गोरक्षकावर खुनी हल्ला; दोन आरोपी केले जेरबंद

0
42

फरार होण्याच्या तयारीत असताना बसस्थानकावर घेतले ताब्यात

नगर – शेवगाव तालुयातील अमरापूर येथे गोरक्षकावर खुनी हल्ला करणार्‍या दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. ते फरार होण्याच्या तयारीत असताना पथकाने त्यांना बस स्थानकावरून ताब्यात घेतले आहे. अल्तमश बशीर शेख (वय २३), अलताब तैय्यब शेख (वय २६, दोघे रा. अमरापुर, ता. शेवगांव) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. अमरापुर येथील कुरेशी मोहल्ला येथे गोवंशीय जनावरांची कत्तल होत असलेबाबत माहिती मिळाल्याने गोरक्षक असलेले रविंद्र भिमा गायकवाड (वय ३०, रा. नाथनगर, पाथर्डी) हे तसेच त्यांचेसोबत इतर गोरक्षक सोमवारी (दि.११) कुरेशी मोहल्ला येथे गेले असता आरोपी राजु कुरेशी व त्याचे इतर साथीदारांनी गायकवाड यास जिवे ठार मारण्याचे उद्देशान लोखंडी रॉड, लोखंडी सत्तुरने मारहाण करुन गंभीर जखमी केले होते. सदर घटनेबाबत शेवगांव पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर घटना ही २ समाजामध्ये घडलेली असल्याने व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शयता असल्याने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांना सदर गुन्ह्यातील आरोपी अटक करणेबाबत आदेश दिले होते. त्या नुसार पो. नि.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार संतोष लोढे, गणेश भिंगारदे, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, फुरकान शेख, रणजीत जाधव, शिवाजी ढाकणे, संदीप चव्हाण, किशोर शिरसाठ, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, उमाकांत गावडे, संभाजी कोतकर यांचे पथक कारवाई साठी रवाना केले. या पथकाला तपास सुरु असताना माहिती मिळाली की आरोपी अलताब सय्यद व त्याचा साथीदार अल्तमश शेख हे अमरापुर गावामधुन कोठेतरी पळुन जाण्याचे तयारीत बस स्टँडवर उभे आहेत. ही माहिती मिळताच या पथकाने तेथे जावून त्यांना ताब्यात घेतले व शेवगांव पोलीस स्टेशनला हजर केले.