शहराच्या लोकप्रतिनिधीबाबतची नाराजी व त्यांच्या माध्यमातून होणारी ताबामारी, दहशतीमुळे डॉ.सुजय विखे यांचे नगरमध्ये मताधिक्य घटले

0
81

कर्डिले, जगताप, कोतकर यांचा परिणाम लोकांवर झाल्यामुळे लीड कमी झाले त्यातून विखेंचा पराभव

नगर – लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नगर शहरात मिळालेल्या मतदानातून मोठ्या प्रमाणात भाजपा व माझ्यामुळे विखेंना नगर शहरातून ३१००० च्या वर लीड मिळाला आहे. याचे श्रेय घेण्याचा लाजिरवाणा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून व काही वृत्तपत्रातून जाणून-बुजून चालू आहे, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत लोढा यांनी केले नगर शहरात भारतीय जनता पार्टीचे पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात मतदार आहेत. १९९१ साली राजाभाऊ झरकर लोकसभेला उभे होते. त्यांना मिळालेल्या एकूण मतांमध्ये नगर शहरातून २४ हजार मते मिळाली होती. विखे विरुद्ध गडाख यांच्या अटीतटीच्या निवडणुकीत ही मते मिळाली होती. खासदार दिलीप गांधींना मोठे मताधियही नगर शहरातून मिळत होते. तसेच सुजय विखे यांना २०१९ च्या निवडणुकीत ५४ हजार मताधिय होते त्यापेक्षा जास्त मताधियाची यावेळेस अपेक्षा होती परंतु २०२४ निवडणुकीत सहकारी पक्षांचा विचार केला तर लीड  फक्त ३१००० मिळाला त्याला कारण नगर शहराच्या लोकप्रतिनिधीबाबत असलेली नाराजी त्याची व त्यांच्या टोळीची असलेली दहशत अवैध धंदे, व्यवसायाचे वाढलेले मोठे जाळे, नगर शहरात त्यांच्या माध्यमातून जागा ताबामारी, शहरात होणारे खुनाचे सत्र, एस पी ऑफीस प्रकरण, पोलिसांना हाताशी धरून विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणे इत्यादी अनेक प्रकार शहरात चालू आहे. आता तर सत्तेत असल्यामुळे या सर्व गोष्टींना राजाश्रय मिळाल्यासारखे झालेले आहे. त्यामुळे नगर शहरातील व्यापारी, बाजारपेठेत व सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्या बद्दल नाराजी होती. खासदार विखे यांना मत दिले तर यांची दहशत गुंडगिरी व अवैध व्यवसाय, जागा ताबामारी अजून मोठ्या प्रमाणात वाढेल. या विचारातून तसेच खासदार विखे यांच्या फॉर्म भरायच्या मिरवणुकीत ज्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन झाले. कर्डिले, जगताप, कोतकर त्यांचा मोठ्या प्रमाणावर परिणाम शहरातील लोकांवर झाला त्यामुळे लीड कमी झाला. कमी लीडमुळे खासदार विखेंचा पराभव झाला.

या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान या सर्व प्रकारची जाणीव झाली होती. त्याप्रमाणे संबंधितांना सांगितले होते की शहरातील या प्रवृत्तीला फार पुढे न आणता प्रचार करावा पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. ३१ हजाराचा लीड जो आहे तो भारतीय जनता पार्टीचा हा लीड आहे कोणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. नगर शहरात भाजपाने स्वबळावर विधानसभा निवडणूक या प्रवृत्तीच्या विरोधात लढवावी. त्याबाबत शहराची सध्याची असलेली भयानक परिस्थिती वरिष्ठांना पुराव्यासह देऊनही निवडणूक आम्ही लढून जिंकू असा आत्मविश्वास वसंत लोढा यांनी व्यक्त केला आहे. आता तर पक्षाला या लोकसभा निवडणुकीतून बर्‍याच गोष्टीचा उलगडा झालेला. या सोयरे धायरे पद्धतीमुळे भाजपचे नगर शहरात या दहा वर्षात फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हा पराभव आहे, असे भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत लोढा यांनी सांगितले.