सेवानिवृत्त प्राध्यापकांनी ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग समाजासाठी करावा

0
78

महाविद्यालयीन निवृत्त प्राध्यापक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. सुधाकर मानकर यांचे आवाहन, अहिल्यानगरमध्ये शैक्षणिक परिषदेस प्रतिसाद

नगर – सेवानिवृत्तीनंतरही प्राध्यापकांना समाजातून मानसन्मान मिळत आहे. त्यामुळे प्राध्यापकांनी सेवानिवृत्तीनंतरही
राहून नवे तंत्रज्ञान व नवे शैक्षणिक धोरण आत्मसात करा. तुमच्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग समाजासाठी करून गरजू
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व धार्मिक उपक्रमांमध्ये सक्रिय व्हावे. तुमच्या
या सामाजिक कामास समाजातून नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल. अखिल भारतीय स्तरावर महाविद्यालयीन निवृत्त प्राध्यापक संघटना सेवानिवृत्त प्राध्यापकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेत आहे. नव्याने उपस्थित झालेल्या ग्रॅज्युएटीच्या प्रश्न सोडवण्यासाठी आता न्यायालयीन लढाई संघटना देत आहे. या लढाईत सर्व सेवानिवृत्त प्राध्यापकांनी एकजुटीने
सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय विद्यापीठ महाविद्यालयीन निवृत्त प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा.
सुधाकर मानकर यांनी केले. अहिल्यानगरमध्ये सेवानिवृत्त महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेच्यावतीने सेवानिवृत्त प्राध्यापकांचे एकदिवसीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पेमराज सारडा महाविद्यालयात झालेल्या
या परिषदेचे उद्घाटन अखिल भारतीय विद्यापीठ महाविद्यालयीन निवृत्त प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा.
सुधाकर मानकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी संघटनेचे माजी जनरल सेक्रेटरी प्रा.अशोक
बर्मन, महाराष्ट्र फेडरेशन विद्यापीठ व महाविद्यालयीन प्राध्यापक अध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा.शामराव
लवांडे, सेवानिवृत्त महाविद्यालयीन अध्यापक संघटना पुणेचे अध्यक्ष प्रा.मगन ताटे, सचिव प्रा.व्यंकटेश
होळेहुन्नर, आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा.नासीर सय्यद, प्रा. के.एल.गिरमकर, प्रा.ए. पी.कुलकर्णी व सौ.बर्मन
आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या परिषदेत अहिल्यानगर, पुणे व नाशिक जिल्ह्यातील सेवानिवृत्त
प्राध्यापक सहभगी झाले होते. यावेळी प्रा.अशोक बर्मन यांनी एआय फुटो संघटनेच्या कार्याची सविस्तर माहिती देत सांगितले, राष्ट्रीय स्तरावर प्राध्यापकांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच एआय फुटो संघटना शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी
व समजतील कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्नशील आहे. प्राध्यापकांना मिळणारे
निवृत्तीवेतन हे नागरिकांनी भरलेल्या करातून मिळते; म्हणून आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने आपल्या
ज्ञानाचा उपयोग समाजातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी करावा. तसेच नैसर्गिक आपत्तींमध्ये सक्रिय
सहभाग घेऊन आपद्ग्रस्तांना शय तेवढी मदत करावी, असे आवाहन केले. प्रास्ताविकात प्रा.मगन
ताटे म्हणाले, सेवानिवृत्तीनंतर प्राध्यापकांचे खूप प्रश्न निर्माण होत असतात. ते सोडवण्यासाठी
स्थापन करण्यात आलेल्या या संघटनेला आता एक वार्ष्ण पूर्ण झाले आहे. प्राध्यापकांसमोरील
भविष्यातील आव्हाने यावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी या परिषदेचे आयोजन संघटनेने केले
आहे. परिषदेच्या उद्घाटन सत्रात ७५ वर्ष पूर्ण झालेल्या प्रो.मुकुंद दाते आणि प्रो.रामचंद्र वैशंपायन यांचा
सपत्निक विशेष सत्कार करण्यात आला. संघटनेचे सचिव प्रा.व्यंकटेश होळेहुन्नर यांनी स्वागत केले. अध्यक्ष
प्रा.शामराव लवांडे यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.रविंद्र कडू यांनी
केले तर प्रा.डॉ. व्ही. एस.काळे यांनी आभार मानले. या शैक्षणिक परिषदेसाठी सारडा महाविद्यालयाच्या
प्राचार्य डॉ.माहेश्वरी गावित व प्रबंधक अशोक असेरी यांनी सभागृह उपलब्ध करून दिले. तसेच यशस्वीतेसाठी
प्रा.संगीता परदेशी, प्राचार्य डॉ.एकनाथराव खांदवे, प्राचार्य डॉ.अशोक नवले प्रा. पांडुरंग चौधरी, प्रा.
विजय काळे, प्रा.दत्तात्रय साबळे, डॉ.जयंत क्षीरसागर, प्रा.मिलिंद देशपांडे, प्रा.दीपक भामरे, प्रा.शरद देवरे,
प्रा.शरद पवार, डॉ.श्रावण गाडेकर, डॉ.अशोक कांबळे, प्रा. बळवंत नागवडे, प्रा.बाळासाहेब रसाळ, प्रा.प्रदीप
गुजराथी, डॉ.मोहन जाधव, डॉ.कान्हू गिरमकर, प्रा.राजेंद्र साखरे, डॉ.विठ्ठल शिंदे आदींनी परिश्रम घेतले.