नगर – श्री साई द्वारका सेवा ट्रस्टच्या वतीने गरजूवंत रुग्णांना वर्षभर वैद्यकीय मदत देण्याचे काम केले आहे. या माध्यमातून रुग्ण आपल्या आजारपणाची प्राथमिक तपासणी करून घेतो व त्यानुसार डॉ. वैद्यकीय उपचार करत असतात अॅड. धनंजय जाधव यांचे सुरू असलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. त्यांनी नेहमीच समाजातील दीनदुबळ्यांची सेवा करण्याचे काम केले आहे. स्व. कृष्णा जाधव यांच्या विचाराचा वारसा ते पुढे चालवीत आहे असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी केले.
श्री साई द्वारका सेवा ट्रस्टच्या वतीने गरजूवंत रुग्णांना आर्थिक मदत व शालेय साहित्याचे वाटप अनिल मोहिते यांच्या
हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक धनंजय जाधव, निखिल वारे, संजय ढोणे, अशोक गायकवाड, विठ्ठल
लांडगे, राजेंद्र काळे, दत्ता गाडळकर, उदय अनभुले, सुरेश लालबागे, सोमनाथ जाधव, पोपट पाथरे उपस्थित होते.
धनंजय जाधव म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मनुष्य धकाधकीचे जीवन जगत असताना त्यांना विविध आजारपणांना सामोरे जावे लागते अचानकपणे येणारे आजारपण आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे काहीजण अंगावरच काढत असतात त्यामुळे त्यांना भविष्यकाळात मोठ्या आजारपणाला सामोरे जावे लागते ही बाब लक्षात आल्यानंतर प्राथमिक उपचारासाठी श्री साई द्वारका सेवा ट्रस्टच्या माध्यमातून गरजूवंत रुग्णांना आर्थिक मदत केली जाते असे ते म्हणाले.
Advertisement
LATEST ARTICLES
श्री साई द्वारका सेवा ट्रस्टचे वैद्यकीय कार्य कौतुकास्पद : अनिल मोहित
नगर – श्री साई द्वारका सेवा ट्रस्टच्या वतीने गरजूवंत रुग्णांना वर्षभर वैद्यकीय मदत देण्याचे काम केले आहे. या माध्यमातून रुग्ण आपल्या आजारपणाची प्राथमिक तपासणी करून घेतो व त्यानुसार डॉ. वैद्यकीय उपचार करत असतात अॅड. धनंजय जाधव यांचे सुरू असलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. त्यांनी नेहमीच समाजातील दीनदुबळ्यांची सेवा करण्याचे काम केले आहे. स्व. कृष्णा जाधव यांच्या विचाराचा वारसा ते पुढे चालवीत आहे असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी केले.
श्री साई द्वारका सेवा ट्रस्टच्या वतीने गरजूवंत रुग्णांना आर्थिक मदत व शालेय साहित्याचे वाटप अनिल मोहिते यांच्या
हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक धनंजय जाधव, निखिल वारे, संजय ढोणे, अशोक गायकवाड, विठ्ठल
लांडगे, राजेंद्र काळे, दत्ता गाडळकर, उदय अनभुले, सुरेश लालबागे, सोमनाथ जाधव, पोपट पाथरे उपस्थित होते.
धनंजय जाधव म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मनुष्य धकाधकीचे जीवन जगत असताना त्यांना विविध आजारपणांना सामोरे जावे लागते अचानकपणे येणारे आजारपण आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे काहीजण अंगावरच काढत असतात त्यामुळे त्यांना भविष्यकाळात मोठ्या आजारपणाला सामोरे जावे लागते ही बाब लक्षात आल्यानंतर प्राथमिक उपचारासाठी श्री साई द्वारका सेवा ट्रस्टच्या माध्यमातून गरजूवंत रुग्णांना आर्थिक मदत केली जाते असे ते म्हणाले. आषाढी यात्रेसाठी जिल्ह्यास २ कोटी ६१ लाखांचा निधी मंजूर
वारकर्यांसाठी वॉटरप्रूफ मंडप, पाणी, शौचालय व वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
शिर्डी – आषाढी यात्रेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून मार्गस्थ होणार्या पालख्यांसोबत असलेल्या वारकर्यांच्या विविध सुविधांसाठी राज्य सरकारने जिल्ह्यासाठी २ कोटी ६१ लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध होणार असून, यातून वॉटरप्रूफ मंडप, शौचालये, स्नानगृहे, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा व ग्रामपंचायत
सहाय्य अनुदान यांचा समावेश असेल.
