छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणीचे अनुकरण करत आपल्या संस्कृतीवर प्रेम करावे

0
63

आ. संग्राम जगताप यांचे प्रतिपादन; छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर परिसरात स्वच्छता अभियान

नगर – छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीचे अनुकरण करून आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीवर तरुण पिढीने प्रेम करावे, उड्डाणपुलाचे असणारे नगरकरांचे स्वप्न पूर्ण झाले असून पिलर वर छत्रपती शिवाजी महाराज यांचा
जीवनपट रेखाटला आहे त्यांचा इतिहास महान आहे, डीएसपी चौक ते शिल्पा गार्डन पर्यंत स्वच्छता मोहीम राबवली
असून महापालिकेने दोन महिन्यातून एकदा उड्डाणपूल परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवावे १९ फेब्रुवारी रोजी
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असून त्या पार्श्वभूमीवर उड्डाणपुलाखालील फुटपाथ, डिव्हायडर, गटारीची स्वच्छता
करण्यात आली असून माती उचलण्यात आली, तसेच खांबावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्रे पाण्याने धुवून
काढण्यात आली असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महापालिका यांच्या वतीने उड्डाणपूल परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात
आले, यावेळी आ. संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा
आठरे, जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, अजिंय बोरकर, युवक अध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, युवराज शिंदे, वैभव ढाकणे, साधना बोरुडे आदी उपस्थित होते
संपत बारस्कर म्हणाले की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्माच्या युवकांचे
संघटन करून लढवय्ये मावळे तयार केले. त्यांच्याच प्रेरणेतून आज युवकांनी संघटित होऊन समाजोपयोगी कार्य केले
पाहिजे. स्वच्छता मोहीम ही काळाची गरज आहे. आपण समाजामध्ये वावरात असताना समाजाचे काहीतरी देणे लागते
या भावनेतून प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पुतळा परिसर आणि उड्डाणपूल परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात
आली असे ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी उड्डाणपूल परिसरामध्ये महापालिकेला स्वच्छता अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र महापालिकेने स्वच्छतेचा फक्त दिखावा केला होता. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी उड्डाणपूल परिसरातील स्वच्छता मोहिमेची फिरून पाहणी केली असता नाराजी व्यक्त करत प्रभाग अधिकार्‍यांना सूचना देत सांगितले की, शिल्पा गार्डन ते महेश टॉकीज पर्यंतची स्वच्छता मोहीम आज पूर्ण करावी. शहरातील काही नागरिक उड्डाणपूल परिसर व खांबावर आपल्या व्यवसायाची जाहिरात लावतात त्यामुळे शहराचे विद्रोपीकरण होत आहे, यापुढे कोणत्या व्यावसायिकांनी उड्डाण फुलाच्या खांबावर जाहिरात लावली तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल तसेच त्याच्या व्यवसायाचे ठिकाण देखील सील केले जाईल असा इशारा प्रभाग अधिकारी बबन काळे यांनी दिला.