आनंदऋषीजी हॉस्पिटलची एका छत्राखाली मिळणारी आरोग्यसेवा कल्पवृक्षाप्रमाणेच

0
102

माणकचंद कटारिया यांचे प्रतिपादन, उच्च रक्तदाब व मधुमेह व इतर सर्व आजारांवर उपचार व तपासणी शिबिरास प्रतिसाद

नगर – आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये येणारा रुग्णास दवा बरोबर दुवाही मिळते. आचार्य आनंदऋषीजींच्या आशीर्वादाने
पावन झालेल्या हॉस्पिटलमध्ये येणारे रुग्ण बरे होऊन आनंदाने घरी जातात. आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये हृदयरोग शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डायलेसिस, जनरल सर्जरी, दंत चिकित्सा अशा अनेक विविध प्रकारच्या
आजारांसाठी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात. आनंदऋषीजी हॉस्पिटलची एका छत्रा खाली मिळणारी आरोग्यसेवा कल्पवृक्षाप्रमाणेच आहे, असे प्रतिपादन हॉस्पिटलच्या स्थापनेपासून कार्यरत असलेले माणकचंद कटारिया यांनी केले आहे.
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म.सा.यांच्या ३३ व्या पुण्यस्मृती दिना निमित्त उच्च रक्तदाब व मधुमेह व इतर
सर्व आजारांवर उपचार व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन माणकचंद कटारिया
व सज्जनबाई कटारिया यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी डॉ.मितेश कटारिया, डॉ.
निखीता कटारिया, वैशालीताई मुथा, अभय मुथा आदींसह जैन सोशल फेडरेशनचे सदस्य डॉ.प्रकाश
कांकरिया, निखीलेंद्र लोढा, सतीश लोढा, सुभाष मुनोत, अभय गुगळे, प्रकाश छल्लाणी, डॉ.आशिष भंडारी
तसेच शिबिराचे तज्ञ डॉटर डॉ.वसंत कटारिया, डॉ. गजेंद्र गिरी, डॉ.रविराज गवळी, डॉ.प्राजक्ता पारधे आदी
उपस्थित होते.

डॉ.निखीता कटारिया म्हणाले, या आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या शिबिराच्या माध्यमातून रुग्णांची सेवा घडत आहे. आदर्शऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने व जैन सोशल फेडरेचशन यांच्या सहकार्याने खारीचा वाटा उचलण्याची संधी कटारिया परिवाराला मिळाली आहे. प्रास्ताविकात डॉ.वसंत कटारिया म्हणाले, माणकचंद कटारिया हे आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या स्थापनेपासून आजपर्यंत जैन सोशल फेडरेशनचे कार्यक्षम सदस्य म्हणून कार्य करीत आहेत. तसेच तसेच डॉ.मितेश व डॉ.
निखीता कटारिया हे देखील आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या रुग्णसेवेच्या कार्यात जोडले गेलेले आहेत. माणकचंद कटारिया व कटारिया कुटुंब तन-मन-धनाने निस्वार्थ सेवा करीत आहेत. समाजातील अशा दानशूर व्यक्तींमुळे अतिशय
महागडी असणारी उपचार पद्धती सवलतीच्या दरात व मोफत देण्यासाठी मदत होत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. देशात पंधरा टक्के लोक वजन जास्त असल्यामुळे, मानसिक तणाव
असल्यामुळे मधुमेहा चे बळी पडत आहे. मधुमेह होऊ नये. यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे
आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने जीवन शैलीत बदल करुन योग्य तो आहार घेणे व व्यायाम करणे आवश्यक
आहे. डॉ.प्राजक्ता पारधे म्हणाले, मधुमेहाच्या रुग्णांनी डॉटरच्या सल्ल्याने औषधोपचार केल्यास रक्तातील
साखरेवर नियंत्रण मिळवता येते. मधुमेह होऊ नये. यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे.
वयाच्या चाळीशी नंतर मधुमेह ची तपासणी करणे आवश्यक आहे. डॉ.आशिष भंडारी यांनी सुत्रसंचलन
केले. स्वागत निखिलेंद्र लोढा यांनी केले. प्रकाश छल्लाणी यांनी आभार मानले. उच्च रक्तदाब व मधुमेह व ईतर सर्व
आजारांवर उपचार तपासणी शिबिरात २०१ रुग्णांची तपासणी करण्यात आली.