नगर – काश्मीरमधील पहेलगाम येथे हिंदू पर्यटकांवर अतिरेयांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हिंदू बंधू, भगिनींना अहिल्यानगर शहर भाजपाच्या वतीने श्रद्धांजली वाहून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. बुधवारी सायंकाळी शहरातील चौपाटी कारंजा चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यापुढे पक्षाच्या पदाधिकार्यांनी श्रद्धांजली वाहिली.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अॅड.अभय आगरकर, सरचिटणीस सचिन पारखी, प्रशांत मुथा, वसंत लोढा, दामोदर बठेजा, बाळासाहेब गायकवाड, मयूर बोचूघोळ, कुणाल भंडारी, विलास नंदी, गोकुळ काळे, राजेंद्र काळे, महेश नामदे, तुषार पोटे, सागर शिंदे, प्रवीण ढोणे, राहुल जामगावकर, गोपाल वर्मा, अनिल सबलोक, कालिंदी केसकर, श्वेता पंधाडे, रेणुका करंदीकर, रेखा आहेर आदी उपस्थित होते.
यावेळी अॅड.अभय आगरकर म्हणाले, पाकिस्तानमधील अतिरेयांनी क्रूरतेने हिंदू बंधू, भगिनींची हत्या केली आहे. अशा दहशतवादी प्रवृत्ती वेळीच ठेचल्या पाहिजेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे नक्कीच योग्य कारवाई करून या घटनेचा बदला घेतील. हिंदू समजाविरोधात या अपप्रवृत्ती वाढत आहेत. त्यांना केंद्र शासन निश्चित पायबंद घालेल, असा विश्वास व्यक्त करून मृतांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी राजेंद्र काळे, दामोदर बठेजा, प्रिया जानवे आदींनी या घटनेचा निषेध केला.