जिल्ह्यातून दरवर्षी पैठण येथील संत एकनाथ महाराज, त्र्यंबकेश्वर येथील संत निवृतीनाथ महाराज, पिंपळनेर येथील संत निळोबाराय महाराज यांच्या प्रमुख पालख्यांसह सुमारे १६० स्थानिक पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. या यात्रेत महिला व पुरुष वारकर्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असते. त्यांच्या प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मागील दोन वर्षांपासून पालकमंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पालखी नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस वरिष्ठ अधिकारी, प्रमुख देवस्थानांचे प्रतिनिधी, दिंड्यांचे प्रमुख उपस्थित होते. पालखी मार्गावरील अडचणी जाणून घेत प्रशासनाने सर्व सुविधा वेळेत पुरवण्याचे आश्वासन दिले. यासाठी विविध विभागांचे अधिकारी समन्वयक म्हणून काम करणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याने सुरू केलेला हा पॅटर्न संपूर्ण राज्यात आदर्श मानला जात असून, सोलापूर
जिल्ह्यातही याच धर्तीवर नियोजन सुरू झाले आहे.
पावसाळ्यातील मुक्कामांदरम्यान वॉटरप्रूफ मंडपांची गरज, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छतागृहे, वैद्यकीय सुविधा व पिण्याच्या पाण्याच्या अडचणी वारकर्यांनी अधोरेखित केल्या. यावर तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्री विखे पाटील यांनी संबंधित प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर त्यांनी पाठपुरावा करून मविकास विभागाच्या माध्यमातून २ कोटी ६१ लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. या निधीतून सर्व पालखी मार्गांवर सुविधा पुरवण्यासाठी तातडीने कार्यवाहीचे आदेशही पालकमंत्र्यांनी प्रशासनास दिले आहेत पारनेरचा चेतन रेपाळे ठरला देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता
शेवटच्या क्षणी २ गुणांची कमाई करुन विजय संपादन
नगर – अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ, शेवगाव तालुका तालीम संघ आणि वंदे मातरम क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या
संयुक्त विद्यमाने शेवगाव येथे झालेल्या देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धे चे विजेतेपद पारनेर येथील कुस्तीपटू चेतन रेपाळे याने दोन गुणांनी विजय संपादन केले. उपस्थितांच्या हस्ते विजेत्या मल्लास चांदीची गदा व रोख बक्षीस देण्यात आले.
खुल्या गटातील अंतिम सामना चेतन रेपाळे (पारनेर)
विरुध्द कौतुक डफडे (पुणे) यांच्यात चुरशीचा झाला. तोडीस तोड
बलदंड मल्ल एकमेकांना भिडले होते. ६ मिनीटाच्या कुस्तीत पहिल्या
तीन मिनीटाच्या राऊंडमध्ये कौतुक डफडेने १ गुणांची कमाई करुन
आघाडी घेतली. दुसर्या राऊंडमध्ये चेतन रेपाळे याने आक्रमक खेळी
करुन २ गुणांची कमाई केली. शेवटच्या दीड मिनीटात दोन्ही मल्लांनी
२-२ गुणांची बरोबरी साधली. पुन्हा रेपाळे याने २ गुण मिळवून
आघाडी घेतली. ५० सेकंद असताना डफडे याने २ गुण घेऊन ४-४
ची पुन्हा बरोबरी साधली. ४० सेकंद असताना रेपाळे याने १ व शेवटच्या १५ सेकंदात पुन्हा
२ गुणांची आघाडी घेऊन ५-७ गुणांनी विजय संपादन केला.
