गणगौर उत्सवातून जुन्या परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे कार्य : आशाताई फिरोदिया

0
41

शहरात लोडी समाजातर्फे गण गौर विवाह सोहळा उत्साहात

नगर – राजस्थानी संस्कृतीत गणगौर उत्सवाला मोठी परंपरा आहे. नगरमध्येही गणगौर सारखा पारंपरिक सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करून महिला पुढच्या पिढीपर्यंत ही परंपरा पोहचवत आहेत. यानिमित्त सर्वजणी एकत्र येवून एकमेकींशी संवाद साधून सणाचा आनंद घेतात. यावर्षीही चांगला उत्साह पहायला मिळाला, असे यावेळी बोलताना आशाताई फिरोदिया म्हणाल्या. शहरातील लोडी साजन समाजातर्फे केशरगुलाब मंगल कार्यालयात गणगौर विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी शिव पार्वती अर्थात गण-गौर विवाह सोहळा साजरा झाला. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यामध्ये शहराच्या विविध भागामधील महिला सहभागी झाल्या होत्या. या गण-गौर सोहळ्याचे नियोजन जैन ओसवाल पंचायत सभा, जय आनंद महावीर युवक मंडळ व सहेली ग्रुपच्यावतीने करण्यात आले होते. सौ. आदिती सौरभ मुथा, सौ. वर्षा लाभेश ओस्तवाल, सौ. प्रगती रजत चोपडा, सौ. भावना अंकुश मेहेर या दाम्पत्यांच्या हस्ते गण-गौरची विधीवत पूजा करण्यात आली.

यावेळी सहेली ग्रुपच्या श्रीमती छायाताई फिरोदिया, आशाताई मुनोत, श्रीमती आशाताई फिरोदिया, मंगला मुथा, मिनाताई मुनोत, जयआनंद महिला मंडळाच्या अध्यक्षा संध्या मुथा, सेक्रेटरी सुरेखा बोरा आदी उपस्थित होते. जैन ओसवाल पंचायत सभेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, सहसेक्रेटरी संतोष गांधी, सी.ए. महेश भळगट, बाळासाहेब भंडारी, डॉ.विजय भंडारी, संपतलाल मुथियान, अ‍ॅड. विजय मुथा, अ‍ॅड.गौरव मिरीकर, अनिल मेहेर, संदीप गांधी, मंडळाचे सेक्रेटरी आनंद मुथा व पदाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी गण-गौरची वरात सचिन अशोकलाल कोठारी (मिरचीवाला) यांच्या निवासस्थानापासून काढण्यात आली. बँड पथक, पारंपारिक वेषभूशा केलेल्या व डोयावर शिव पार्वतीची मूर्ती घेतलेल्या महिला यात सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर वरात केशरगुलाब कार्यालयात पोहचली. याठिकाणी विवाह झाला. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यात पहिल्या दिवशी फळतीज पूजा, दुसर्‍या दिवशी झालावरणा व तिसर्‍या दिवशी विवाह असे धार्मिक कार्यक्रम होतात. झालावरणा कार्यक्रमात महिलांनी पारंपरिक राजस्थानी लोकनृत्य सादर केले. शितल गांधी यांनी अतिशय सुंदर राजस्थानी गीत सादर करतानाच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. गणगौर व्रत उत्तर भारतात गुढी पाडव्याच्या पर्वात साजरे केले जाते. या व्रताने पतीची कृपा आपल्यावर रहाते आणि कुमारिकांना चांगला पती मिळतो, अशी श्रध्दा आहे.

याचदिवशी शंकराने पार्वतीला आणि पार्वतीने समस्त स्त्री जातीला सौभाग्य बहाल केले होते. सुवासिनी हे व्रत घेण्यापूर्वी गौरीची स्थापना करतात व त्यांचे पूजन करतात. त्यानंतर गौरीची कथा सांगितली जाते. नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, जैन ओसवाल पंचायत व जय आनंद महिला मंडळाने सण उत्सव एकत्रित साजरे करून महिलांना एकत्र आणण्याची परंपरा सुरू केली आहे. दरवर्षी गण गौर विवाह सोहळ्यात महिला व युवती सहभागी होतात. अशा उपक्रमांतूनच पूर्वापार चालत असलेल्या परंपरांचे जतन होत असल्याचे त्यांनी सांगितले. स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सौ.पुष्पा ललित बनभेरु यांनी सर्व पूजेची व्यवस्था पाहिली. चकोर मुळे गुरुजी यांनी पूजाविधी केला. गण-गौर व्रत घराघरामधून केले जाते. त्यासाठी पांढर्या शुभ्र कागदावर शिव-पार्वतीची (गण-गौर) छबी कोरण्यात येते. त्यावर चंद्र,सूर्य व स्वस्तिक अशी मांगल्याची प्रतिके असतात. या प्रतिकांच्या वर ठिपयांच्या एका खाली एक तीन रांगा करतात. पहिल्या रांगेतील ठिपयांना कुंकु, दुसर्‍या रांगेतील ठिपयांना मेहंदी तर तिसर्या रांगेतील ठिपयांना काजळ लावून सजविले जाते. या चित्राभोवती मोळी फुलांच्या माळेसारखी बांधतात. जैन ओसवाल पंचायत सभा, जय आनंद महावीर युवक महिला मंडळ व सहेली ग्रुपच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. शेवटी संतोष गांधी यांनी आभार मानले.