निरंजन सेवाभावी संस्थेचा अभिनव उपक्रम, चांगल्या उपक्रमांसाठी समाज नेहमीच सहकार्य करेल – सिद्धि जौहरी
नगर – अनेक संस्था समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी काम करत आहेत. अनाथ मुला-मुलींना आधार देण्यासाठी
त्यांचे भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. अशा संस्थांना मदतीचा हात देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून
निरंजन सेवाभावी संस्था काम करत आहे ही कौतुकास्पद बाब आहे. आज सामाजिक संस्थांतील मुलांना आंबा खाण्याची स्पर्धे चा उपक्रम राबवून त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच विविध उपक्रमातून मदतीचा हात दिला जातो. अशा उपक्रमामुळे त्यांचा विकास होण्यास नक्कीच मदत होणार आहे. चांगल्या उपक्रमांसाठी समाज नेहमीच सहकार्य करेल. सामाजिक संस्थांच्या उन्नत्तीसाठी प्रत्येकाने आपआपल्यापरीने वाटा उचलावा, असे प्रतिपादन मिसेस इंडिया इंटरनेशनल विजेती सिद्धि जौहरी यांनी केले.
निरंजन सेवाभावी संस्थेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे सामाजिक संस्थेतील मुला- मुलींसाठी आंबे खाण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष मधुसुदन गांधी, प्रदेश सचिव सत्यनारायण सारडा,
उद्योजक अनुराग श्रीवास्तव, सिद्धि जौहरी, दिनेश सोलानी, पुरुषोत्तम रादंट, उद्योजक जितेंद्र बिहाणी, श्रद्धा बिहाणी आदि उपस्थित होते. उद्योजक जितेंद्र बिहाणी म्हणाले की, निरंजन सेवाभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे उत्कृष्ट काम सुरु असून त्यांचा पुर्ण वर्षभराचा कार्यक्रम हा ठरलेला असतो. आजच्या या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांच्या चेहर्यावरचा आनंद पाहूण आम्हाला समाधान होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मधुसुदन गांधी म्हणाले की, निरंजन सेवाभावी संस्था यांचे कार्य राज्यामध्ये उत्कृष्टपणे सुरु असून या संस्थेचा कोणी अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी नाही, त्यामुळे श्रेयवाद घेण्याचा प्रश्नच नाही. सर्व एकत्र राहुन एकदिलाने काम करत आहे. त्यांच्या या कार्याबद्दल प्रदेशचा उत्कृष्ट पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी जो उपक्रम राबविला आहे. तो खरोखरच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी अतुल डागा म्हणाले, निरंजन संस्थेच्यावतीने नेहमीच सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. यंदाच्यावर्षी संस्थेने अनेक मुला-मुलींचे पालकत्व घेत त्यांच्या सर्वांगिण विकास साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबरच संस्थेच्या सभासदांच्या आनंदक्षणी मिष्ठान्न भोजन अशा संस्थेतील मुलांना दिले जाते. आजही अशा सामाजिक संस्थेतील मुलांना मनसोक्त आंबे खाण्याचा आनंद मिळवून दिला असल्याचे सांगितले.
सूत्रसंचालन प्रा.प्रसाद बेडेकर यांनी केले. मुकूंद धुत यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे स्वप्निल कुलकर्णी, निलेश बिहाणी, विशाल झंवर, अभिजित बिहाणी, राहुल झंवर, सुमित चांडक, सुहास चांडक, हरिष काबरा, संजय पूगालिया, महेश चांडक, दीपक काबरा, अर्चना पुगलिया, प्राजक्ता डागा, योगिता कुलकर्णी, पूनम चांडक, सविता झंवर, संगीता सिकची, दीपिका चांडक, जया बिहानी आदिंनी परिश्रम घेतले.