रटाळ भाषणाला कंटाळलेले श्रोते एकामागून एक निघून चालले होते सभागृह रिकामे होत होते.
एक श्रोता मात्र प्रामाणिकपणे बसून होता, वक्ते म्हणाले,
“तुम्ही का बसून राहिला आहात?”
तो श्रोता म्हणाला “तुमच्या नंतर मी बोलणार आहे.”
मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज
हुशार ससा
एका घनदाट जंगलात एक मोठा सिंह राहत होता. तो रोज शिकारीला जायचा आणि एक नव्हे,
दोन नव्हे, तर अनेक प्राण्यांचा जीव घेत असे. जंगलातील प्राण्यांना भीती वाटू लागली की सिंहाने
अशीच शिकार केली तर असा दिवस येईल की जंगलात एकही प्राणी राहणार नाही.
संपूर्ण जंगलात गोंधळ उडाला. सिंहाला रोखण्यासाठी काही उपाय करणे आवश्यक होते.
एके दिवशी जंगलातील सर्व प्राणी एकत्र आले आणि या प्रश्नावर विचार करू लागले. शेवटी त्यांनी
ठरवले की, आपण सर्वांनी सिंहाकडे जावे आणि त्याच्याशी याबद्दल बोलले पाहिजे. दुसर्या दिवशी
प्राण्यांचा एक गट सिंहाकडे पोहोचला. त्यांना आपल्या दिशेने येताना पाहून सिंह घाबरला आणि
गर्जना करत विचारले, काय आहे? तुम्ही सगळे इथे का येताय?
प्राणी समूहाचा नेता म्हणाला, महाराज, आम्ही तुमच्याकडे विनंती करायला आलो आहोत.
तू राजा आहेस आणि आम्ही तुझी प्रजा. जेव्हा तुम्ही शिकारीला जाता तेव्हा तुम्ही अनेक
प्राणी मारता. ते सर्व तुम्ही खाऊ शकत नाही, आणि असे केल्यामुळे जंगलातील प्राण्यांची संख्या
कमी होत आहे. हे असेच चालू राहिले तर काही दिवसांत तुमच्याशिवाय जंगलात कोणीही उरणार
नाही. प्रजेशिवाय राजा कसा जगेल? जर आम्ही सर्व मरण पावलो तर आपणही राजा राहणार नाही.
आपण कायम आमचा राजा राहावा अशी आमची इच्छा आहे. आम्ही तुम्हाला फक्त तुमच्या घरी
थांबण्याची विनंती करतो. आम्ही दररोज एक प्राणी तुमच्यासाठी खाण्यासाठी पाठवू. अशा प्रकारे राजा
आणि प्रजा दोघेही शांततेत राहू शकतील. सिंहाला वाटले की प्राण्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. त्याने
क्षणभर विचार केला, मग म्हणालाही चांगली गोष्ट आहे. मला तुमची सूचना मान्य आहे. पण लक्षात
ठेवा, जर तुम्ही मला खायला पुरेसे अन्न पाठवले नाही, तर मी हवे तितके प्राणी मारून टाकीन.
प्राण्यांना दुसरा पर्याय नाही. त्यामुळे त्यांनी सिंहाची अट मान्य केली आणि आपापल्या घरी गेले.
त्या दिवसापासून सिंहाला खाण्यासाठी रोज एक प्राणी पाठवला जात असे. त्यासाठी
जंगलात राहणार्या सर्व प्राण्यांमधून एक-एक प्राणी निवडण्यात आला. काही दिवसांनी सशांचीही
पाळी आली. सिंहाच्या अन्नासाठी एक लहान ससा निवडला गेला. तो ससा जितका लहान होता,
तितकाच हुशार होता. सिंहाच्या हातून विनाकारण मरणे मूर्खपणाचे आहे असे त्याला वाटले. कोणाचा
तरी जीव वाचवण्यासाठी कुठला ना कुठला मार्ग अवलंबला पाहिजे आणि शय असल्यास असा
पर्याय शोधला पाहिजे ज्यामुळे प्रत्येकाची या समस्येतून कायमची सुटका होईल. शेवटी, त्याला
एक मार्ग सापडला.
मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज
घड्याळाचा शोध लावल्यावर कसे कळले नेमकी वेळ काय झाली आहे?
अगदीच सोपे आहे बघा. कल्पना करा की तुम्ही तुमच्या देशापासून खूप लांब अशा निर्जन
बेटावर अडकले आहात. तुमच्या जवळ घड्याळ तर आहे परंतु ते तुम्ही तुमच्या देशाच्या स्थानिक
वेळेवर लावलेले आहे, अर्थात त्या बेटाच्या भौगोलिक स्थितीच्या दृष्टीने ते घड्याळ भलत्याच
वेळा दाखवत असणार म्हणजे कदाचित तुमच्या घड्याळात १२ वाजलेले असतील व त्या बेटावर
नुकताच सुर्योदय होत असेल. मग तुम्हाला तुमचे घड्याळ त्या बेटाच्या वेळे प्रमाणे लावावे लागेल. मग
हे करायचे कसे?
