जैन आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकास

0
112

नगर – जैन समाज व जैन धर्माच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकारने जैन आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ करणारे महाराष्ट्र राज्य हे पहिले व एकमेव राज्य आहे. जैन आर्थिक
विकास महामंडळाच्या माध्यमातून धार्मिक संरक्षण, तीर्थक्षेत्र विकास जैन धर्मग्रंथांचे जतन व पुनर्निमान करणे, साधुसंतांसाठी विहार धाम निर्माण करणे, युवकांना व्यापार उद्योगासाठी बिनव्याजी कर्ज, परदेशी शिक्षणासाठी
जाणार्‍या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना, महिला बचत गटांसाठी ५० लाखांपर्यंत कर्ज, प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत बिनव्याजी गृह कर्ज, निराधार व विधवा महिलांसाठी तीन हजार रुपये मासिक पेन्शन या आर्थिक विकास महामंडळाला २०० कोटींचा दरवर्षी निधी मिळणार आहे. तसेच एचडीएफसी बँक, बँक ऑफ बडोदा, कोटक बँक, पंजाब नॅशनल बँक अशा अनेक बँकांनी जैन समाजातील व्यापार व उद्योगासाठी २००० कोटींपर्यंत निधी देण्याची तयारी दर्शवली आहे. अशा विविध योजनांमधून जैन आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकास होणार आहे. सरकारने जैन समाजासाठी शक्तिशाली महामंडळाचे निर्माण केले आहे, असे प्रतिपादन जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री ललित गांधी यांनी केले आहे. धार्मिक परीक्षा बोर्ड आनंद धाम येथे श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन, अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघ व अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व जैन संघटना आयोजित महा संमेलनात महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी म.सा., प्रबुद्ध विचारक आदर्शऋषीजी म.सा., सेवाभावी अलोकऋषीजी म.सा., नामदार ललित गांधी, अल्पसंख्यांक योजना ऑलइंडिया जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीकुमार जैन, श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय मंत्री वसंत लोढा, राष्ट्रीय उपाध्यक्ष सतीश लोढा, राष्ट्रीय समन्वयक ईश्वर बोरा, राष्ट्रीय संचालक राजेंद्र बलदोटा, पेमराज बोथरा, राजेंद्र चोपडा, सुभाष मुथा, संतोष गांधी, सुरेंद्र गांधी, अनिल कटारिया, संजय कोठारी, नंदकुमार भटवेरा, रमेश लोढा, समीर बोरा, नितीन पटवा, रोशन चोरडिया, पवन कटारिया, शरद शिंगवी, गौतम मुनोत महाराष्ट्र चतुर्थ झोन पदाधिकारी धनेश कोठारी, धनराज संचेती, सुनील मालू, सचिन कटारिया, ईश्वर भंडारी, सुदर्शन डुंगरवाल, पोपट लोढा, संस्था प्रमुख
डॉ. प्रकाश कांकरिया, अ‍ॅड. नरेश गुगळे, किरण भंडारी, अमित मुथा, रवींद्र बाकलीवाल, तुषार कर्नावट, हर्षल बोरा, नितीन शिंगवी, रसिकलाल बोरा, संतोष गांधी, प्रतीक बोगावत, पोपट लोढा, कमलेश गुंदेचा, चंदन भळगट, सचिन देसर्डा, नितीन बाफना, महेश चुत्तर, अशोक गांधी, बालचंद गांधी, कमलेश चोरडिया, तुषार सुरपुरीया, कुणाल भंडारी,  पोपट भंडारी, धनंजय गांधी, अ‍ॅड. रोहित बलदोटा, राजेश बाठीया, नितीन भंडारी, विजय गुगळे, मनीष शिंगवी, अरुण दुगड, ज्योती गांधी, लता कटारिया, सरोज कटारिया, डॉ.सुधाताई कांकरिया, वैशाली चोपडा, नूतन गांधी, अपेक्षा संकलेचा, मनीषा मुनोत, सिमरन मुनोत, प्रतिभा गांधी आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात वसंत लोढा म्हणाले, जैन समाजातील बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाची
स्थापना करून त्या माध्यमातून विविध योजना जाहीर केलेल्या आहेत. या महासंमेलनात जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत राबवल्या जाणार्‍या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. शैक्षणिक कर्ज, शिष्यवृत्ती, स्वयंरोजगार
कर्ज, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या योजनांचा जैन समाज बांधवांनी लाभ घ्यावा. या योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहेत. जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शहरात व तालुयात प्रत्येक ठिकाणी जैन अल्पसंख्यांक योजनांच्या
माहितीसाठी कार्यालय उभारण्यात येणार आहे. यावेळी कांतीकुमार जैन, अ‍ॅड.नरेश गुगळे, राजेंद्र चोपडा यांनी मार्गदर्शन केले. ईश्वर बोरा यांनी स्वागत केले. सूत्रसंचलन राजेंद्र बलदोटा व संतोष गांधी यांनी केले. सतीश लोढा यांनी आभार मानले. आनंद गुरुभक्त मंडळाने गौतम प्रसादाची व्यवस्था केली होती. या कार्यक्रमासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील जैन  समाज बांधव उपस्थित होते.