छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी – अनुराग धूत
नगर – हिंद सेवा मंडळाच्या बागडपट्टी विभागातील प्राथमिक शाळेतील २००
विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलन प्रसंगी महानाट्यातून साकारला छत्रपती शिवरायांचा इतिहास.
माऊली सभागृहात घोड्यावर स्वार झालेल्या
बाल शिवाजीची एन्ट्री पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
या महानाट्यात छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव,
रायरेश्वर येथे मावळ्यांसोबत घेतलेली स्वराज्याची
शपथ, अफजल खान वध, तानाजी मालुसरे यांचा
कोंढाणा येथील पराक्रम, गड आला पण सिंह गेला,
पावनखिंड येथील बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम,
भव्यदिव्य शिवराज्याभिषेक सोहळा हे सर्व ऐतिहासिक
प्रसंग पाहुन प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
सावेडी, माऊली सभागृह येथे हिंदसेवा
मंडळाच्या बागडपट्टी विभागातील प्राथमिक शाळेचा
वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ
उत्साहात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे उद्योजक
अनुराग धूत, माजी नगरसेवक धनंजय जाधव, प्रकाश पाटील आदींसह हिंद सेवा मंडळाचे
ज्येष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा, हिंद सेवा मंडळाचे कार्य. सदस्य जगदिश झालानी,
अनंत देसाई, ज्योती कुलकर्णी, विष्णु सारडा, शाळेचे चेअरमन मधुसूदन सारडा, शालेय
समिती सदस्य रविंद्र गुजराती, वरूण सारडा, प्राचार्य सुनिल सुसरे, सीताराम सारडा
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ.मंगला भोसले, मेहेर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या अनुरीता
झगडे, प्रा.शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे आदींसह विद्यार्थी, पालक व शिक्षक शिक्षकेतर
कर्मचारी उपस्थित होते.
उद्योजक अनुराग धूत म्हणाले, हिंदसेवाच्या प्राथमिक शाळेत मोठ्या प्रमाणात
शैक्षणिक उपक्रम राबवत असल्याने शाळेची प्रगती होत आहे.तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी
पूर्ण केली जाते. विद्यार्थ्यांचे कला गुण व जिज्ञासा ओळखून विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षक
महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. शाळेचे २०० विद्यार्थी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमी
इतिहासावर आधारित महानाट्य सादर करीत आहेत. ही कौतुकास्पद बाब आहे. छत्रपती
शिवाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
धनंजय जाधव म्हणाले, हिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेचे विविध उपक्रम
कौतुकास्पद आहे. तसेच मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे यांनी शाळेला मैदान नसल्याने टेरेसवर
क्रीडा मैदान तयार करण्याची सुंदर संकल्पना मांडली आहे. शहरात क्रीडा मैदानी
नसल्याने टेरेसवर क्रीडा मैदान साकारण्याची कल्पना पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री
राधाकृष्ण विखे पाटील व सुजय विखे पाटील यांच्या
समवेत आ. संग्राम जगताप यांचे सहकार्य लाभेल.
असे आश्वासन दिले.
प्रकाश पाटील म्हणाले, छत्रपती शिवरायांचा
तेजस्वी इतिहास पाहून सर्वजण भरून गेले आहेत.
शाळेतील मुलांची संवाद करणे आवडत असल्याने
त्यांच्याशी हितगुज साधून आपला अनुभव त्यांना
सांगितल्यास त्यांचे भविष्य घडविण्यासाठी ते अनुभव
उपयोगी पडतील.
प्रास्ताविकात मधुसूदन सारडा म्हणाले,
मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे यांच्या प्रयत्नातून पहिली
ते चौथीच्या विद्यार्थ्यांना एम एस सी टी च्या परीक्षेला
बसण्याची परवानगी मिळाली आहे. मागील वर्षी वीस
विद्यार्थी एम.एस.सी. आय.टी.परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक
यांच्या अथक परिश्रमामुळे पहिली ते चौथीचे विद्यार्थी १२ ते १३ वर्षापासून स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण
होत आहेत.
शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. या स्नेहसंमेलन
कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. परिचय
सौ.मनीषा साळी यांनी करून दिला. व स्वागत सौ.अरुणा धाडगे यांनी केले. तर सौ.विद्या पोतदार
यांनी अध्यक्ष निवड केली. सूत्रसंचालन सौ. गौरी ब्रह्मे यांनी केले. तर आभार सौ. अंजली सासवडकर
यांनी मानले.