तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला इशारा
नगर – शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील संपूर्ण आगरकर मळा, रेल्वेस्टेशन परिसर काटवण खंडोबा, कायनेटिक चौक, गायके मळा, पंचशील वाडी, इंगळे वस्ती हे परिसर व सर्व टाकी वरील मेन लाईन वरील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. आम्ही वारंवार प्रशासनाला कळवून सुद्धा काही सुधारणा झाली नाही. पाण्याची टाकी वेळेवर भरत नाही.
त्यामुळे नागरिकास पाणी मिळत नाही गेल्या १ ते २ महिन्यापासून सांगून देखील काही सुविधा होत
नाही तरी याची दखल घेऊन पाण्याच्या आवक मध्ये वाढ करण्यात यावी अन्यथा महानगरपालिकेत
उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. प्रभाग क्र.१५ मधील आगरकर मळा
भागातील नागरीकांच्या वतीने पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, यासाठी मनपा आयुक्त यशवंत डांगे
यांना निवदेन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी माजी नगरसेवक अनिल शिंदे, दत्ता
जाधव, प्रशांत गायकवाड, दिपक खैरे यांच्यासह परिसरातील नागरीक उपस्थित होते.
मनपा एकीकडे पाणीपट्टीची भरमसाठ वाढ करते, तर दुसरीकडे नागरीकांना पाण्यावाचून
वंचित ठेवते. नागरीकांना आधीच दिवसाआड पाणी आणि त्यातही कमी दाबाने पुरवठा होतो. त्यामुळे
नागरीकांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागते. तरी यामध्ये सुधारणा होणे गरजचे आहे .
अन्यथा नागरीकांसह मनपामध्ये तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे दत्ता जाधव
यांनी सांगितले. यावेळी बोलताना नगरसेवक अनिल शिंदे म्हणाले की, सर्वत्र उन्हामुळे पाण्याची कमतरता
वाढू लागली. नागरीकांना पाण्यासाठी वनवन करावी लागत आहे. या अगोदर सुध्दा मनपाच्या
पाणी पुरवठा विभागास आम्ही सांगितले होते की, या भागातील नागरीकांना पाणी पुरवठा हा कमी
प्रमाणात व अपुर्या दाबाने तर काही भागांमध्ये पाणी पुरवठा होतच नाही. त्यामुळे नागरीकांच्या रोषाला
सामोरे जावून आम्हा नगरसेवकांना उत्तरे द्यावी लागतात आणि प्रशासनाचे कोणीही या भागाकडे
लक्ष देत नाही. नागरीकांचा जर उद्रेक झाला तर त्याची सर्व जबाबदारी मनपा प्रशासनावर राहिल,
असा इशाराही त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.