नगर – ओंजळभर पाणी, मूठभर दाणे, ठेवाल का कुणी, आमच्यासाठी? या पक्ष्यांच्या आर्त हाकेला साद घालत सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.
अहिल्यानगरसह आजूबाजूच्या परिसरात ३५ ते ४० अंशांपर्यंत तापमान पोहचल्याने माणसासह प्रत्येक जीव हैराण झाला
आहे. या जाणिवेतून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गोदावरी किर्तानी यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी घराच्या अंगणात, गच्चीवर प्राणी-पक्ष्यांसाठी पाणी ठेवून आपल्या अनोख्या उपक्रमातून निसर्गाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच सर्वच ठिकाणी तीव्र उष्णतेच्या झळा लागत आहेत. मुया प्राण्यांची, पक्ष्यांची तहान भागली जावी यासाठी शाळेतच टाकाऊ पासून टिकाऊ या उपक्रमाअंतर्गत पक्षांच्या चारापाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी छोटेसे मॉडेल विद्यार्थ्यांकडून करून घेतले. आणि घराच्या आसपास, झाडांवर, इमारती वरती घराच्या खिडयांजवळ त्या वस्तू ठेवून निसर्गाप्रती आपली जबाबदारी काय? याची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.
या उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. प्रदूषणामुळे नैसर्गिक व्यवस्थेचा र्हास होत आहे. पशुपक्ष्यांना दाणा-पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अन्न व पाण्याशिवाय कोणीही राहू नये हा हेतू डोळ्यासमोर ठेवा व पक्ष्यांच्या दाणा-पाण्याची व्यवस्था करा, हीच आपली संस्कृती आहे. असे मत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गोदावरी किर्तानी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले. या स्तुत्य उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष राम में घानी, उपाध्यक्ष
रूपचंद मोटवानी, सचिव गोपाल भागवानी, खजिनदार दामोधर माखिजा, विश्वस्त महेश मध्यान, सुरेश हिरानंदानी, राजकुमार गुरुनानी, हरेष मध्यान तसेच शाळेच्या प्राचार्या गीता तांबे, मुख्याध्यापिका सौ. गोदावरी किर्तानी तसेच
उपप्राचार्या सौ.कांचन पापडेजा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना दररोज पक्षांच्या क्षुधा शांतीसाठी दाणापाणी ठेवण्याचे आवाहन केले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.