भगवंताला, संपत्ती, ऐश्वर्या न देता एक प्रेमभाव व भक्तिभाव द्यावा

0
88

हभप जंगले महाराज शास्त्री यांचे प्रतिपादन; सावेडीगाव येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज निमित्त आयोजित सप्ताहाचे काल्याचे किर्तनाने समारोप

नगर – स्त्रिया कुटुंबात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, स्त्रियांनी आपल्या संस्कृती प्रमाणे, धर्माप्रमाणे वर्तन करावे हे सांगत असताना स्त्रियांनी शिक्षणाबरोबर आपली संस्कृती व स्त्री धर्म सांभाळावा, रास क्रीडा करत असताना सर्व गोपींना अभिमान झाला म्हणून भगवंत तेथून निघून गेले. पडली भुल धांवतें सैराट ॥ भगवंत गेल्यामुळे गोपिकांची झालेली अवस्था
धावे सैराट त्याच प्रमाणे आपल्या जीवनात जर भगवंत नसेल किंवा साधुसंतांची संगती नसेल तर आपलंही जीवन सैराट धावत म्हणजे अज्ञानात व अहंकारात धावत जसा गोपिकांना अभिमान झाला व भगवंत गोपिकांपासून निघून गेले त्याच
प्रमाणे आपल्याला जर थोडा जरी अभिमान झाला तर देव आपल्यापासून दूर जातो परमार्थ व भक्ती करत असताना अभिमान नसावा. त्याचप्रमाणे व्यवहारातही जगत असताना माझ्याकडे ही गोष्ट आहे याचा अभिमान कधीही नसावा त्या अभिमानामुळे आपले सर्व ऐश्वर्या नष्ट होते, त्यामुळे देवाची प्राप्ती करत असताना अभिमान नसावा, असे मत हभप जंगले महाराज शास्त्रींनी व्यक्त केले.

सावेडी गाव येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण
सप्ताहाचे हभप जंगले महाराज शास्त्री यांच्या काल्याचे किर्तन समारोप झाला. सप्तामध्ये काल्याचे किर्तन कीर्तन
करताना हभप जंगले महाराज शास्त्री. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी महापौर बाबासाहेब
वाकळे, अनिल बोरुडे, पुष्पाताई बोरुडे, माजी नगरसेवक रवींद्र बारस्कर, निखिल वारे, उद्योजक मोहन
मानधना, अशोक वाकळे, हभप संदीप महाराज खोसे, हभप चंद्रकांत महाराज बारस्कर, हभप विठ्ठल महाराज
फलके, दगडू पवार, विलास ताठे, दत्ता पाटील सप्रे, शिवा चव्हाण आदीसह नागरिक उपस्थित होते.
हभप जंगले महाराज शास्त्री पुढे म्हणाले की भगवंताने ज्यावेळी गोपिकांच्या वस्त्राचे हरण केले त्यावेळी एक-
एक गवळण येऊन देवाला आपल्या सुवर्णाचा आपल्या धनाचा अभिमान करत देवाला वस्त्र देण्याकरता सांगत असताना देवाने त्या सर्वांकडे पाहिलेही नाही याप्रमाणे आपण देवाला आपल्या धना मुळे किंवा आपले आयुष्य मुळे संपत्तीमुळे
जर प्राप्त करण्याची इच्छा करत असतात तर देव कधीही प्राप्त होत नाही पुढे बोलत असताना महाराजांनी एक गवळण अशी आहे, ’की ती देवाला म्हणते देवा काहीच नाही मी तुला अनन्य भावाने शरण येते आता तू माझे वस्त्र दे
यावरून असे लक्षात येते की भगवंताला इतर संपत्ती इतर ऐश्वर्या न देता भगवंताला एक प्रेम भाव व भक्तिभाव द्यावा असे ते म्हणाले.
सावेडी गावामध्ये सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह हा भाविकांसाठी एक अध्यात्मिकतेचे केंद्र बनले
असून या पावन भूमीतून धार्मिकतेचा प्रसार-प्रचार होण्याचे काम केले जाते. बाबासाहेब वाकळे यांनी गेल्या २६ वर्षापासून सुरू केलेली परंपरा कौतुकास्पद असून आजच्या युवा पिढीला आपल्या साधुसंतांचे विचार देण्याचे काम केले जात आहे. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या बीज निमित्त हभप जंगले महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्त्याचा समारोप झाला असल्याचे मत ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.