लपलेले हरीण

0
109

लपलेले हरीण

एका हरणामागे पारध्याची कुत्री लागली असता जीव वाचवण्यासाठी ते हरिण                                        धावतय्धावत शेतातील गुरांच्या गोठ्यात शिरले आणि एका गवताच्या गंजीत लपून बसले. ते पाहून
गोठ्यातला बैल हरणाला म्हणाला, “अरे मित्रा, जीव वाचविण्यासाठी जेथे तू लपला आहेस, तेथेच
तुझा जीव मात्र लवकर जाईल.” तेव्हा हरिण म्हणाले, “मित्रांनो, तुम्ही जर मला गप्प बसून
सहकार्य केले, तर मला येथे फारशी भीती नाही. संकट दूर होताच मी येथून पळून जाईन.”
अशा प्रकारे रात्र होईपर्यंत ते हरिण गंजीतच लपून बसले. रात्र पडू लागताच गुराखी पेंढ्या
घेऊन आला आणि बैलांना खायला देऊन गेला. त्याला ते हरिण दिसले नाही. थोड्या वेळातच
मालकाची मोठी मुले तेथे येऊन गेली. त्यांनाही हरिण दिसले नाही.

आपल्याला कोणी पाहिले नाही याचा आनंद होऊन हरिण बैलाला म्हणाले, ” बैलदादा, तुमच्या
कृपेमुळेच आज मी वाचलो. तुमचे माझ्यावर फार उपकार झालेत. तेव्हा बैल म्हणाला, “अरे, या
लवकर, धावा धावा.” मालकाचे ओरडणे ऐकून त्याचे नोकर हातात लाठ्या काठ्या घेऊन तेथे
धावले, आणि गंजीआड लपलेले हरिण त्यांनी त्याला काठ्यांनी झोडपून ठार केले.

तात्पर्य: जे ठिकाण सुरक्षित नाही, अशा ठिकाणी एक-दोनदा जिवावरचे संकट टळले,
तरी तेथे कायमच सुरक्षितता लाभेल, असे समजूनये.