निमंत्रित कुस्त्यांमध्ये स्पर्धेचे खास आकर्षण ठरलेल्या महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज
पाटील विरुद्ध महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर यांच्यात १.५ लाख रुपयांची व महिला विभागात
नॅशनल मेडलिस्ट उषा कुमारी विरुद्ध नॅशनल मेडलिस्ट सोनाली मंडलिक यांच्यात एक
लाख रुपयांवर निमंत्रित कुस्ती लावण्यात आली. दोन्ही कुस्त्या अत्यंत अटातटीच्या व
रंगदार झाल्या. यामध्ये हर्षद सदगीर आणि सोनाली मंडलिक यांनी प्रतिस्पर्धी मल्लाला
चितपट करुन विजय संपादन केले. तसेच शिवराज राक्षे याने देखील उत्कृष्ट खेळी करुन
विजय मिळवला.
उपस्थितांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली. तर देवाभाऊ केसरी कुस्ती
स्पर्धेचा विजेता चेतन रेपाळे याला कै. छबु पैलवान लांडगे यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा
देण्यात आली. यावेळी स्पर्धेचे आयोजक अरुण मुंढे, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै.
वैभव लांडगे, खजिनदार पै. नाना डोंगरे, नंदू मुंढे, फारुक पटेल, सुनील धोत्रे, पप्पू
शिरसाठ, बापूराव चव्हाण, युवराज पठारे, विक्रम बारवकर, तुषार वैद्य, अमोल सागडे, डॉ.
कृष्णा देहाडराय, एकनाथ कुसळकर, अंकुश कुसळकर, मगर कडू, कमलेश गांधी, दिगंबर
काथवटे, माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, विक्रम बारवकर, दिपक डावखर, रमेश दारकुंडे,
विनोद मोहिते, सालार शेख, माऊली खेडकर, बाळासाहेब कोळगे, एकनाथ शिरसाठ, गणेश
गर्जे, उदय मुंढे, सुनील जगताप, क्रीडा अधिकारी भाऊसाहेब वीर, माजी सैनिक विनोद
शेळके, पप्पू केदार, अंकुश ढाकणे, सोमा मोहिते, अभी बडे, अंबू पहिलवान, प्रकाश चित्ते
आदींसह संयोजन समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
या स्पर्धेत विविध वजन गटातील स्पर्धेचा निकाल
पुढीलप्रमाणे:- ४२ किलो वजन गट विजयी- प्रणव गुंजाळ
(संभाजीनगर), उपविजयी- ओंकार थोरात (बुर्हाणनगर), तृतीय-
फैसल पठाण (संभाजीनगर).
४८ किलो वजन गट विजयी- समर्थ शहापूरकर (माळवाडा),
उपविजयी- विशाल कुल्लाळ (बुर्हाणनगर), तृतीय- अर्जुन जाधव
(बुर्हाणनगर).
५२ किलो वजन गट विजयी- पारस बिडगर (मांडवे),
उपविजयी- शुभम परजने (बीड), तृतीय- देवानंद राऊत (जाम
खेड).
५५ किलो वजन गट विजयी- जादू सतरकर (गेवराई),
उपविजयी- सुरज जाधव (बुर्हाणनगर), तृतीय- प्रणव खंडागळे
(पुणे).
६० किलो वजन गट विजयी- शुभम लांडगे (वडगाव),
उपविजयी- अविनाश गाडे (आष्टी), तृतीय- जयेश जाधव (मालेवाडी).
६५ किलो वजन गट विजयी- शुभम जाधव (नेवासा) उपविजयी- सचिन मुरकुटे
(कर्जत), तृतीय- ऋषिकेश उचाळे (शिरपूर).
७४ किलो वजन गट विजयी- सौरभ मराठे (कापूरवाडी), उपविजयी- तुषार खामकर
(जामखेड), तृतीय- अभिषेक गहिराळे (बीड).
८४ किलो वजन गट विजयी- महेश फुलमाळी (नेवासा), उपविजयी- ऋषिकेश
शेळके (कर्जत), तृतीय- गणेश चव्हाण (कर्जत)
खुला गट देवाभाऊ केसरी विजेता- चेतन रेपाळे (पारनेर), उपविजयी- कौतुक
डफडे (पुणे), तृतीय- विजय पवार.
छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे शक्ती स्थान
आ. संग्राम जगताप यांचे प्रतिपादन; अभासी पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्याख्यानाचे ऑनलाईन उद्घाटन
नगर – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी लढले. ते फक्त जगले आपल्या सर्वांच्या स्वराज्याकरिता. स्वराज्याचा ध्वज त्यांनी अखंड भारतात फडकवला. त्यांचा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये
कोरला गेला पाहिजे. महाराष्ट्रात विचार रुजवण्याचं काम त्यांनी केले. त्यांचे कार्य आपल्या सर्वांना पुढे
घेऊन जायचे आहे. शिवरायांच्या विचारांचे अनुसरण करत आपले सरकार राज्यकारभार चालवत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे शक्तिस्थान असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने येथील कै. मा.न पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित व्याख्याना प्रसंगी आ. संग्राम जगताप बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात शिवराज्याभिषेक च्या प्रतिमापूजनाने व दीप प्रज्वलनाने
करण्यात आली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अनिल मोहिते, उपप्राचार्य एस व्ही जाधव, प्रा.एस डी शिंदे, प्रा. सचिन राऊत, अभिजीत खोसे, रामदास हिराकणजी, चंद्रकांत काळोखे, रवी पंतम, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक सचिन राऊत यांनी नागरिक कर्तव्य आणि शिष्टाचार, कुटुंब प्रबोधन, स्वदेशी विचार प्रसार, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. शहराध्यक्ष अनिल मोहिते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभे केले त्याची प्रेरणा आपल्या अहिल्यानगर मधून मिळाली आहे. राजांचा इतिहास हा आपल्याला प्रेरणादायी आहे. त्यांचा प्रेरक इतिहास डोळ्यासमोर ठेवून आपण काम केले पाहिजे. असे ते म्हणाले.
प्रा. एस डी शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विद्यालयातील विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी तंत्र प्रदर्शनात रिमोट द्वारे उद्घाटन, वायरलेस चार्जिंग सिस्टीम, एसलेटर लॉक, स्लाईड लिव्हर मेकॅनिकल जॅक अशा विविध इलेट्रॉनिक वस्तूंचे मॉडेल तयार केले होते.
सूत्रसंचालन जेई खाकाळ यांनी केले. उपप्राचार्य एस. व्ही.जाधव यांनी आभार मानले. महाराष्ट्रातील सर्व औद्योगिक
प्रशिक्षण संस्थेतील शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे उद्घाटन आभासी पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन द्वारे मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी प्रेरणास्थान असून त्यांनी केलेले कार्य आजही शिखरासारखे असल्याचे सांगत. मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विभागातील सर्व अधिकार्यांचे त्यांनी अभिनंदनही केले नगर शहरात तिरंगा सन्मान यात्रा; भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम
नगर – शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या
शौर्याच्या सन्मानार्थ तिरंगा सन्मान यात्रा काढण्यात आली. मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या
पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन तिरंगा सन्मान यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. मार्केटयार्ड परिसरातून रॅलीचे मार्गक्रमण
झाले. यावेळी भारत माता की जय…, भारत जिंदाबाद… पाकिस्तान मुर्दाबाद!, वंदे मातरम…च्या घोषणांनी परिसर
दणाणला.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले व जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष सुनील साळवे
यांच्या नेतृत्वाखाली या तिरंगा सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. हातात तिरंगा झेंडे घेऊन रिपाईचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व बौध्द भिखू रॅलीत सहभागी झाले होते.
