जीवन चक्र-कर्म चक्र

0
52

एका अनुभवी पुरुषात सर्व धर्मग्रंथाचा समावेश असतो. ते तर त्यापेक्षाही श्रेष्ठ असतात. कारण धर्म पुस्तकात त्या परम तत्त्वाचे सुक्ष्म वर्णन असते, परंतु त्याची बास्तविक व्याख्याकरून आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव प्रदान करण्यास धर्मग्रंथ पुर्णपणे असमर्थ आहेत. आजकाल प्रत्येकजण आपल्या दुष्कृत्यांबद्दल किंवा चुकांसाठी जगाला दोषी ठरवतो. प्रत्येक युगात म ानवाची हीच तक्रार आहे. भुतकाळाप्रमाणे, वर्तमान काळ आणि भविष्याचा काळ ही आमचा स्वतः चा नाही. हे जग एका विशाल चुंबकीय शक्तीसारखे आहे. आपण जितके यापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करतो तितकेच आपण त्याच्या आकर्षणात अडकत जातो. जगाच्या या महाजालात मनुष्य इकडून तिकडे नाचतो आणि असे समजतो की, आपल्याला कोणी पाहत नाही. बुद्धीमान मनुष्यास हे जाळे समजते. त्यातुन मुक्त होण्यासाठी त्याला कोणताही मार्ग सापडत नाही.

(कृपाल आश्रम, अहमदनगर)