नगर – राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री १०० दिवस उपक्रमात अहिल्यानगर महानगरपालिका प्रभावी अंमलबजावणी करत
असल्याची नोंद क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या (टउख) शिष्टमंडळाने घेतली. नगरविकास विभागाच्या पहिल्या फेरीच्या
मूल्यांकनात राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांपैकी केवळ ६ महानगरपालिका शॉर्टलिस्ट करण्यात आल्या असून, त्यामध्ये अहिल्यानगरचा समावेश करण्यात आला आहे.
या ६ महानगरपालिकांमध्ये पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, उल्हासनगर आणि अहिल्यानगर यांचा समावेश आहे. या शॉर्टलिस्ट झालेल्या महापालिकांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या महत्वाकांक्षी १०० दिवस
कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्रयस्थ संस्था असलेल्या टउख QCI (Quality Council of India) मार्फत पथक नेमण्यात आले होते. या अनुषंगाने शुक्रवारी राजेश माहेश्वरी, वर्षा मिश्रा, दिनेश भट या अधिकार्यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेला भेट देऊन विविध योजनांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे, उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, उपायुक्त डॉ. संतोष टेंगले, मुख्य लेखाधिकारी सचिन धस, सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे तसेच संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते. महानगरपालिकेतून नागरिकांसाठी सुरू असलेल्या नवकल्पनाशील उपक्रमांची आणि सुधारित सेवा पद्धतींची माहिती आयुक्त डांगे यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून दिली. यामध्ये शहरी पायाभूत सेवा, डिजिटल नागरी सेवा केंद्र, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील उपक्रम, कचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा यांसारख्या घटकांचा समावेश होता.
केंद्र सरकारशी संलग्न असलेल्या टउख संस्थेचे उद्दिष्ट सरकारी यंत्रणांमधील कामकाजाची गुणवत्ता तपासून शासनास अहवाल सादर करणे हे आहे. देशभरातील निवडक महापालिकांची निवड करून संस्थेमार्फत अशा प्रत्यक्ष पाहण्या केल्या जातात. विशेष तपासणी : महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दोन्ही मजले अधिकार्यांनी पाहिले. अभिलेखांचे
सुसूत्रीकरण, नागरिक बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह, माहिती फलक, पिण्याच्या पाण्याची सोय, दिव्यांगांसाठी सुविधा, शासनाच्या योजनांची माहिती अशा विविध बाबींचा समावेश होता. महापालिकेतील प्रत्येक विभागातील व परिसरातील स्वच्छता व टापटीपपणा पाहून पाहणी अधिकार्यांनी समाधान व्यक्त केले. राज्यातील २९ महापालिकांमधून अहिल्यानगर महानगरपालिकेची निवड या पाहणीसाठी झाल्याने, महापालिकेच्या प्रशासनासाठी ही बाब अत्यंत गौरवाची आणि
प्रेरणादायी ठरली असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.













