट्रीयन पध्दतीचे जेवण, ऊसाचा ताजा रस हे अत्यंत आवडीने लोकांच्या पसंतीस उतरले आहे. संस्थेच्या दुध मोगरा हुरड्याची मजाच काही न्यारी व भारी आहे. संस्थेच्या शेतात पिकवलेला, त्यास संस्थेतील गोमातेच्या शेणखताचा तडका दिलेला हुरडा म्हणजे एक पर्वणीच आहे. आज काही लोकांच्या मते संस्थेमध्ये हुरड्याबरोबर बाकीचे मनोरंजन कमी असेल, परंतु हुरड्याचा खरा आस्वाद खरे हुरडाशौकीन संस्थेतच घेवू शकतात. आज सर्वत्र जरी हुरडा पार्टीस व्यावसायिक स्वरुप आले असले तरी संस्थेने संस्थेस प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत करणार्याया देणगीदार, नागरिक यांची सोय व्हावी यासाठी संस्थेत पारंपारिक जुन्या पध्दतीप्रमाणे हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात येते.
काळानुरुप गरजेप्रमाणे संस्था त्यामध्ये आवश्यक ते बदल करतच असते. लहान मुलांना मोबाईलपासून परावृत्त करून त्यांनी मैदानावर खेळावे, बागडावे यासाठी संस्थेमध्ये एक चिल्ड्रन पार्क विकसित करण्याच्या दृष्टीने संस्थेचे प्रयत्न चालू आहे. याव्दारे हुरडा पार्टीस येणार्या मुलांना धमाल मस्ती करता येईल. वर्षभर लहान मुले आपल्या पालकांच्या बरोबर संस्थेत येवून गोमातेच्या सानिध्यात खेळाचा आनंद घेतील. संस्थेमध्ये हुरडा पार्टीच्या सिझनमध्ये नाष्टा, महाराष्ट्रीयन पध्दतीचे जेवण, राजस्थानी दाळवाटी, पंजाबी मेनु याची व्यवस्था आहे. तसेच हुरड्याबरोबर लागणारी चटणी, रेवडी, गोडीशेव, चहा, रस, कॉफी, वडा याचीही उपलब्धता आहे. संस्थेचा परिसर हा शहरापासून अगदी जवळ, निसर्गरम्य व विशेषतः महिलांसाठी अत्यंत सुरक्षित असा आहे. त्यामुळे हुरडा पार्टीच्या मोसमात किटी. पार्टी, भिशी, गेट टुगेदर यासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय असते. नागरिकांना आवाहन करण्यात येते की, संस्थेच्या हुरडा पार्टीचा आस्वाद घेवून स्वार्थ आणि परमार्थ साधावा. बुकिंगसाठी (०२४१-२४७०९३२, २४७१७३२), राजकुमार पितळे – मो. ९८२२२९४८३१, महेश मुनोत मो. ९१२०६३९२३०, शैलेश गुंदेचा – मो. ९२७०१२०३६९ या नंबरवर संपर्क करावे.
मातंग समाजाला अ, ब, क, ड नुसार आरक्षणाची वर्गवारी करण्यासह इतर प्रलंबीत मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांनी पुणे ते नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या पायी पदयात्रेच्या पार्श्बभूम ीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. नागपूर पर्यंत चालत जाताना पायातून रक्त येऊन देखील पुढील प्रवास सुरु ठेवणार्या कसबे यांच्या पद यात्रेसंदर्भात असंवेदनशीलता दाखविणार्या सरकारचा आंदोलकांनी तोंडाला काळे पट्ट्या बांधून निषेध नोंदवला.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुरेश शिरसाठ, महिला जिल्हाध्यक्षा अनिता नेटके, शहराध्यक्ष पावलस पवार, जिल्हा संपर्कप्रमुख जयवंत गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष राजाराम काळे, जिल्हा संघटक लखन साळवे, शहर संपर्क प्रमुख संतोष उमाप, तालुका उपाध्यक्ष सिताराम शिरसाठ, अभिजीत सकट, ज्ञानेश्वर जगधने, लक्ष्मण पेठारे, सिताराम शिरसाठ, आनंदराज नेटके, रोहित लोखंडे, छाया नेटके, काजल ससाणे, शांताबाई नेटके, वैशाली ससाणे, लताबाई नेटके, सुनिता नेटके, मनीषा नेटके, मंदाबाई नेटके, हिराबाई नेटके आदी सहभागी झाले होते. विष्णू कसबे यांनी समाजातील प्रलंबीत प्रश्नांसाठी लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुणे गंजपेठ येथील तालीम पासून ते नागपूर पर्यंत आरक्षण क्रांती पदयात्रा काढली आहे. ११५० कि.मी. त्यांचा पायी प्रवास आहे. नागपूरच्या दिशेने पायी जाताना चालून चालून त्यांचे पाय रक्तबंबाळ झाले आहे.
समाजाला न्याय मिळावा म्हणून स्वतःचा विचार न करता ते मार्गक्रमण करत आहे. परंतू शासनाने या पययात्रेची दखल न घेता असंवेदनशीलता दाखवली असल्याचे आंदोलकांनी यावेळी स्पष्ट केले. तर अनुसूचित जातीला एकत्रित १३ टक्के आरक्षण असून, अ,ब,क,ड नुसार आरक्षणाची वर्गवारी करावी, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावे, आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव राष्ट्रीय पुरुषांच्या यादीत समावेश करावे, लहुजी वस्ताद साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळ बंद पडल्याने समाजातील युवकांवर बेरोजगारीचे संकट ओढवले असताना हे महामंडळाला भरीव आर्थिक तरतूद करून पुन्हा सुरु करावे या प्रमुख मागण्या घेऊन नागपुरच्या हिवाळी अधिवेशनवर निघालेल्या पदयात्रेच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. या पययात्रेची सरकारने दखल न घेतल्यास संपूर्ण राज्यात मातंग समाजाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा सुनिल शिंदे यांनी दिला आहे.
शहरातील व्यावसायिकांकडून नव्याने परवाना शुल्क आकारण्या संदर्भात महापालिकेने शासनाची मंजूरी घेतलेली नाही. तर दर करची सूची प्रसिद्ध न करता व्यावसायिकांकडून हरकती देखील मागविण्यात आलेल्या नाहीत. हा विषय महापालिकेच्या बजेट मध्ये न घेता एकदम स्थायी समिती व महासभेत घेण्यात आला असून, परवाना शुल्क आकारण्याचा निर्णयच बेकायदेशीर असल्याचा खुलासा काँग्रेस कमिटीचे राज्य सचिव तथा माजी नगरसेवक दीप चव्हाण व नगरसेविका शिला चव्हाण यांनी केला आहे. स्थायी समितीने १५ फेब्रुवारी २०२३ रोजी व्यवसाय परवाना शुल्क आकारण्यास संदर्भात ठराव मंजूर केला. तर ९ मे २०२३ रोजीच्या महासभेत व्यवसाय परवाना शुल्कचा निर्णय एकदम आणण्यात आला. परवाना शुल्क आकारण्यासाठी ३० ते ४० आस्थापना नसून, ३५५ आस्थापनांचा समावेश यामध्ये आहे. तर शासनाने सलून, गटई व मोची कामगारांना यामधून वगळलेले आहे. मात्र त्यावेळी ३५५ आस्थापनाची सूची महासभे समोर आली नाही. सूची नसल्याने नगरसेवकांनी चर्चा केली नाही. कोणत्या व्यवसायावर कर लावायचा या संदर्भात माहिती दिली गेली नाही.