याप्रसंगी रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, भनते संजय कांबळे, जिल्हा सरचिटणीस विजयराव भांबळ, गणेश कदम, शिवाजीराव साळवे, राजा जगताप, कविता नेटके, माया जाधव, अमित काळे, बाळासाहेब नेटके, बापू जावळे, अविनाश घोडके, काळू ससाने, शितल घोडके, रोहित कांबळे, निखिल सूर्यवंशी, योगेश घोडके, पप्पू जगताप, उत्कर्ष भालेराव, आदर्श साळवे उपस्थित होते. सुनील साळवे म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्या भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना कठोरपणे उत्तर दिले आहे, ज्याचा अभिमान प्रत्येक भारतीयाला आहे. भारतीय सैनिकांनी दहशतवादी आणि त्याला पोसणार्या पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या
माध्यमातून चांगलाच धडा शिकवला. भारतीय सैनिकांचे बलिदान आणि त्यांचा पराक्रम देशाच्या बळकटीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्व रिपाईचे कार्यकर्ते त्यांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी एकत्र आले असल्याचे त्यांनी सांगितले. दुर्घटनाग्रस्त रासने कुटुंबियांना ४ लाख रुपयांच्या शासनाच्या मदतीचा धनादेश सुपूद
नगर – शहरात २७ मे रोजी पडलेल्या अवकाळी पावसात सावित्रीबाई फुलेनगर (सारसनगर) भागातील संदीपनगर येथील तन्वी केदार रासने या युवतीचा रहात्या घराचा स्लॅब कोसळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी रासने परिवारास शासनाची
मदत मिळावी यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी पाठपुरावा करून चार लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली. याचा धनादेश आ.संग्राम जगताप, प्रांताधिकारी सुधीर पाटील व तहसीलदार संजय शिंदे यांनी तन्वी रासनेचे वडील केदार व आई वैशाली यांच्याकडे शनिवारी सुपूर्द केला. यावेळी भाऊक झालेल्या रासने कुटुंबियांचे डोळे पाणावले.
यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, प्रकाश भागणारे व संजय चोपडा, दुर्वेश रासने, अजय कुंभकर्ण आदी उपस्थित होते. शासनाने दिलेल्या या मदतीत अजून भर घालून कै.तन्वी रासने हिच्या स्मरणार्थ सेवाभावी ट्रस्टची स्थापना करून गरीब गरजू विद्यार्थ्यांना व नागरिकांना मदत करणार असल्याचे केदार रासने यांनी सांगितले.
आ.संग्राम जगताप म्हणाले, २७ मे रोजी घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी होती. अशी वेळ कोणावरहीयेऊ नये. पावसाळ्यात सर्वांनी आपल्या घराची काळजी घेणे आवश्यक आहे. दुर्घटनाग्रस्त रासने परिवारास शासनाकडून नैसर्गिक आपत्ती दुर्घटनेमुळे आर्थिक मदत मिळावी यासाठी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. त्यानुसार काही दिवसातच रासने
कुटुंबीयांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे. तन्वीच्या स्मरणार्थ गरीब गरजू विद्यार्थ्यांना व नागरिकांच्या मदतीसाठी सेवाभावी ट्रस्टची स्थापना करण्याचा रासने परिवाराचा निर्णय योग्य व स्वागतार्ह आहे. अशा सामाजिक उपक्रमांची आज गरज आहे.इयत्ता १२ वीच्या परिक्षेत तन्वी रासने हिने स्वतःच्या हिमतीवर ८५% गुण मिळवले
होते. भविष्यात डॉटर होण्यासाठी नीट परिक्षेच्या निकालाची वाट पाहणार्या तन्वीवर दुर्दैवाने काळाने असा घाला घातला आहे. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस व महसूलमंत्री बावनकुळे यांची भेट
नगर – भारतीय जनता पार्टीचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी नुकतीच मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन जिल्हाध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल आभार मानून सत्कार केला . तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही प्रदेश कार्यालयात भेट घेऊन त्यांचेही आभार मानले. यावेळी मंत्री गिरीश महाजन व शहर उपाध्यक्ष अशोक गायकवाड उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल मोहिते यांना शुभेच्छा देऊन पक्षाचे काम वाढवून पक्षाचे ध्येयधोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून त्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्या, असे सांगितले. