नाना पाटील वस्ताद तालिमच्यावतीने हनुमान जयंती साजरी

0
33

नगर – शक्ती आणि भक्तीचा मिलाप म्हणजे बजरंगबली होय. प्रभु रामचंद्रांची नि:स्सीम भक्ती करुन निष्ठा कशी असावी भगवंत हनुमानांनी आपल्या सेवेतून दाखवून दिले आहे. हा आदर्श आपल्या जीवनात अंगीकृत करण्याची गरज आहे. हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसादाचे वाटपातून सामाजिक ऐय निर्माण होण्यास मदत होते. प्रसादाचे महत्म्य मोठे असल्याने
भाविकांना लाभ घेऊन तुप्त होत आहे. ही तृप्तीच आपणा सर्वांना समाधान देणारी आहे, असे प्रतिपादन मनपा माजी स्थायी
समिती सभापती गणेश कवडे यांनी केले.

हनुमान जयंतीनिमित्त नाना पाटील वस्ताद तालिमच्यावतीने कावडीने आणलेल्या पवित्र पाण्याने अभिषेक करण्यात
आला. याप्रसंगी मनपा माजी स्थायी समिती सभापती गणेश कवडे, पै. मन्नी शिंदे, अनिल कवडे, पै. रामभाऊ नळकांडे,
बजरंग महाराज शेळके, राधेशाम धूत, पै. मळू वामन, दत्ता ठाणगे, अमर शिंदे, नितिन रोहकले, योगीराज वामन,
शिवाजी गुंजाळ, अरुण कदम, पुष्कर गुंजाळ, धीरज रोहकले, बंडू शेळके, निलेश काळे, अतुल वाकचौरे, राजु म्हस्के,
ननु काळे, बापू दिवेकर, ओंकार कवडे, पळसकर आदि उपस्थित  होते.

गणेश कवडे म्हणाले, हनुमान जयंतीची नालेगांवची मोठी परंपरा आहे. दरवर्षी नालेगांव येथील नाना पाटील
वस्ताद तालिम येथील युवकांनी सालाबाद प्रमाणे प्रवरासंगम येथून कावडीने पाणी आणून जलाभिषेक केला जातो.
युवकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री हनुमानाची उपासना करुन  अनेक कुस्तीची मैदानी गाजवली आहेत. नाना पाटील वस्ताद
तालिमचे जिर्णोद्धाराचे पूर्ण झाले असून लवकरच त्याचा लोकार्पण कार्यक्रम करण्यात येईल असे गणेश कवडे यांनी सांगितले.