वनक्षेत्रातील पाणवठ्याची दुरुस्ती करत सोडले वन्यप्राण्यांसाठी पाणी
नगर – वनक्षेत्रात सध्या सर्वत्र उन्हाची दाहकता वाढलेली आहे. त्यामुळे मुळे चारा पाण्यासाठी वन्य प्राण्यांची मोठ्या प्रमाणात भटकंती होत आहे. नगर तालुयातील गुंडेगाव येथील वनविभागाच्या फॉरेस्टमध्ये वन्य प्राण्यांसाठी पाणवठे तयार करण्यात आलेले आहेत. या पाणवठ्यात सामाजिक बांधिलकी जपत नगर शहरातील सामाजिक संस्था असलेल्या निसर्ग
भ्रमंती ग्रुपने पाणवठ्याची दुरुस्ती केली व टँकरद्वारे १७ मार्च रोजी ५ हजार लिटर पाणी पाणवठ्यात टॅकरद्वारे सोडण्यात आले आहे.
या वर्षी मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच उष्णतेची तीव्रता लक्षात घेता सामाजिक बांधिलकीची जपत, वाढदिवसाचा खर्च टाळून प्रत्येकाने जंगलातील पाणवठ्यात वन्य प्राण्यांसाठी पाणी सोडण्याचे आवाहन निसर्ग भ्रमंती ग्रुपचे विद्यासागर पेटकर यांनी वन्यप्रेमीना केले आहे. पाणवठ्यावर पाणी उपलब्ध झाल्याने जंगलातील वन्यजीव या पाणवठ्यांवरच तहान भागविणार आहेत. वन्यप्राण्यांना उन्हाळ्यातही पाण्याची मुबलकता राहणार आहे. तसेच वन्यजीवांचा पाण्याच्या शोधार्थ वनक्षेत्राबाहेर वावर कमी होणार आहे असे मत वन विभागाच्या अधिकार्यांनी यावेळी व्यक्त करत निसर्ग भ्रमंती ग्रुपचे आभार मानले. या उपक्रमासाठी निसर्ग भ्रमंती ग्रुपचे विद्यासागर पेटकर यांच्या सह प्रसाद खटावकर, निशिकांत
महाजन, धीरज खिस्ती, नितीन केदारी, रामा जगताप, प्रशांत पठारे, विनय कुलथे व ग्रुपचे इतर सदस्य यांचे सहकार्य लाभले.
यावेळी विद्यासागर पेटकर, वनपाल शैलेश बडदे, वनसंरक्षक मानसिंग इंगळे, वन कर्मचारी रमेश शेळके, रामचंद्र भोसले, वन्यजीव प्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते.