पर्यावरणाचा èहास थांबवण्यासाठी तसेच वाढते जागतिक तापमान कमी करण्यासाठी भारतच नव्हे आंतरराष्ट्रीय स्तरावर वृक्ष लागवडीचा नारा दिला जात आहे. शहराच्या मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय च्या आवारात सामाजिक वनीकरण, तहसील, लाचलुचपत सह 10-12 सरकारी विभागाची कार्यालये आहेत परंतु सदर कार्यालयाच्या आवारात असलेली झाडे पाण्याअभावी जळू लागली आहेत. ज्या सरकारी कार्यालयातून झाडे जगवण्याचा संदेश दिला जाताे तिथेच सदर प्रकार सुरू आहे तसेच या प्रशासकीय कार्यालयाच्या आवाराची राेजच्या राेज साई ही केली जात नाही तसेच निर्माण हाेणारा कचरा ही जाळला जात आहे. तरी सदर कार्यालयाच्या आवारात असलेल्या स्वच्छतागृहाची साई, देखभाल,सुरक्षा तसेच परिसराच्या स्वच्छताची एक प्रभावी यंत्र्णा निर्माण करण्याची गरज असल्याचे येथे कामानिमित्त येणारे नागरिक व्यक्त करीत आहेत.