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, येणार्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीची तयारी सुरु करण्यास सांगून, अहिल्यानगर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकावण्यासाठी कटीबद्ध व्हा, असा आदेश दिला. अनिल मोहिते म्हणाले, भारतीय जनता पक्षाने मला जिल्हध्यक्षपदाची संधी देऊन दिलेली जबाबदारी मी सर्वाना बरोबर घेत काम करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून शहरात पक्षाची ताकद वाढवणार आह महाराष्ट्र स्टेट बँक मित्राज असोसिएशनचे विविध मागण्यांसाठी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘धरणे आंदोलन’
नगर – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००५ साली वित्तीय समावेशकतेचा पुढाकार घेतला याला २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन हे नाव देऊन या योजनेला आपल्या सरकारची प्राथमिकता बनवली. हा पुढाकार राबविण्यासाठी बँकांच्या शाखांचे जाळे पुरेसे नव्हते. त्यातच सरकारने ही आपली प्राथमिकता बनवल्यानंतर तर खूपच वेगाने
खाती उघडली गेली. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने, बँकेच्या शाखेला पर्याय म्हणून बँकिंग करस्पाँडंट एका नव्या यंत्रणेला जन्म दिला ज्या द्वारे नवीन खाती उघडली जातील, पैसे भरणे, पैसे काढणे एका मर्यादेपर्यंतचे व्यवहार केले जातील, तर जस जशी जनधन खात्याची संख्या वाढू लागली तसतसे बँक मित्रांची संख्या देखील वाढू लागली. त्यांच्या कामाची व्याप्ती वाढू लागली आणि मग त्यांचे संचालन, व्यवस्थापन करणे बँकांना कठीण जाऊ लागले. यातूनच बँक आणि बँक मित्र यांच्यातील मध्यस्थ सर्विस प्रोव्हायडर आले, आणि बँकांनी ए बन मित्रांची जबाबदारी झटकवली. आज देशात १३.५५ लाख बँक मित्र काम करत आहेत तर सर्व्हिस प्रोव्हायडर ९३५ आहेत. ते ५५.२२ कोटी जन धन खातेदारांनासेवा देत आहेत.
जी खाती उघडण्यात आणि त्यांना सेवा देण्यात बँक मित्रांची भूमिका खूपच महत्त्वाची आहे. आज समाजातील वंचित घटकांना सेवा देण्यात बँक मित्र आधारस्तंभची भूमिका बजावत आहेत पण दुर्दैवाने ते स्वतः मात्र दुर्लक्षित झाले आहेत. त्यांना नियुक्तीपत्र नाही, रजा नाहीत, मेडिकल नाही, सेवेत सुरक्षितता नाही. जोपर्यंत प्रत्यक्ष बँका त्यांची नेमणूक करत होत्या तोपर्यंत त्यांना मिळणारा कमिशनचा दर समाधानकारक होता पण आता सर्विस प्रोव्हायडर आल्यानंतर
कमिशनचा दर कमी झाला आहे. त्यांना सेवेत सुरक्षितता नाही. निर्धारित सेवाशर्ती नाहीत. बँक मित्रांना निर्धारित सेवाशर्ती लागू करण्यात याव्यात. बँक आणि बँक मित्र यातील मध्यस्त यांना दूर सारले जावे. बँक मित्रांना किमान मेहनताना दिला जावा ज्यासाठी त्यांच्याकडून किमान निर्धारित काम करून घेतले जावे व व्यवहारासाठी योग्य त्या दराने कमिशन दिले
जावे.
यात निर्धारित काळानंतर योग्य ती वाढ करण्यात यावी. बँक मित्रांच्या नेमणुका भौगोलिक सीमा, खात्यांची संख्या, व्यवहार या निकषावर केल्या जाव्यात. बँक मित्र देत असलेल्या सेवांसाठी जागा, वापरत असलेला डाटा, स्टेशनरी, वाहन खर्च
याची भरपाई देण्यात यावी. बँक मित्र करत असलेले कार्यालयीन कामकाज यात कायदेशीर किंवा अर्ध कायदेशीर (टणअडख ङएॠअङ) विवाद निर्माण झाले तर त्याचा निपटारा करण्याची जबाबदारी बँकेने घ्यावी. बँक मित्र ते करत असलेल्या कार्यालयीन कामकाजाचा भाग म्हणून पैशांची ने आण करतात. यातील जोखीम लक्षात घेता त्यांच्या मागण्या तातडीने मान्य करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज युनियन पुणे यांनी पाठींबा दिला असल्याची माहिती ऑर्ग. सेक्रेटरी प्रकाश कोटा यांनी दिली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी यावेळी निवेदन स्वीकारत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत
साबळे, भूषण थोरात, नितीन चिखले आदी उपस्थित होत दूध संघाच्या अवसायन प्रक्रियेचा आदेश होत नसल्याने उपोषण
नगर – अहमदनगर तालुका सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघ मर्यादित या संस्थेच्या अवसायन प्रक्रियेला १७ महिन्यांचा प्रदीर्घ कालावधी उलटूनही अंतिम आदेश न झाल्यामुळे कर्मचार्यांच्या वतीने विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) नाशिक येथील कार्यालयासमोर साखळी आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. तर सर्वप्रथम कर्मचार्यांच्या देणग्यांचे निवारण करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. १ मे महाराष्ट्र दिनापासून तायगा शिंदे
व गजानन खरपुडे यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या उपोषणात कुंडलिक देवकर, दत्तात्रय बेकारसे, अशोक
डहाने, आप्पासाहेब ढवळे, अशोक धनगर, बाबजी शिंदे, भाऊसाहेब पळसकर, रमेश वायकर, बाबासाहेब चतुर, संभाजी निमसे, कोंडीभाऊ शेळके, बाळासाहेब थोरात,
सुनिल निमसे, बाळासाहेब बेरड सहभागी झाले होते. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) नाशिक विभाग यांनी संघाला अवसायनात घेतल्याचे अंतरिम आदेश काढले होते. मात्र, कायद्यानुसार एक महिन्याच्या आत अंतिम आदेश अपेक्षित असतानाही आजतागायत तो आदेश न झाल्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये असंतोष पसरला आहे. सदर निर्णयात माजी संचालक मंडळाने संघाचे आर्थिक नुकसान केल्याचे पुरावे असूनही त्यांच्यावर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. उलट, त्यांच्या पाठीशी राजकीय पाठबळ असल्याचा गंभीर आरोप कर्मचार्यांनी केला आहे.
कर्मचार्यांचे म्हणणे आहे की, सध्याचे प्रभारी कार्यकारी संचालक माजी संचालक
मंडळाच्या संपर्कात राहून कारवाईस विलंब लावत आहेत. देणी आणि प्रॉव्हिडंट फंड
मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कार्यालयाकडून देण्यात येत नाहीत. एवढेच नव्हे,
तर कार्यालयाकडून योग्य माहिती देण्यासही टाळाटाळ होत आहे.
प्रशासनाच्या दिरंगाईमुळे कर्मचार्यांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळत नसून, ही बाब
अन्यायकारक आहे. न्यायालय किंवा इतर कोणत्याही प्राधिकरणाकडून स्थगिती आदेश
नसताना, अवसायनाचे अंतिम आदेश प्रलंबित ठेवणे हा राजकीय हस्तक्षेप असल्याचा
ठपका कर्मचार्यांनी ठेवला आहे. यामुळे संघातील कर्मचार्यांना आर्थिक व मानसिक त्रास
सहन करावा लागत असल्याचे म्हटले आहे. अरुणकाका जगताप यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नगर – विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून दोन वेळा आमदारकी भूषवलेले अरुणकाका जगताप
यांच्या पार्थिवावर २ मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास नगरच्या अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो काका प्रेमींनी साश्रू नयनांनी शोकाकुल वातावरणात
त्यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक अशा सर्वच क्षेत्रातील हजारो नागरिक उपस्थित होते. राज्य शासनाच्यावतीने क्रीडामंत्री दत्ता भरणे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी सुधीर पाटील व तहसिलदार संजय शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. पोलिसांनी शोक धून वाजवल्यावर बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. मागील सुमारे महिनाभरापासून आजारपणामुळे अरुणकाका जगताप यांच्यावर पुण्याच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. २ मे रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत
मालवली. त्यानंतर दुपारी त्यांचे पार्थिव भवानीनगर येथील घरी आणण्यात आले. यावेळी अनेकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
सायंकाळी चारच्या सुमारास फुलांनी सजवलेल्या रथातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी ‘अरुणकाका
अमर रहे…’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. गुणे आयुर्वे द महाविद्यालयात काही काळ पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात
आले होते.. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास अमरधाम मध्ये अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी अमरधाम मध्ये मोठी गर्दी झाली होती. यावेळी झालेल्या शोक सभेत अरुणकाका जगताप यांना श्रद्धांजली वाहताना अनेकांनी
त्यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा दिला. 


