अंत्योदय योजनेतील धारकांना लाभ मिळण्यासाठी गोरगरीब व सर्वसामान्यांना इष्टांक वाढवून मिळावा

0
125

निखिल वारे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

नगर – शासनातर्फे अहिल्यानगर मधील गोरगरीब, सामान्य नागरिकांसाठी अंत्योदय योजना सुरू झाली. त्याचा लाभ सर्वांना
मिळत होता. मात्र गेल्या काही महिन्यापासून नवीन लाभार्थी नोंदणीचे काम बंद आहे. अधिक माहिती घेता असे समजले की
अहिल्यानगरचा इष्टांक पूर्ण झालेला आहे. नवीन लाभ धारकांना लाभ मिळवण्यासाठी नोंदणीसाठी वारंवार चकरा मारून देखील नोंदणी होत नाही. रेशन कार्ड ऑनलाइन करण्यासाठी अडचणी येतात. यासाठी आ.संग्राम जगताप यांचा देखील शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. तरी राधाकृष्ण विखे पाटील यांनी पालकमंत्री या नात्याने या विषयात लक्ष घालून पाठपुरावा करावा, जिल्ह्याचा इष्टांक वाढवून द्यावा, अशी मागणी श्री.वारे यांनी केली. अहिल्यानगरचा इष्टांक पूर्ण झालेला असुन जिल्हाधिकारी यांनी देखील शासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे. अद्यापपर्यंत शासनाकडून इष्टांक वाढवून आलेला  नाही. असे श्री.वारे यांनी  सांगितले. वाढवून मिळवावा. या विभागाशी, संबंधित मंत्री, अधिकार्‍यांशी बोलून योग्य तो मार्ग
आपण काढावा, असे श्री. वारे म्हणाले