वारंवार गो हत्येचे गुन्हे करणार्‍यांवर आता मकोका अंतर्गत कारवाइ

0
70

आमदार संग्राम जगताप यांची लक्षवेधी सूचना त्वरित मान्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

नगर – गोहत्या व गो तस्करी करणार्‍यांवर कडक कायदेशीर कारवाई होणे आवश्यक असून त्यांच्यावर वारंवार गुन्हे दाखल होऊनही ते गो हत्या करतच आहेत. अशांवर मकोका सारख्या कडक कायदेशीर कायद्याने कारवाई करण्याची मागणी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय  अधिवेशनात अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी गुरुवारी लक्षवेधी सूचना मांडत केली. या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी सांगितले, जर एखाद्यावर गोहत्येचे वारंवार गुन्हे दाखल झाले तर आता त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा  मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा
करत निर्देश देत असल्याचे लक्षवेधी सूचना त्वरित मान्य केली. यावेळी गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनीही चर्चेत भाग घेतला.

आ. संग्राम जगताप यांनी अहिल्यानगर मधील श्रीगोंदा तालुयात घडलेल्या घटनेचा आधार घेत त्यांनी ही लक्षवेधी मांडली. आ. जगताप म्हणाले, २ नोव्हेंबर २०२४ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे फटाके वाजवण्यावरून झालेल्या भांडणात गो तस्करी करणार्‍या अतिक कुरेशी याने केलेल्या मारहाणीत राम ससाणे यांचा मृत्यू झाला होता. गो हत्या व तस्करी तसेच गुटख्याची तस्करी करणार्‍या अतिक कुरेशी गँगची असलेल्या मोठ्या दहशतीमुळे कोणीही या विरोधात गुन्हा दाखल करण्यास पुढे आले नाही. पोलिसांनीही एव्हढ्या मोठ्या घटनेकडे दुर्लक्ष केले. या कुरेशीवर गो हत्येचे अनेक गुन्हे दाखल असूनही त्याच्यावर काहीच कारवाई झालेली नाही, असे सांगितले.

या घटनेचा दाखला देत आ.संग्राम जगताप यांनी अहिल्यानगरमध्ये गो हत्या व तस्करी करणार्‍यांची मोठी
दहशत अहिल्यानगर जिल्ह्यात असल्याचे सरकारच्या निर्देशनास आणून दिले. त्यामुळे गो हत्या व तस्करी करणार्‍यांवर वारंवार गुन्हे दाखल होऊनही ते जेलमधून जामिनावर सुटतात व पुन्हा पुन्हा हाच गुन्हा करत असतात. त्यामुळे अशांवर कडक कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने जसा लव्ह जिहाद साठी कायदा करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. तसेच गो हत्येचे वारंवार गुन्हे दाखल झालेल्यांवरही कारवाईसाठी मकोका, एम.पी.डी. या सारख्या कडक कायदे आणावेत. तसेच श्रीगोंदा येथे घटनेत सरकारने लक्ष घालून विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, अशी मागणी केली. यावेळी गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनीही श्रीगोंदा येथे मारहाणी घटने संदर्भात गुन्हेगारांवर पोलीस कारवाई
करत असल्याचे सांगितले.