महापालिका अधिनियम ९९ च्या आधारे सन २०२३-२४ च्या बजेट मीटिंगमध्ये ही दर सूची सादर करणे आवश्यक होते. परंतु प्रशासन व्यापारी व नगरसेवकांची दिशाभूल करून हा कर व्यावसायिकांच्या माथी मारत आहे. बजेटच्या महासभेत परवाना शुल्कचा ठराव आलेला नव्हता. तो दोन महिन्यानंतर आला व दर करवर महासभेत चर्चा झाली नाही. या संदर्भात धोरण ठरविणे आवश्यक होते, असे झाले नाही. हा ठराव बजेटमध्ये घेतलेला नाही, याची प्रसिद्धीही केलेली नाही विशेष म्हणजे या संदर्भात शासनाची देखील मंजुरी घेतलेली नसल्याने हा ठराव बेकायदेशीर असल्याचा आरोप दीप चव्हाण यांनी केला आहे. १० ऑटोंबर २००६ शासन निर्णयाने अकोले महापालिकेच्या धर्तीवर सदर शुल्क लावण्याचा ठराव घेण्यात आलेला आहे. अकोले मनपाने शासनाच्या नगर विकास विभागाच्या शासन निर्णयाद्वारे शासनाची परवानगी घेतली आहे. मात्र अहमदनगर महापालिकेने या संदर्भात शासनाची मंजुरी घेतलेली नाही. दर सूचीचा ठराव शासनाकडे पाठविलेला नाही.
व्यवसाय परवाना शुल्क महापालिकेला घेता येत नाही, कारण मुंबई दुकान स्थापना नोंदणी दाखला कायदा १९४८ जिवंत आहे. तो शासनाने रद्द केलेला नाही, त्यानुसार सगळे व्यावसायिक कर भरतात. यामुळे पुन्हा डबल कर भरण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मार्केट विभागाने या कराचा प्रस्ताव देऊन एक ते चार झोन मध्ये सर्व्हे करण्याचे स्पष्ट केले होते. त्याचे सर्व्हे देखील झालेला नाही. सन २००४ पासून शासन व्यावसायिकांची स्वतंत्रपणे नोंदणी करत आहे. सर्व व्यापारी कायदे अंतर्गत शुल्क भरत आहे. त्यामुळे एक कायद्याचे दोन शुल्क कसे भरणार?, अन्न औषध परवाना देखील व्यावसायिक शासनाकडे शुल्क भरुन घेत आहे. नव्याने लादल्या जाणार्या व्यावसायिक करच्या यादीत अनेक व्यवसाय शहरातच अस्तित्वात नसल्याचे चित्र आहे. अभ्यास न करता सूचीत अकोल्याचे व्यवसाय नगरमध्ये दाखविण्यात आले आहे. १० ते १५ हजारांचे वार्षिक कर असलेले तीन ते चारच व्यवसाय आहे. यामध्ये मंगल कार्यालय, वाईन शॉप, व थ्री व फाईव्ह स्टार हॉटेलचा समावेश आहे.
महापालिकेने संभ्रम परिस्थिती निर्माण केली असून, याचा खुलासा सादर करण्याचे चव्हाण यांनी प्रशासनाला आवाहन केले आहे. अकोला महापालिकेने परवाना शुल्क आकारताना या संदर्भात स्थानिक वृत्तपत्रात सूचना प्रसिद्ध केली. महापालिकेचे कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर याबाबत जाहीरनामा चिटकून पूर्व प्रसिद्ध केली. तर यावर नागरिकांचे हरकती मागविण्यात आले. या प्रकरणी कोणत्याही हरकती प्राप्त न झाल्याचे प्रस्तावत नमूद आहे. अकोले महानगरपालिकेने महासभेच्या मान्यतेनंतर परवाना शुल्क लागू केला. तर परवाना शुल्क लागू करण्याबाबत शासनाची मंजुरी देखील घेतली. याप्रमाणे अहमदनगर महापालिकेने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. हा शासन निर्णय फक्त अकोले महापालिके पुरता मर्यादीत आहे.
