जीवन चक्र-कर्म चक्र

0
48

चमत्कार करत नाहीत किंवा ते त्यांच्या शिष्यांना असे अहंकारी व दिखावटी कार्य करण्यास परवानगी देत नाही. संत जेव्हा आजारी पडतात तेव्हा ते डॉक्टरांनी दिलेली औषधे घेतात, परंतु प्रत्यक्षात त्यांना कोणत्याही उपचारांची आवश्यकता नसते. हे केवळ ऐहिक नियम टिकवून ठेवण्यासाठी करतात. ते संसारीक कामे प्रामाणिकपणे करीत असतांना आवश्यकतेनुसार त्याने योग्य उपचार घ्यावेत असा आदर्श ते मनुष्यासमोर घालून देतात. परंतु शिष्याकडून अशी अपेक्षा केली जाते की त्यांनी केवळ असेच औषध घ्यावे ज्याला बनवितांना देहधारी जीवांची हत्या झालेली नसेल. परंतु काही शिष्य ज्यांना गुरूंच्या सामर्थ्यावर पुर्ण व अतुट विश्वास आहे ते बहुतेक वेळा आपल्या रोगाच्या इलाजापासून वाचतात व प्रकृतीला आपले कार्य करू देतात कारण मानव शरीरामध्ये स्वतःला ठिक करण्याची शक्ती पहिल्यापासुनच आहे.

शारीरिक रोग आनंदाने स्विकारून सहन केले पाहिजे. कारण सामान्यतः खाण्या पिण्याच्या चुकांमुळे ते उद्भवतात आणि योग्य आहार व आरोग्याच्या नियमांचे पालन करून त्यावर मात केली जाऊ शकते. आधुनिक वैद्यकिय विज्ञानाचे जनक हिप्पोक्रेटस् यांनी म्हटले आहे की अन्न हे औषध म्हणून घेतले पाहिजे. कर्माच्या परिणामामुळे उद्भवणारे जटिल रोग देखिल तक्रार न करता धैयपुर्वक सहन केले पाहिजेत, कारण कर्माचा हिशोब संपविण्यासाठी त्याचा त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच राहिलेले कर्मफळ नंतर न भोगता लगेच भोगणे चांगले आहे. महान सुफी संत हजरत मियॉं मीर यांचे शिष्य अब्दुल्ला यांच्या बद्दल असे म्हटले जाते की, त्यांच्या आजारपणाच्या स्थितीत त्यांनी आपल्या आत्म्याच्या धारेला आपल्या डोळ्यांच्या मध्ये भ्रमध्यावर एकवटले व स्वतःला पुर्णपणे शांत केले व स्वतःचे संरक्षण केले. हे सर्व पाहून हजरत मियॉं मीर यांनी त्यांना पुन्हा त्यांच्या शरीरात आणले व आपल्या कर्माचे भुगतान करावयास सांगितले. त्यांनी त्याला सांगितले की अशा युक्ती वापरून तो कर्माच्या प्रभावापासून मुक्त होणार नाही. संत आपल्या शरीराची काळजी व गरजांसाठी जास्त वेळ घालवत नाही.

जितका की आपल्यापैकी बहुतेक लोक देतात. त्यांच्यासाठी हे शरीर कपड्यांसारखे आहे जे एक दिवस उतरावेच लागतील. ते आराम न करता, रात्र रात्र जागून शारीरिक व मानसिकरित्या कठोर परिश्रम करत असतात. असे अद्भुत कार्य विज्ञानासाठी रहस्य आहे परंतु संतांसाठी ही एक सामान्य बाब आहे. ते प्रकृतीच्या त्या नियमांच्या मदतीने कार्य करतात ज्याबाबत आम्हाला पुर्णपणे माहिती नाही. कर्माचे दोन भाग केले जाऊ शकतात. व्यक्तीगत कर्म व सामुहीक कर्म. सामुहिक कर्म ही अशी कर्म असतात जे एकत्रितपणे समाज किंवा देशाद्वारे केली जातात व त्यांना ’धर्म’ असे म्हणतात. ज्या प्रकारे एखाद्या व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळ मिळते त्याचप्रमाणे समाजालाही चुकींच्या नितींचा परिणाम भोगावा लागतो. याचा परिणाम असा होतो की, निष्पाप लोकसुद्धा आपल्या धर्माच्या चुकीच्या कार्याचे फळे भोगतात. जेव्हा नादीर शाहने भारतावर आक्रमण केले तेव्हा त्याने दिल्लीत सामुहिक हत्या करण्याचा वटहुकूम दिला. ही भयानक दहशत पाहुन लोकांमध्ये सर्वसाधारण ही धारणा झाली होती की देशवासियांचे वाईट कर्मच नादिरशाहच्या रूपात प्रकट झाले होते. केलेल्या पापकर्माचा मग ते पाप निषिध्द कर्मासाठी केलेले असो किंवा उचित कर्मासाठी केलेले असो त्यासाठी योग्य शिक्षा देणे हा प्रकृतीचा मुळ आधार आहे. आपण यास संकट, प्रकोप किंवा उन्माद असे काहीही म्हणू शकतो.

(कृपाल आश्रम, अहमदनगर)