अगदीच सोपे काम आहे. जेथे दिवसभर सुर्यप्रकाश पडत असेल असे मैदान शोधायचे. एक
सरळसोट दोन-तीन फूट लांबीची काडी मैदानावर जमिनीशी काटकोन करेल अशा रितीने खोचायची
(काडी जमिनीवर एक ते दीड फूट वर रहायला पाहिजे) त्या काडीची सावली पडेल, त्या सावलीच्या
टोकावर कशानेही खूण करावी. अशा प्रकारे थोड्या थोड्या वेळाने सावली कुठपर्यंत पडते, ते पहात
खूणा करत घ्यायच्या. एक वेळ अशी येईल की सावली लहानातील लहान असेल व नंतर परत
तीची लांबी वाढत जाईल. ज्या वेळी सावलीची लांबी कमीत कमी असेल, ती वेळ म्हणजे त्या
ठिकाणी दुपारचे १२ वाजलेले असतील. त्या प्रमाणे तुमचे घड्याळ लावून घ्या म्हणजे तुम्हाला स्थानिक
वेळा अचूक समजतील.
याच तत्वावर प्राचीन काळची सुर्य घड्याळं निर्माण झाली. व ज्या कोणी पहिल्यांदा आजचे
यांत्रिकी घड्याळ बनवले असेल त्याने सुद्धा स्थानिक वेळेनुसार आपल्या घड्याळात वेळ सेट
केली असणार.
आज आपण भारतात, भारतीय प्रमाणवेळेनुसार व्यवहार करतो. ही प्रमाणवेळ रेखांश
वर प्रमाणीत केलेली आहे. या रेखांशच्या पुर्वेस अथवा पश्चिमेस असलेल्यांसाठी स्थानिक वेळ व
आय एस टी मध्ये फरक पडेल.
पाककला
बाजरीची इडली

साहित्य : बाजरीचे पीठ १ वाटी, अर्धा कप रवा, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, अर्धी
वाटी उडीद डाळ, १/४ आंबट दही, १ पॅकेट बेकिंग सोडा किंवा एनो, मीठ चवीनुसार, तुकडे
केलेली हिरवी मिरची, १ टेबलस्पून मोहरी, ७ ते ८ पाने कढीपत्ता, तेल
कृती : सर्वात आधी एका भांड्यात बाजरीचे पीठ, दही, उडीद डाळ, तांदळाचे
पीठ आणि मीठ एकत्र करून घ्या. आता त्यात पाणी घाला आणि गुळगुळीत पेस्ट तयार करा.
हे पिठ अर्धा तास आंबायला ठेवा. आता त्यात इनो किंवा बेकिंग सोडा घालून पाणी घालून
पुन्हा मिस करा. इडली स्टँड घ्या, त्यात तेल लावा, तयार मिश्रण घाला आणि वाफ करा.
इडली शिजल्यावर ताटात काढून घ्या. आता एक कढईत तेल घालून हिरवी मिरची, मोहरी
आणि कढीपत्ता घालून फोडणी बनवून घ्या. आता ही फोडणी तयार इडलीवर घालावी.
दैनिक पंचांग रविवार, दि. २९ डिसेंबर २०२४
शिवरात्रि, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, मार्गशीर्ष कृष्णपक्ष,
ज्येष्ठा २३|२२, सूर्योदय ०६ वा. ३३ मि. सूर्यास्त ०६ वा. ०८ मि.
मेेष : नवीन मित्रांच्या ओळखी होतील. सरकारी कामे सफल
होतील.
वृषभ : आपल्या सहकार्यांबरोबर झालेल्या मतभेदांचे निराकरण करण्याचा प्रयत्न
कराल. अधिकार क्षेत्रात वाढ होईल.
मिथुन : मोठ्यांचा सहवास लाभेल, त्यांना भेटून आनंद होईल. दूर किंवा विदेशात
असलेल्या संततीच्या शुभवार्ता मिळतील.
कर्क : विशेषतः धंदा-व्यवसाय करणार्यांना आज फारच लाभदायक दिवस
आहे. मित्राच्या भेटीतून आनंद मिळेल.
सिंह : भेटीचे योग येतील. अचानक धनलाभ संभवतो. प्रवास होतील. काम
करायला उत्साह वाटणार नाही.
कन्या : खर्च अधिक होईल. कुटुंबियांबरोबर संघर्ष होतील. कौटुंबिक
वातावरण त्रासदायक राहील.
तूळ : नवे परिचय सुद्धा लाभदायी होतील. जुनी मित्र भेटल्याने
दिवस आनंदात जाईल.
वृश्चिक : मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. आजारी व्यक्तीच्या
प्रकृतीत सुधारणा होईल.
धनु : प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. चर्चा-वादविवाद यातही तुमचा प्रभाव राहील.
पितृचिंता सतावेल.
मकर : मागील उधारी उसनवारी वसुल होईल. वाहने बिघडण्याची शयता आहे.
पाकीटमारी होईल.
कुंभ : आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार देणार्या मित्रांना जोडणे यावेळी
आपल्यासाठी फलदायी ठरेल.
मीन : राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. सांसारिक किंवा इतर प्रश्नांमुळे
मन उदास राहील.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा
मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज
खरा भक्तीभाव
एकदा एका कावळ्याने सटवाईला काही वस्तू अर्पण करण्याचे ठरविले. त्यासाठी कुत्र्याला त्याने
आपल्याबरोबर येण्याची विनंती केली. कुत्रा म्हणाला, ’देवीला तुझा इतका कंटाळा
आहे की, तू दिलेल्या वस्तूंचा ती मुळीच स्वीकार करणार नाही.’
यावर कावळा म्हणाला, ’अरे, यासाठीच तर मी तिला वस्तू भेट देण्याचं ठरविलं आहे.
तिचा माझ्यावरचा रोष दूर व्हावा आणि तिनं माझं कल्याण करावं या हेतूनेच मी तिला या वस्तू अर्पण
करणार आहे.’
तात्पर्य : खर्या भक्तीभावाने पूजा करणारे फारच कमी असतात.



