कांदे झाकण्यासाठी शेतात गेलेल्या माय लेकराचा वीज पडून मृत्यू

0
121

श्रीगाेंदा – कांदे झाकण्यासाठी शेतात गेलेल्या माय लेकरांचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना श्रीगाेंदा तालुक्यातील येवती गावामध्ये साेमवारी (दि.22) सायंकाळी घडली. नवनाथ बाजीराव आढाव (वय 24) व मीनाबाई बाजीराव आढाव (वय 50, दाेघे रा. येवती, ता.श्रीगाेंदा) अशी मयतांची नावे आहे. मागील दाेन दिवसांपासून हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे पावसाचे वातावरण निर्माण झाले हाेते. त्यातच श्रीगाेंदा तालुक्यात माेठ्या प्रमाणात ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत असताना साेमवारी पुन्हा ढगाळ वातावरण आणि पावसाचे चिन्ह निर्माण झाल्याने पाऊस पडला तर आपल्या पिकाचे नुकसान हाेईल या भीतीने तालुक्यातील येवती येथील नवनाथ बाजीराव आढाव व त्याची आई मीनाबाई बाजीराव आढाव हे दाेघे आपल्या शेतातील कांदा पावसाने भिजू नये म्हणून झाकण्यासाठी गेले हाेते. सायंकाळच्या सुमारास ते शेतात पाेहचताच त्याच्या अंगावर वीज काेसळून आई आणि मुलाचा हाेरपळून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी श्रीगाेंदा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी नेण्यात आले, शवविच्छेदन झाल्यानंतर अंत्यविधीसाठी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी श्रीगाेंदा पाेलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.