तरुणींनी करिअर बरोबर आपल्या आरोग्याकडेही लक्ष केंद्रित करावे

0
37

डॉ. शितल शिंदे यांचे प्रतिपादन

नगर – आजच्या घडीला महाविद्यालयीन
तरुणींनीमध्ये भ्रमणध्वनी, फास्ट फूडचे आती सेवन
आणि रात्री उशिरापर्यंत जागणे हा कलनिर्माण
झाल्यामुळे त्यांचे भावनिक, मानसिक आणि शारीरिक
आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी विविध प्रकारचे
रोग व विविध प्रकारच्या मनोविकृती त्याच्या मध्ये
दिसून येत आहेत. महाविद्यालयीन तरुणींनी आपल्या
करिअर बरोबर आरोग्याकडे ही लक्ष केंद्रित करावे, असे
प्रतिपादन बुथ हॉस्पिटलच्या आहार व पोषण विभाग
प्रमुख डॉ.शितल शिंदे यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विद्यार्थी
विकास मंडळ व अहमदनगर महाविद्यालय, अहिल्यानगर,
विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय
कन्या अभियान अंतर्गत ‘महाविद्यालयीन तरुणींचे
आरोग्य, सद्यस्थिती व भवितव्ये’ या विषयावर डॉ.
शितल शिंदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले
होते. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी कार्यक्रमास
उपप्राचार्य प्रा.डॉ.नोएल पारगे, उपप्राचार्य प्रो. डॉ. प्रितमकुमार
बेदरकर आणि संगणक विभागाच्या प्रा. फरहिन खान उपस्थित
होते.
पुढे बोलताना डॉ.शितल शिंदे म्हणाल्या की, वेळेवर जेवण न
करणे, सकस आहाराचा अभाव आणि नियमित व्यायामाचा अभाव
या सर्व गोष्टींमुळे आज महाविद्यालयीन तरुणींचे आरोग्य खालवत
आहे. त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या अभ्यासावर त्याचबरोबर
कार्यसंस्कृतीवर होतांनी दिसून येत आहे. विविध
अवयवांचे कॅन्सर सारखे घातक रोग अल्पकालावधीत
होत आहेत. हे टाळण्यासाठी महाविद्यालयीन तरुणींनी
याबाबत सजग राहिले पाहिजे. चांगल्या सवयी, नियमित
व्यायाम करून शारीरिक, मानसिक आणि भावनिक
आरोग्य जपले पाहिजे. त्याचबरोबर आरोग्याचे पोषण
करण्यासाठी सकस आहार नियमित घेतला पाहिजे,
असे मत त्यांनी व्यक्त केले .
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना
वाणिज्य विभागातील प्रा.डॉ शबनम गुरुग म्हणाल्या
की, महाविद्यालयातील तरुणी आरोग्या बाबत जागरूक
नाहीत या व्याख्यान रूपाने त्यांच्यामध्ये आरोग्य विषयक
जागरूकता निर्माण होईल, असे सांगितले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनुजा विधाटे हिने
केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास
अधिकारी प्रा .डॉ भागवत परकाळ यांनी केले.
पाहुण्याचा परिचय अश्वीनी खरजुलेने करुन दिला.
तर आभार नजन साक्षी हीने मानले. कार्यक्रम यशस्वी
करण्यासाठी प्रियंका मुंगसे, साक्षी निकम, कापसे वैष्णवी, प्रतीक्षा
जिने, पूजा मस्के गोपाळे मनीषा, कुलात प्राची आणि साक्षी शेळके
यांनी विशेष परिश्रम घेतले.