पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ‘जिल्हा क्रीडा पुरस्कारा’चे महाराष्ट्रदिनी वितरण

0
38

नगर – गोदावरी व  कृष्णा खोरे विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य जलसंपदामंत्रीतथा पालकमंत्री अहिल्यानगर डॉ. राधाकृष्ण विखे पाटील मंत्री यांच्या हस्ते सन २०१९-२० ते २०२३-२४ या पाच वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, अहिल्यानगर यांच्या वतीने क्रीडा क्षेत्रामध्ये जिल्ह्याचे नाव उज्वल
करणार्‍या खेळाडू, मार्गदर्शक, कार्यकर्ता /संघटक यांना दिले जाणारे जिल्हा क्रीडा पुरस्कार १ मे रोजी महाराष्ट्र
दिनानिमित्त पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयावरील मैदानावर प्रदान करण्यात आले. या पुरस्कार वितरण प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, मनपा आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे आदी उपस्थित होते. सन २०१९ -२० गुणवंत क्रीडा कार्यकर्ता / संघटक पुरस्कार दिनेश लक्ष्मण भालेराव., गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार डेविड सुरेश मकासरे., गुणवंत खेळाडू पुरुष पुरस्कार सोमनाथ सपकाळ., गुणवंत खेळाडू महिला पुरस्कार अपूर्वा गोरे., गुणवंत खेळाडू पुरस्कार दिव्यांग सुहास मोरे., गुणवंत खेळाडू थेट पुरस्कार फिजा सय्यद.

सन २०२० -२१ गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजय मस्के. गुणवंत खेळाडू पुरुष किरण गहाणडुले. गुणवंत खेळाडू महिला वैष्णवी गोडळकर. सन २०२१ -२२ गुणवंत क्रीडा मार्गदर्शक विजय देशमुख. गुणवंत खेळाडू पुरुष श्रीनिवास कराळे. गुणवंत खेळाडू महिला विश्वेशा मिस्कीन. २०२२ -२३ गुणवंत क्रीडा मार्गदर्शक श्रीराम सेतू आवारी. गुणवंत खेळाडू पुरुष ओम करांडे. गुणवंत खेळाडू महिला कोमल वाकळे. सन २०२३ -२४ गुणवंत क्रीडा मार्गदर्शक लक्ष्मण
उदमले. गुणवंत खेळाडू पुरुष ओंकार सुरत. गुणवंत खेळाडू महिला योगिता खेडकर व गुणवंत खेळाडू पुरुष विशेष पुरस्कार शंकर गदाई यांना प्रदान करण्यात आला.

प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम रुपये दहा  हजार असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार सोहळा यशस्वी पार पाडण्याकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील भाऊराव वीर, संतोष वाबळे, विशाल गर्जे, प्रवीण कोंढावळे,
प्रियांका खिंडरे, रमेश जगताप, मीना जगताप, साक्षी दळवी, सागर पवार यांच्याबरोबर ऑलम्पिक संघटनेचे पदाधिकारी शैलेश गवळी, संजय साठे, विजय मिस्किन, अविनाश काळे, मनीष राठोड यांनी परिश्रम घेतले.