नगरमध्ये बांगलादेशी घुसखोरांना कागदोपत्री आश्रय देणाऱ्या सेतू चालकांवर कारवाई करावी

0
85

नगर – नगर शहरात अनेक सेतू केंद्रे हे जिहादी वृत्तीच्या सेतू चालकांकडे आहेत जे नगर शहरासह आजू बाजूच्या परिसरात बांगलादेशी रोहिंग्यांना कागदोपत्री आश्रय देत आहेत. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आ. संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात आ. जगताप यांनी म्हंटले आहे की, हे सेतू चालक या बांगलादेशी रोहिंग्यांना आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, ड्राइव्हिंग लायसेन्ससह रेशन कार्ड देखील काढून देत आहेत. ज्यात तहसील कार्यालयातील कर्मचारी वर्ग चिरीमिरीसाठी या सर्व कागदपत्रांना मंजुरी देत आहेत. हा सर्व प्रकार गंभीर असून आपण स्वतः यात जातीने लक्ष घालून बांगलादेशी रोहिंग्यांना कागदोपत्री आश्रय देणारे जे कोणी जिहादी वृतीचे सेतू चालक असतील अश्या सर्वांची कारवाई करून सेतू केंद्रे रद्द करावीत अशी मागणी त्यांनी केली आहे.

आपल्या देशात बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढली असून महाराष्ट्र व त्यातल्या त्यात आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात घुसखोर अधिक वाढल्याचे दिसून आहेत. नुकतेच पुण्यात स्वारगेट परिसरात एका बांगलादेशी घुसखोराकडे आधार कार्ड, पॅन कार्ड सह मतदान कार्ड व ड्रायव्हिंग लायसेन्स देखील सापडले आहे. मालेगाव मधे एका घुसखोरास नकली जन्म दाखला दिल्याप्रकरणी तहसीलदारावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे, तसेच आपल्या अहिल्यानगर शहरात गेल्या काही महिन्यांपुर्वी जिहादी वृत्तीच्या सेतु चालकांमार्फत नकली शिक्के व बोगस आधारकार्ड बनवुन देण्याचा धक्का दायक प्रकार समोर आला होता. ज्याचा गुन्हा तोफखाना पोलिस स्टेशन येथे दाखल आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांगलादेशी घुसखोरी करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असताना नगर शहरात सेतू चालकांकडून असे गंभीर प्रकार घडत आहेत, ते थांबवा असे आ. जगताप यांनी म्हंटले आहे. यावेळी त्यांच्या समवेत सुरेश बनसोडे, सिद्धार्थ आढाव, सृजन भिंगारदिवे, ओंकार घोलप, गणेश कांबळे आदी उपस्थित होते.