अहिल्यानगर शहरातील पीठ गिरणीच्या दळण भावात १ जूनपासून वाढ

0
48

नगर – अहिल्यानगर मनपा हद्दीतील पीठ गिरणी संघटनेची वार्षिक सभा दत्त मंदिर पाईप लाईन रोड येथे झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष रामकिसन सुपेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे मार्गदर्शक पंडित खरपुडे होते. सभेच्या प्रारंभी काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने भाव वाढ करणे, सर्वांनी एकचभावाने दळणे, दर शनिवारी प्रत्येकाने गिरणी बंद ठेवणे,
एमएसईडीसीएल (चडएइ) ला घर घंटी व प्रीपेड मीटर बद्दल अर्ज देणे, सदस्य समिती कार्यान्वित करणे, प्रत्येक
सदस्याने सभासद फी दर वर्षी जमा करणे व त्याचे हिशोब ठेवणे याची अंमलबजावणी सभेमध्येच सुरु करण्यात आली.
सभेमध्ये दळणाचे भाव वाढविण्यावर सर्वच गिरणी चालक मालक व कारागिर यांचे एकमत झाले व १ जूनपासून
दळणाचे भाव खालीलप्रमाणे राहतील असे ठरले. गहू, ज्वारी, बाजरी : ७ रुपये किलो, डाळी, तांदुळ, नाचणी : १२ रुपये किलो, रवा, भरडा, एस्सर : १५ रुपये किलो. यावेळी संघटनेचे मार्गदर्शक पंडित खरपुडे यांनी सभासदांना सांगितले की, एकजुटीने काम करणार्‍यांचा नेहमीच विजय होत असतो व संघटना नेहमीच पीठ गिरणी चालक, मालक व कारागिर यांच्यासाठी काम करत आलेली आहे व यापुढेही सभासदांसाठी काम करणार आहे. कार्याध्यक्ष अकबर पठाण यानी सांगितले की, सर्व गिरणी व्यवसायिकांनी एकमेकांवर विश्वास ठेवावा, भूलथापांना व अफवांना बळी पडू नये.

सल्लगार हाजी जमीर शेख यानी सांगितले की, आपण अहिल्यानगर शहराचे आठ प्रभाग केलेले असून, प्रत्येक
प्रभागात सहा समिती सदस्य नेमलेले आहेत. या सर्व समिती सदस्यंची बैठक लवकरच घेण्यात येणार असून, यावेळी सर्व
समिती सदस्यांनी हजर रहावे.

यावेळी रूपेश मिश्रा, निखिल गुज्जर, शिवाजी बोरुडे या सभासदांनी समस्या मांडल्या. या सर्व समस्यांचे निवारण
संघटनेचे अध्यक्ष रामकिसन सुपेकर यानी केले. यावेळी संघटनेचे, पदाधिकारी, उपाध्यक्ष अरुण गिरम, चंद्रकांत ताठे, खजिनदार वीरेंद्र शिंदे, सहसचिव समीर पठाण, बजरंग गव्हाणे, संघटक गणेश अडसरे, महिला सदस्या श्रीमती अलका तागड आदी उपस्थित होते. संघटनेचे सचिव वैभव मुळे यानी सूत्रसंचालन केले. शेख मुश्ताक यांनी स्वागत केले तर आभार संघटक शंकर म्हस्के यांनी मानल