आरोग्य

0
33

तल्लख स्मरणशतीसाठी
३-६ ग्रॅम शंखपुष्पी पूड साखर आणि दुधाबरोबर नेहमी सकाळी घेतल्याने स्मरणशक्ती
वाढते. शंखपुष्पी २-४ ग्रॅम मुलांना दिल्याने मुलं खूपच बुद्धिमान आणि शहाणे होतात.
सकाळी शंखपुष्पीचे थोडे पाणी घालून रस काढता येतो. शुद्ध रस १०-२० मिलीग्रॅम
किंवा २-४ ग्रॅम पूड मध, तूप आणि साखरेबरोबर सहा महिन्यांपर्यंत सेवन करीत
राहिल्याने स्मरणशक्ती आणि बुद्धीत वाढ होते. दूध, तूप किंवा पाण्यासोबत मिलीग्रॅमच्या
प्रमाणात दिवसातून दोन-तीन वेळा एक वर्षापर्यंत किंवा किमान एक महिन्यापर्यंत घेतल्याने
स्मरणशक्तीत वाढ होते. २५० ग्रॅम खडीसाखरेसोबत पाक करून रोज १० ग्रॅम सकाळ-संध्याकाळ
खाण्याने विसरण्याची सवय दूर होते.