आरोग्य

0
24

पावसाळ्यात हे करा वर्ज्य

पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते. त्यामुळे तेलकट, तळकट पदार्थ खाऊ नयेत. पावसाळ्यात
भात खाल्ल्याने अंगावर सूज येण्यासोबतच पोट फुगते. त्यामुळे भात प्रमाणात खावा. मिठामुळे
पोट फुगते आणि भूक जास्त लागते. त्यामुळे या दिवसामध्ये मीठही कमीच खावे.
पचनास जड असणार्‍या फ्लॉवर, कोबीसारख्या भाज्या खाऊ नयेत. दह्यामुळे कफ होतो.
शीतपेयांमध्ये शरीरातल्या खनिजांचे प्रमाण कमी होऊन पचनक्रियेवर परिणाम होतो.