तरुण देशभक्त हा खरी देश सेवा करतो

0
105

कार्तिकी पवार यांचे प्रतिपादन; डॉ.विखे पा. अभियांत्रिकीत देशभक्ती आणि तरुण या विषयावर व्याख्यान

नगर – भारत हा देश तरुणांचा देश आहे. ४२ कोटी तरुण या देशात आहेत. योग्य मार्गदर्शन व संस्कार मिळणे खूप
गरजेचे आहे. देश हा महासत्ता होण्यासाठी तरुणांची योगदान महत्त्वाचे आहे. विज्ञानाने जेवढी प्रगती केली तशी काही अधोगती होत आहे. विज्ञानाबरोबर चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी येतात त्यातून चांगल्या गोष्टी घ्या. मोबाईलमुळे
तरुणांची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. तरुणांनी मातृभूमीवरील अन्याय सहन न करता लढा द्या. देशभक्ती
एक प्रेम आहे आजचा तरुण हा खरी देश सेवा करतो, असे विचार व्याख्यातिका कुमारी कार्तिकी पवार हिने
व्यक्त केले. विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी
देशभक्ती आणि तरुण या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कु.कार्तिकी पवार
हिने मार्गदर्शन करताना आपले विचार मांडले. पाच दिवस वेगवेगळया विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
केले. त्यांच्या व्याख्यानात मुख्यतः देशाचे व तरुणांचे प्रश्न, तसेच देशभक्ती आणि तरुण, छत्रपती शिवाजी
महाराज, मासाहेब जिजाऊ, मुलींचे विविध प्रश्न अशा विषयांवर सखोलपणे आपले विचार मांडले. तसेच या
व्याख्यानात युवा शक्ती, राष्ट्रशक्ती, राष्ट्र निर्माणासाठी युवकांची भुमिका यासारख्या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमामध्ये ऐतिहासिक विषय, समाजातील बदल, तरुणांची राष्ट्रभक्ती, त्यांची भुमिका असे विषय मांडण्यात
आले. या कार्यक्रमासाठी प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे ६५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.उदय नाईक यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही व्याख्यानमाला
किती उपयोगी आहे हे विशद केले. तसेच त्याचा विद्यार्थ्यांनी त्यांच्या
दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करुन घ्यावा, असे आवाहन केले. असे
कार्यक्रम आयोजीत करणे आजचे तरुण पिढीला अधिक महत्वाचे
बनले आहे. असे ते म्हणाले डॉ.सतिश मरकड यांनी कु. कार्तिकी पवार यांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना या उपक्रमाचे महत्व समजावून सांगितले. तरुण पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवण्याच्या दृष्टीने डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे सेक्रेटरी जनरल डॉ.पी.एम. गायकवाड,  डायरेटर टेनिकल सुनिल कल्हापुरे यांनी या कार्यक्रम
आयोजनासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विभागप्रमुख डॉ. सतिश मरकड, समन्वयक डॉ. संदिप उदावंत, प्रथम वर्ष अभियांत्रिकी को-ऑर्डीनेटर प्रा.गणेश शिरसाठ यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचे संस्थेचे चेअरमन राधाकृष्ण विखे पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील यांनी कौतुक केले