बुद्धीला व्यवहाराची जोड हवी

0
43

बुद्धीला व्यवहाराची जोड हवी

पाणीनी हे संस्कृतचे महान व्याकरणकार. २००० वर्षांपूर्वी त्यांनी हे आश्चर्यकारक काम केले.
एकदा ते शिष्यांना व्युत्पत्ती विषयी शिकवीत होते त्यावेळी एक वाघ माणसाच्या वासाने तिथे येत
होता. शिष्य घाबरून झाडावर जाऊन बसले व आचार्यांनाही ते झाडावर चढायला सांगू लागले पण
व्याघ्र शब्दाची व्युत्पत्ती शोधण्यात ते गडून गेले होते. त्यांना व्युत्पत्ती सुचलीही. ‘व्या जिघ्रती इती व्याघ्रः’ म्हणजे वास घेत
चालतो तो वाघ पण झाले काय वाघाने त्यांचीच शिकार केली.

तात्पर्यः या ठीकाणी फक्त बुध्दी असून चालत नाही, त्याला व्यवहाराची सांगड घालावी लागते.