नगर – अहमदनगर महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाच्या सोशल लबच्यावतीने २५ फेब्रुवारी रोजी वाहतूक सुरक्षा
जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी नगर शहरातील चांदणी चौक, डीएसपी चौक, स्टेट बँक चौक येथे विद्यार्थ्यांनी सुरक्षित वाहतूक प्रवास विषय संबंधीचे घोषवाय असलेले फलक घेऊन प्रवाशांचे प्रबोधन केले. या उपक्रमाचा प्रारंभ
महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. दिलीपकुमार भालसिंग यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रा.डॉ. रज्जाक सय्यद, प्रा. डॉ. समीर मोहोपात्रा, प्रा. डॉ.रवींद्र मते, प्रा. श्रद्धा कांबळे, प्रा. अमोल खाडे उपस्थित होते. तसेच या उपक्रमाला पोलीस विभाग, वाहतूक नियंत्रण विभाग आणि परिवहन कार्यालय अहिल्यानगर यांचे सहकार्य मिळाले. उपक्रमात सोशल लबची
विद्यार्थी प्रतिनिधी साक्षी भोसले, स्वयंम बास्कर, आशिष वायभासे, ओमकार म्हस्के, आरती भोसले, ऋषिकेश अनंतरे, तोहिद शेख, कोमल शिंदे, स्वाती कनोजिया, नंदिनी निकाळजे, ऋतुजा ओहळ आदी विद्यार्थी सहभागी होते