जंगलाचे संरक्षण हे भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत आणि पौष्टिक अन्नपुरवठा सुनिश्चित करण्याबद्दल देखील आह

0
111

नगर – जंगलाचे संरक्षण हे केवळ झाडे वाचवण्याबद्दल नाही तर भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत आणि पौष्टिक अन्नपुरवठा
सुनिश्चित करण्याबद्दल देखील आहे. जंगलाचे जतन करून, आपण उपासमारीशी लढण्यास, जैवविविधता राखण्यास आणि
जगभरातील शेतकरी समुदायांना पाठिंबा देण्यास मदत करतो, असे सचिन कंद यांनी सांगितले. जागतिक वन दिनाचे महत्त्व सांगून हा दिवस लोकांना पृथ्वीवरील जीवनासाठी जंगले का महत्वाचे आहेत हे समजून समजावून सचिन
कंद यांनी सांगितले. जागतिक वन दिनानिमित्त सामाजिक वनीकरण विभागच्या वतीने शासकीय तंत्रनिकेतन परिसरात  विभागीय वनाधिकारी सचिन कंद, प्राचार्य बाळासाहेब कर्डिले, हरियालीचे अध्यक्ष सुरेश खामकर यांच्या हस्ते वृक्षारोपण
करून वन दिन साजरा करण्यात झाला. हरियाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश खामकर यांनी सांगितले की वनांचे आणि वृक्षांचे महत्त्व सांगितले. जागतिक तापमान वाढ आणि प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी वृक्ष लागवड संवर्धन काळाची गरज आहे.
त्याकरिता बेकायदा होणारी वृक्षतोड थांबवणे आवश्यक असून उन्हाळ्यामध्ये अनेक वनांना वन वणवे लागतात, ते रोखण्यासाठी त्या त्या भागातील नागरिकांनी प्रयत्न करणे गरजेचे असून वनांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे आवाहन केले.
सहाय्यक वनसंरक्षक सोनल केसरकर यांनी यावर्षीची वन दिनाची थीम वने आणि अन्न असल्याचे सांगून जी जंगले आणि जागतिक अन्न सुरक्षेमधील मजबूत संबंध अधोरेखित करते. जंगले फळे, काजू, बियाणे आणि वन्य प्राणी यासारखे आवश्यक अन्न स्त्रोत प्रदान करतात. मातीचे आरोग्य सुधारून, पाण्याचे चक्र नियंत्रित करून आणि मधमाश्या आणि पक्षांसारख्या परागकरांसाठी अधिवास निर्माण करून ते शेतीला देखील आधार देतात, असे सांगितले.
प्राचार्य बाळासाहेब कर्डिले यांनी शासकीय तंत्रनिकेतन परिसरात वृक्ष लागवड यापूर्वी केल्याचे सांगून, भवितव्यात
परिसरातील उपलब्ध जागेवरती मीयावाकी प्रकल्पाद्वारे वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे सांगितले. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच व्यापक जनजागृती करून, कृतिशील
कार्य करण्यात येत आहे असे तेम्हणाले. यानंतर परिसरात आंबा, आवळा, कांचन, लक्ष्मी तरु आदी
वृक्ष रोपे लावून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तंत्रनिकेतनचे विभागप्रमुख प्रा. डी डी अहिरराव,
डॉ. बी सी खरबस, प्रा. एस डी मुळे, प्रा. एस एस हरिप, प्रा. बी आर पाटील, प्रा. आर आर पवार, प्रा. जी एम
बरबडे, प्रा. एस एस वडीतके, प्रा. जे डी चौधरी, एस एस सारडा, सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल एस एम
गायकवाड, मनीषा सरोदे याचबरोबर वन रक्षक ज्ञानेश्वर दहिफळे, अफसर पठाण, वैशाली दराडे, रूपाली सत्रे
यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना
समन्यवयक डॉ. डी बी करंजुले यांनी केले. प्रबंधक एम एस.चौधरी यांनी आभार मानले.