शासनाने फक्त अकोले महापालिका पुरते शासन निर्णयात नमुद केले आहे. तो निर्णय आपल्या महापालिकेस लागू करण्यासाठी शासनाची मंजूरी आवश्यक आहे. तशी मंजुरी आपल्या महापालिकेने घेतलेली नाही. महापालिका अस्तित्वात आल्या पासून या संदर्भात कर का लावला नाही? तेंव्हा प्रशासनाला उत्पन्नाचे साधन दिसले नाही, यासाठी २० वर्ष थांबल्याचे चव्हाण यांनी म्हंटले आहे. परवाना शुल्क संदर्भात स्थायी समिती व महासभेत ठराव झाला असल्यास तो लागू करू नये. नगरसेवकांची मुदत ३१ डिसेंबर रोजी संपत आहे. १ जानेवारीला प्रशासक येणार आहे. प्रशासकाने ठराव मान्य केला, तर हे व्यावसायिकांवर अन्याय होणार आहे. यासाठी हा ठराव मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम ४५१ खाली शासनाकडे पाठवून विखंडित करण्याची मागणी दीप चव्हाण व शिला चव्हाण यांनी केली आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हौतात्म्य पत्करणारे छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या अहमदनगरमधील स्मारकासाठी भरीव निधी मिळावा यासाठी आम्ही मागील १५ वर्षापासून संघर्ष करत आहोत. तथापि आतापर्यंत एकाही शासनाने आणि मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतलेली नाही. याउलट छत्रपती संभाजीराजे यांच्या खासदार निधीतून मंजूर झालेला निधीही शासनाने अडकून ठेवला आहे. त्यामुळे शिवप्रेमींच्या सहनशिलतेचा आता अंत झाला असून, स्मारकासाठी भरीव निधी मंजूर करावा, या मागणीचे रक्ताने लिहिलेली पत्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आली आहेत. शिवजयंतीपर्यंत निधी मंजूर न केल्यास शिवप्रेमी मुंबईपर्यंत पायी जाऊन मंत्रालयासमोर आपल्या ‘रक्ताचा सडा’ शिंपडतील, असा इशाराही ‘स्मायलिंग अस्मिता’चे यशवंत तोडमल यांनी दिला आहे. छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या नगरमधील स्मारकासाठी ‘स्मायलिंग अस्मिता’ संघटनेचे कार्यकर्ते मागील अनेक वर्षापासून निधी जमा करत आहेत.
स्थानिक लोकप्रतिनिधींच्या तुटपुंज्या निधीवर सध्या स्मारकाचे काम चालू आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रीपदावरील नेतेमंडळी शाहू, फुले, आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणत सर्वत्र फिरत असतात. मात्र शाहू महाराज यांचे वडील असलेले छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मारकाकडे दुर्लक्ष करत आहे. या स्मारकासाठी संभाजीराजे यांनी खासदार निधीतून ३० लाख रुपयांचा निधी दिला. त्यापैकी केवळ १० लाख रुपयेच आतापर्यंत मिळाले असून, शासनाने २० लाख रुपयांचा निधी अडकून ठेवला आहे. स्मारक आणि विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणार्या लायब्ररीसह इतर कामासाठी साधारण दीड कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. ही मागणी शासनपातळीवर किरकोळ आहे. मात्र शासन त्याबाबत सकारात्मक दिसत नाही. मुख्यमंत्री राज्यभर इतर पुतळ्यांचे अनावरण करत फिरत आहेत. चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी निधी देण्याबाबत त्यांनी दखल घ्यावी यासाठी आज काही कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताने पत्रे लिहून मुख्यमंत्री शिंदे यांना पाठविली आहेत. या पत्रात यशवंत तोडमल, धिरज कुमटकर, शुभम पांडुळे यांनी म्हटले आहे की, छत्रपती चौथे शिवाजी महाराज हे छत्रपती शाहू महाराज यांचे वडील होत. हा महाराष्ट्र छत्रपतींमुळे टिकला आहे. मोठा झाला आहे. