जीवन चक्र-कर्म चक्र

0
48

कोणीही कर्माच्या फळापासुन वाचु शकत नाही, भुत, प्रेत, राक्षस, दैत्य, गंधर्व, किन्नर, यक्ष किंवा देवता देखील नाही. हे प्राणी दिव्य, सुक्ष्म व परलौकीक शरीर धारण कलेले आहेत व यांना ब्रह्मांडामध्ये (जे अंडी आणि पिंडीवरील तिसरे मंडळ आहे) राहुन आपल्या कर्माचे फळ भोगावे लागतात. ते देखील कर्माच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी मनुष्य देहाची अभिलाषा करतात व त्यासाठी वाट पाहण्याची इच्छा करतात, कारण म नुष्य जन्मातच एखाद्या प्रभुरूप संतांची भेट होण्याची संभावना आहे, जे त्यांना आध्यात्मिक मार्गाचे रहस्य अर्थात ’नाम’ किंवा ’शब्दा’ चा भेद सांगु शकतात. परमेश्वराच्या महान रचनेच्या भारी भक्कम प्रशासनास थोडेसे समजण्यासाठीही मनुष्याला सुद्धा काही वर्षापर्यंत निरंतर धैर्यपुर्वक ध्यान धारणा करावी लागते आणि आता एखाद्या जिज्ञासुला एवढेच सांगु शकतो. असेच खरे संत सद्गुरूंना समजणे देखिल खुप अवघड आहे. परंतु असे असुनही संत ह्या संसारात येतात, सामान्य मनुष्यासारखे जगतात व नेहमी स्वतःला प्रभु किंवा त्यांच्या जीवांचे दास, गुलाम किंवा सेवक म्हणून सांगतात.

संत समर्पित जीवांचे, कर्माचे ओझे उचलतांना निसर्गाच्या नियमांची अवहेलना कवा उपेक्षा करत नाही. ते एखाद्या अशा राजासारखे आहेत जे आपल्या प्रजेतील दुःख आणि वेदना समजुन घेण्यासाठी आपल्या प्रजेमध्ये मिसळतात आणि कधी कधी त्यांच्या आनंदात व दुःखात सामील होतात. जिथे मानवीय शरीराचा संबंध आहे, त्याकरीता संत सद्गुरू आपली विशेष आध्यात्मिक सवलत वापरतात. थोडक्यात ते फाशीसारख्या संकटांनाही काटे टोचण्या इतपत बदलवू शकतात. यासाठी ते कधी कधी आपल्या स्वतःच्या देहालाही त्रास देतात जी सामान्य मनुष्यासाठी मोठी आपत्ती ठरू शकते. अशा प्रकारे ते आम्हास सांगतात की शरीरात राहुन प्रत्येकाला दुःख सहन करावे लागते, कारण प्रत्येक देहधारीसाठी हा प्रकृतीचा नियम आहे. शाक्य मुनी, गौतम असे म्हणतात की, भौतिक जीवनात दुःखच दुःख आहे. संत कबीर म्हणतात की, त्यांनी कोणत्याही मनुष्याला सुखी पाहिले नाही, ज्याला पाहिले तो दुःखी होता. गुरूनानक देवजी यांनी अत्यंत सुंदरतेने जगाची प्रतिमा रेखाटली आहे, आता जर आपण आजुबाजुला सर्वत्र दुःख पाहत आहोत म्हणून आपण परमेश्वर रूपी व्यक्तीला ही आपल्या सारखाच सामान्य मनुष्य मानतो. दुः खाचा सामना करतांना तो भलेही बाहेरून म नुष्यासारखा वागतो परंतु प्रत्यक्षात तो नेहमीच भौतिक शरीरापासून विभक्त असतात. प्रत्येक क्षणी ते अंतरी जोडलेले असल्यामुळे ते वेदना सहन करून घेतात जे शिष्यासाठी असा सिद्ध होवू शकते.

ह्या मार्गावरील प्रत्येक वाटसरू ज्याला हा मार्ग सापडला आहे व ज्याने अंतर्मुख होण्याचा सराव केला आहे. तो आपल्या शरीरातुन आपले ध्यान खेचुन त्यास दोन डोळ्यांच्या मागे, भ्रमध्यावर आत्म्याच्या ठिकाणावर एकाग्र करू शकतो. ह्या अवस्थेत पोहचण्याचा कालावधी विभिन्न मानवासाठी कमी अधिक असु शकतो. परंतु हे निश्चित आहे की ध्यान धारणेचे फळ मिळेल आणि याची पुष्टीही केली जाऊ शकते. समर्पित शिष्य ऑपरेशनच्या वेळी शरीराच्या एखाद्या भागावर भुलीचे औषध लावण्यास नकार देतात. ते आपल्या चेतनतेला शरीरातुन समेटून घेतात व सर्जनद्वारा (शल्य चिकीत्सक) शरीरावर कापल्यानंतर त्यांना ते जाणवत नाही. भाई म नीसिंह यांना अशीच शिक्षा देण्यात आली की त्यांच्या शरीराचे प्रत्येक जोड कापून तुकडे तुकडे करण्यात यावे. त्यांच्याबाबत असे म्हटले जाते की त्यांनी ते हसत हसत स्विकारले परंतु जो प्राणदंड देणारा जल्लाद होता त्याला त्या आदेशाचे पुर्ण पालन करण्याचे आवाहनही केले. कारण अंमलबजावणी करणार्‍याला हे वेदनादायक कृत्य टाळायचे होते व शरीराला प्रत्येक जोडांपासून काढून टाकू नये असे त्याला वाटत होते. जे सत्संगी आपले डोळे उघडे ठेवतात त्यांना अशा अनेक घटना पहावयास मिळतात. ज्या आत्म्यांची अंतरी उडाण असते, ते प्रभुमध्ये लीन असतात व ते आपल्याला सामर्थ्याचा दिखावा करत नाही. याचे साधे कारण हे आहे की असे कार्य चम त्कारांमध्ये मोजली जातात आणि म्हणूनच त्यांना पूर्णपणे टाळले पाहिजे. संत कधी

(कृपाल आश्रम, अहमदनगर)