१ कोटी ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
नगर – भंगार साहित्याच्या नावाखाली तांब्याच्या धातूच्या
साहित्याची अवैध वाहतूक करत सदर साहित्य काळ्याबाजारात विक्री
साठी घेवून चाललेला संशयित कंटेनर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने
नगर एमआयडीसी परिसरात १३ फेब्रुवारीला सायंकाळी पकडला आहे.
या कारवाईत कंटेनर सह १ कोटी ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात
आला आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे
शाखेचे पो.नि.दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार
संतोष लोढे, फुरकान शेख, संतोष खैरे, शिवाजी ढाकणे, किशोर
शिरसाठ व प्रशांत राठोड यांचे पथक अवैध धंद्यांची माहिती घेत
असताना पथकाला खबर्यामार्फत गोपनीय माहिती मिळाली की, एक
कंटेनर बेकायदेशीरपणे तांबे व ऍ़ल्युमिनीअमचा भंगार माल काळ्या
बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने पुणे येथून दिल्लीकडे जात असून तो
सध्या दिल्ली पुना ट्रान्सपोर्ट एजन्सी, एमआयडीसी, अहिल्यानगर येथे
थांबलेला आहे, ही माहिती मिळताच पथकाने एमआयडीसी येथे जाऊन
खात्री केली असता संशयीत कंटेनर मिळून आला. कंटेनर चालकाकडे
चौकशी केली असता त्याचे नाव शैलेंद्र सोरन सिंह (वय ४५, रा.
स्वरूपनगर, नॉर्थ वेस्ट दिल्ली) असे असल्याचे सांगीतले. त्याचेकडे कंटेनरमधील मालाबाबत विचारपूस
केली असता तो अर्धवट व दिशाभुल करणारी माहिती सांगु लागला. पथकाने कंटनेरचा दरवाजाचा
उघडून पाहणी केली असता त्यामध्ये तांब्याचे पाईप असलेले बंडल, तांब्याचे जुने भांडे, तांब्याची
तार, ऍ़ल्युमिनीअमची वेगवेगळया आकाराचे तुकडे असलेला माल मिळून आला. कंटेनर चालकाकडे
मुद्देमालाचे पावतीबाबत विचारपूस केली असता त्याने मुद्देमालाची पावती
दाखविली. त्यात मुद्देमालाबाबत बिल्टी व प्रत्यक्षात असलेला मुद्देमाल
यामध्ये तफावत दिसुन आली.
त्यामुळे पथकाने कंटनेर चालक शैलेंद्र सोरन सिंह यास ताब्यात
घेऊन, ३० लाखांचा कंटनेर, १ कोटी ८ लाख रुपये किमतीचे एकुण
१८ हजार किलोग्रॅम वजनाचे तांबे व ऍ़ल्युमिनीअम धातुचे साहित्य
असा एकुण १ कोटी ३८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात
आला.
ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन जप्त केलेल्या मुद्देमालाबाबत
विचारपूस केली असता त्याने ट्रान्सपोर्टचे मालक पुरूषोत्तम तिलकराज
अग्रवाल, रा.पुणे (फरार) यांचे सांगणेवरून मालाचे पुरवठादार एच.
एस. ट्रेडींग कंपनी, तामीळनाडू यांचेकडील मालापैकी तांब्याचे पाईप
असलेले बंडल हे बब्बु (पुर्ण नाव माहिती नाही) व बब्बु याचा मित्र यांनी
वाघोली, जि.पुणे येथून कंटेनरमध्ये भरून दिला.कंटनेरमधील मुद्देमाल
हा दिल्ली येथे गेल्यानंतर माल कोठे पोहच करावयाचा आहे याबाबत
माहिती नंतर सांगणार होते अशी माहिती सांगीतली.
त्यामुळे पोलिसांनी कंटनेर चालक, वाहनाचे मालक, मालाचे
खरेदीदार व पुरवठादार यांचे मदतीने तांबे व ऍ़ल्युमिनीअमचा भंगार माल बेकायदेशीरपणे भरून, खोटी
व बनावट बिल्टी तयार करून, सदरचा मुद्देमाल काळया बाजारात विक्री करण्याचे हेतुने दिल्ली येथे
घेऊन जाण्याकरीता मिळून आल्याने ५ आरोपीविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात बीएनएस २०२३
चे कलम ३०३ (२), ३३६ (३), ३४० (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.