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही या स्मारकाला भेट द्या. निधी नसल्याने विद्यार्थी सहाय्यता केंद्राचे काम रखडले आहे.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी चौथे शिवाजी महाराज यांनी बलिदान दिले आहे. रक्त सांडले आहे. परंतु त्यांचा इतिहास लोकांना माहिती नाही. स्मारकाचा इतिहास पुढे आणण्यासाठी आम्ही १५ वर्षांपासून काम करतोय. या स्मारकासाठी भरीव निधी द्यावा अन्यथा शिवजयंतीनंतर मुंबईला येऊन मंत्रालयावर रक्ताचा सडा शिपडू, असे या पत्रात नमूद केले आहे. शासनाने निधीची तरतूद करावी अन्यथा शिवजयंतीनंतर शंभराहून अधिक कार्यकर्ते, शिवप्रेमी स्वतःच्या रक्ताच्या पिशव्या हातात धरून नगर ते मुंबईपर्यंत पायी येऊन मंत्रालयावर रक्ताचा सडा शिंपडला जाईल, असा इशारा देतानाच शासनाला शब्दाची किंमत नाही पण रक्ताची किंमत आहे की नाही हे आम्ही पाहणार असल्याचे यशवंत तोडमल यांनी म्हटले आहे.
काका आणि पुतण्या…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्ताने लिहिलेली पत्रे पाठविताना शिवप्रेमींनी मुख्यमंत्र्यांना ‘काका’ म्हटले आहे तर स्वतःचा उल्लेख ‘पुतण्या’ म्हणून केला आहे. काकाय्पुतण्याच्या नात्यात एक जवळीक असते. या नात्याला राजकारणातही एक वेगळे ‘वलय’ प्राप्त झालेले आहे. निधी मंजूर करण्यासाठी शिवप्रेमींनी या नात्याचा उल्लेख केल्याने तो चर्चे चा विषय झाला आहे.
शहरातील थकबाकीदार मालमत्ताधारकांना सरसकट शास्तीमाफी- मध्ये ७५ टक्के सूट देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, त्याची मुदत ९ डिसेंबरपर्यंत ठेवण्यात आल्याची माहिती आयुत डॉ. पंकज जावळे यांनी दिली आहे. यापूर्वी ५० हजार रुपयांच्या आतील थकबाकीदार मालमत्ताधारकांना शास्तीत ७५ टक्के सूट देण्यात आली होती.
परंतु सरसकट शास्तीमाफीची मागणी होवू लागल्याने शुक्रवारी (दि.१) आयुत डॉ. जावळे यांनी सरसकट शास्तीमाफीचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या महसुलात वाढ होणार असून, थकबाकीदारांनाही त्याचा फायदा मिळणार आहे.
अनेक भागात शेतमालाचे मोठे नुकसान; तर दुष्काळी भागाला पाणी टंचाईपासून दिलासा
नगर जिल्ह्याच्या विविध भागात रविवार (दि.२६) पासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत थैमान घातलेले असून हा अवकाळी पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील दक्षिण भागाला गुरुवारी (दि.३०) रात्री पुन्हा एकदा मुसळधार वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. या अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी शेतकर्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर दुष्काळाचे सावट असलेल्या भागाला जोरदार पावसामुळे पाणी टंचाई पासून दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्थिती कुठे खुशी तर कुठे गम अशी झाली आहे. थंडीची चाहूल लागण्याआधीच अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होताच. गेल्या रविवार (दि.२६) पासून सलग ५ दिवस हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरत आहे. जिल्ह्यात दररोज अवकाळी पाऊस कोसळत आहे.
