पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून व जाळून पहेलगाम घटनेचा सर्वपक्षियांनी केला ‘निषेध

0
72

नगर – पाकिस्तानी अतिरेयांनी पहेलगाम येथे गोळीबार करून हत्या केलेल्या
हिंदू बंधू भगिनींना श्रद्धांजली वाहण्यासाठी भिंगारच्या सर्व पक्षाच्यावतीने सोमवारी
सकाळी बंद पुकारण्यात आला होता. या बंदच्या आवाहनाला भिंगार मधील सर्व
बाजारपेठेमधील व्यापारी, दुकानदार, छोटे-मोठे व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून प्रतिसाद
देत घटनेचा निषेध केला. यावेळी भिंगार वेशीजवळ झालेल्या आंदोलनात सर्व पक्षीय पदाधिकार्‍यांनी
पाकिस्तान मुर्दाबाद… पाकिस्तान मुर्दाबाद…, भारतमाता की जय…., जय श्रीराम अशा घोषणा दिल्या.
तसेच पाकिस्तानचा झेंडा लाखो लोकांच्या पायदळी तुडवला जावा यासाठी भर रस्त्यात चिटकवण्यात
आला. तसेच पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेधही करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक
आर. के. दहिफळे यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या पदाधिकार्‍यांनी निवेदन दिले.
भिंगार बंद आंदोलनात प्रकाश लुणिया, संभाजी भिंगारदिवे, सुनील लालबोंद्रे, महेश नामदे, संजय
सपकाळ, विष्णू घुले, सचिन जाधव, नामदेव लंगोटे, रवींद्र लालबोंद्रे, संतोष बोबडे, शाम वाघस्कर
आदींसह सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रशासनास दिलेल्या निवेदनात नमूद केले होते, भारताचा मुकुटमणी असलेल्या काश्मीरम
धील पहेलगाम येथे पाकिस्तानी धर्मांध अतिरेयांनी फक्त हिंदू धर्माच्या पर्यटकांनाच धर्म विचारून बेछूट
गोळीबार करून त्यांची अमानुषपणे हत्या केली. याचा आम्ही सर्व भिंगारवासीय निषेध करीत आहोत.
आमची केंद्र व राज्य सरकारकडे अशी मागणी आहे की आपण या धर्मांध पाकिस्तानी
अतिरेयांना सहारा व आश्रय देऊन त्यांना पैसे पुरवणार्‍या देशद्रोही लोकांचा शोध
घेऊन त्यांना यमसदनी पाठवावे. शहरातील पाकिस्तानी व बांगलादेशी नागरिकांचा
शोध घेऊन त्यांचीही भारतातून हकालपट्टी करावी. शहरातील ज्या ज्या ठिकाणी सरकारी सेतू कार्यालाये
व पुरवठा अधिकारी अशा देशद्रोही नागरिकांना भारतीयत्वचे दाखले देत आहेत त्यांच्यावरही कठोर
कारवाई करावी. आपल्या भिंगार पोलीस स्टेशन हद्दीत रोहिंगे, बांगलादेशी घुसखोरांना शोधण्याचे मोहीम
त्वरित हाती घ्यावी आणि त्यांना भारताबाहेर ढकलून देण्यात यावे.
आम्ही संपूर्ण भिंगारवासी भारत सरकारच्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांबरोबर आहोत. या घटनेचा निषेध
करण्यासाठी २८ एप्रिल रोजी सकाळी मारुती मंदिर येथे सर्व भिंगारवासी सामूहिक हनुमान चालीसा
पाठ करून भिंगार बंदचे आवाहन केले. संध्याकाळी ठीक ७.३० पूर्ण भिंगार शहरातील सर्व नागरिक
दोन मिनिटे आपल्या घरातील व दुकानातील लाईट बंद करून एक पणती श्रद्धांजलीसाठी लाऊन
काश्मीर येथे मरण पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.
यावेळी निलेश साठे, प्रज्योत लुणिया, राजेंद्र फुलारे, बापू लीपणे, नाना मोरे, सुदाम लांडे,
लॉरेन स्वामी, रुपेश भंडारी, श्लोक भंडारी, सोमनाथ आव्हाड आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते
उपस्थित होते.