नगर – महावीरांनी देशाला शांततेचा अहिंसेचा आणि सत्यता, धर्म पालन करण्याचा मोठा संदेश दिलेला आहे. या संदेशाचे मनोभावे पालन करून जैन समाज आजही सर्वात मोठा दानशूर म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत. भगवान महावीर यांनी विश्वाला शांतता आणि अहिंसेचा संदेश दिला, असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांनी
केले. आमदार अरुण जगताप हे रुग्णालयातून लवकर बरे होतील व पुन्हा आरोग्यमय जीवन व्यतीत करतील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रा.शिरीष मोडक, विद्यालयाचे चेअरमन अजित बोरा, डॉ.पारस कोठारी, प्रा.ज्योती कुलकर्णी, मुख्याध्यापिका डॉ. श्रीमती मंगला भोसले, विठ्ठल उरमुडे, पर्यवेक्षक गोविंद धर्माधिकारी, अशोक डोळसे, दीपक शिरसाठ, नितीन केने, अनंत जोशी, अमोल कदम आदी उपस्थित होते. गुलाब पुष्प देऊन व शब्द सुमनांनी स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका डॉ.
मंगला भोसले यांनी केले
भगवान महावीरांबद्दल श्रीमती क्रांती मुंदानकर व रवींद्र चोभे या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. विद्यालयात एन.एम.एम.एस. या परीक्षेत विशेष यश संपादन केल्याबद्दल विद्यार्थी चि.प्रतीक सागर वडागळे व त्याच्या पालकांचा विद्यालयाचे ज्येष्ठ लेखनिक गोवर्धन पांडुळे यांचा उत्कृष्ट कामाबद्दल अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे शिक्षक सुनील कुलकर्णी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक दीपक आरडे यांनी
केले. याप्रसंगी शिक्षक व पालक उपस्थित होते.