गुरुवारी (दि.३०) रात्री १० वाजेनंतर नगर शहर परिसरासह तालुयात आणि जिल्ह्याच्या दक्षिण भागात जोरदार पाऊस झाला. नगरच्या नालेगाव मंडलात २६.८ मिमी, सावेडी ५७ मिमी, कापूरवाडी ३९.८ मिमी, केडगाव ४५.५ मिमी, भिंगार १५ मिमी, नागापूर १६.५ मिमी, जेऊर ५५.५ मिमी, चिचोंडी पाटील २३.५ मिमी, वाळकी १६.३ मिमी, चास ५१.३ मिमी, रुईछत्तीसी १४.३ मिमी असा नगर शहर आणि तालुयात सरासरी ३२.८ मिमी पाऊस झाला आहे. याशिवाय दक्षिण नगर जिल्ह्यात पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा या तालुयांमध्येही मुसळधार पाऊस झाला. उत्तरेतील अकोले वगळता राहुरी, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता या तालुयातही कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली.
जिल्ह्यात तालुकानिहाय झालेला अवकाळी पाऊस
जिल्ह्यात तालुकानिहाय झालेला अवकाळी पाऊस नगर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद जामखेड तालुयात झाली आहे. तेथे ३७.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय नगर ३२.८, पारनेर २२.१ मिमी, श्रीगोंदा २७.२ मिमी, कर्जत २१.८ मिमी, शेवगाव २१.८ मिमी, पाथर्डी २०.२ मिमी, नेवासा १८.१ मिमी, राहुरी ४.२ मिमी, संगमनेर ३.५ मिमी, कोपरगाव १.८ मिमी, श्रीरामपूर १.२ मिमी, राहता १.८ मिमी असा जिल्ह्यात सरासरी १६ मिमी अवकाळी पाऊस झाला आहे
शके १९४५ शोभननामसंवत्सर, कार्तिक कृष्णपक्ष, पुष्य १८|५४सूर्योदय ०६ वा. २७ मि. सूर्यास्त ०६ वा. १४ मि.मेष : अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. आर्थिक स्थिती संमिश्र
राहील. मनोरंजनावर खर्च होईल.
वृषभ: देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. हसत खेळत दिवस
जाईल. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.
मिथुन : व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा.
कुटुंबातही वेळ चांगला जाईल. राजकीय कार्ये पूर्ण होतील.
कर्क: सर्व कामे योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आज आपण नियोजन कराल.वाहने काळजीपूर्वक चालवा. आर्थिक
विषयांमध्ये सावधगिरी बाळगा.
सिंह: महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले सहकार्य
तुमची उत्तम राजकीय जाण दाखवेल. देवाणय्घेवाणीबाबत काळजीपूर्वक व्यवहार करा.
कन्या : कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. आरोग्य उत्तम
राहील. शत्रूंपासून सावध राहा.
तूळ : कामात अत्यंत व्यस्त राहाल.खर्च वाढेल. महत्वाच्या कार्यात यश मिळेल.
आपल्या प्रकृतीची काळजी घ्या.
वृश्चिक : इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. एखाद्या महत्वाच्या
प्रोजेटमध्ये यश मिळेल.
धनु : अधिकार्यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. विरोधक पराभूत
होतील. आरोग्य उत्तम राहील. पत्र मिळेल.
मकर: इतर लोकांना तुमचे विचार पटतील. नोकरदारांनी कामात लक्ष द्यावे.
अधिकारी आपणास सहकार्य करतील.
कुंभ : मनोरंजनावर खर्च होण्याची शयता आहे. प्रेमात स्थिती अनुकूल राहील.
महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा.
मीन: वरिष्ठ लोकांचे कामात सहकार्य मिळेल. नवीन करार होतील. नोकरदार
व्यक्तींसाठी स्थिती अनुकू राहील. वडिलधार्यांचे सहकार्य मिळेल.
संकलक: अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.