
नगर – जन्म, मृत्य, निसर्ग हे देवाच्या हातात आहे. पण जन्म आणि मृत्य यांच्या मधला जो काळ आहे. तो मानवाच्या हातात आहे. त्याला तीन टप्पे आहेत, पहिला बालपण, दुसरा तरुणपण व तिसरा म्हतारपण.
बालपण हे आई-वडीलांनी दिलेल्या संस्कारावर अवलंबून आहे. तरुणपण हे तुमच्या कर्तृत्व शक्तीवर अवलंबून आहे. आणि म्हतारपण हे केलेल्या पुण्याईवर अवलंबून आहे. देवाची पुजा केल्यावर देव मिळेलच अस नाही, पण आई-वडीलांची सेवा केल्यावर देव भेटणारच यात मात्र शंका नाही. संपत्ती मिळाल्यावर
सुख मिळेल, पण समाधान मिळेलच अस नाही, पण समाधान मिळाल्यावर देव मिळेलच यात शंका नाही, असे आपल्या किर्तनातून ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांनी सांगितले.
दातरंगे मळा येथील श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान व पर्जन्येश्वर महादेव मंदिर आयोजित किर्तन सोहळ्यात ह.प.भ इंदोरीकर महाराज बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक अर्जुन दातरंगे, भिमराज दातरंगे, अनिल दातरंगे, ठकाराम दातरंगे, गुलाब दातरंगे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदिप दातरंगे, अशोक दातरंगे, सुरेश दातरंगे, दत्ता दातरंगे, गणेश दातरंगे, अशोक आगरकर, रमेश आगरकर, स्वप्निल दातरंगे, बाबा दातरंगे, चंद्रकांत दातरंगे, बंडू दातरंगे, बाळासाहेब दातरंगे, भरत आगरकर, रोहिदास दातरंगे, दिलीप दातरंगे, सोनू दातरंगे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमप्रसंगी आमदार संग्राम जगताप, माजी
महापौर रोहिणीताई शेंडगे, संपर्कप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, जिल्हापमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख सचिन जाधव, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सभापती गणेश कवडे, गटनेते संजय शेंडगे, सहसचिव
विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, शाम नळकांडे,
सचिन शिंदे, संतोष ग्यानप्पा, परेश लोखंडे, अजय चितळे, अनिल बोरुडे, संजय चोपडा, सुरेश तिवारी, महेश लोंढे, अरविंद शिंदे, दत्ता कावरे, विष्णु फुलसौंदर, सूरज जाधव, सुनिल त्रिपाठी, संजय शेळके, विठ्ठल जाधव, संजय सांयगावकर, रमेश खेड़कर, अरुण झेंडे, अशोक दहीफळे, शंकर
ठाणगे , राजमल मुनोत, बबन खरमाळे, देवराम मेहेत्रे आदी उपस्थित होते.
यावेळी संदिप दातरंगे म्हणाले की, आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर विविध
समाजोपयोगी उपक्रम राबवित असतो. त्यामध्ये धार्मिक, अध्यात्मिक, शैक्षणिक, क्रिडा विषयक, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, नागरीकांना मदतीचा हात आदींच्या माध्यमातून जनसेवा करत आहोत. सुखी जीवन
जगण्यासाठी संतांचे विचार आपल्या सोबत असायला हवे. तसेच नागरीकांना संतांचे विचार समजावे, त्यासाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्षापासून या किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले