स्वच्छता कर्मचार्‍यांनी सेवानिवृत्तीनंतर आपल्या आरोग्याकडे लक्ष द्याव

0
113

नगर – महापालिकेचा सफाई कर्मचारी हा समाजातील एक
महत्वाचा घटक असून आपण सकाळी घराबाहेर पडतो तेव्हा संपूर्ण
शहराची स्वच्छता झालेली असते, त्यामुळे नगरकरांचे आरोग्य सदृढ,
निरोगी राहत असते महापालिकेचा स्वच्छता अभियानामध्ये नंबर येत
असून त्याचे श्रेय स्वच्छता कर्मचार्‍यांनाच जाते, स्वच्छता कर्मचार्‍यांनी
३०-३५ वर्ष नगरकरांचे आरोग्य जपले, आता सेवानिवृत्तीनंतर
आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, मनपा कर्मचारी अजय सौदे त्यांची
सफाई कर्मचारी बद्दल असलेली आपुलकी आणि ऋणानुबंध त्यामुळेच
सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम केला, आपण
अनेक वर्ष एकत्रित काम करत असतो आपल्या सुखदुःखामध्ये सामील
होत असतो सेवानिवृत्ती हा सण मनुष्याच्या जीवनातील आठवणीचा
दिवस असतो त्या दिवशी त्यांचा सन्मान होणे गरजेचे असल्याचे
प्रतिपादन मनपा कर्मचारी युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी
केले.
अहिल्यानगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक १२ मधील सफाई
कर्मचार्‍यांचा सेवापुर्ती निमित्त सत्कार सोहळा झाला. यावेळी
बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, सचिव आनंद वायकर, नंदकुमार नेमाने, बलराज
गायकवाड, बाळासाहेब व्यापारी, सोमनाथ सोनवणे, भरत सारवान, भांगरे, चांदणे, तावरे,
ऋषिकेश वाल्मीक, अनिल वाणे, अजय सोदे, सतीश खुडे, कृष्णालाल बेगी, पृथ्वीराज
तांबोळी, सचिन लोखंडे, शुभम चांदणे, दीपक अडागळे, शाहू वाघमारे, शुभम साठे आदी
उपस्थित होते
प्रभाग क्रमांक १२ मधील स्वच्छता कर्मचारी सेवानिवृत्त असून
कर्मचार्‍यांच्या वतीने सत्कार केला जातो ही बाब कौतुकास्पद आहे,
काम करत असताना एकमेकांमध्ये प्रेम आपुलकी भावना असते,
सेवानिवृत्तीमुळे दररोज भेटणारा कर्मचारी आता भेटणार नाही,
एकमेकांमधील संवाद कमी होईल, सुखदुःखाच्या गोष्टी होणार नाही,
मी देखील सफाई कर्मचारी म्हणून पालिकेत काम केले आहे आणि
प्रभाग अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालो आहे, सफाई कर्मचारी यांचा
सेवानिवृत्ती निमित्त सन्मान होणे गरजेचे असल्याचे मत जितेंद्र सारसर
यांनी व्यक्त केले
मनपा प्रभाग क्रमांक १२ मधील इंदू खुडे, विजया वैराळ, सविता
साठे, संदीप सारवान, सुरेश साठे, विद्या चव्हाण, ललिता दिवटे,
कन्हैया चावरे आदी सफाई कर्मचारी सेवानिवृत्त होत असून आम्ही
सर्वांनी एकत्रित काम केले आहे. दररोजच्या साफसफाई बरोबरच
सांगितलेले वाढीव काम देखील हे कर्मचारी करत असत कधीही
कामाचा कंटाळा केला नाही. अनेक वर्ष आम्ही सर्वांनी एकत्रित काम
केले असून त्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार सोहळा झाला असल्याचे मत अजय सौदे यांनी
व्यक्त केले.