नगर – एकलव्य संघटनेच्या विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करताना संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गीताराम बर्डे, मोहन गोलवाड, अरुण जाधव, वैजंता गोलवाड, सोमनाथ गोरे, आप्पा गोलवाड, दत्ता गोरे, बाबुराव फुलमाळी, किरण माळी, सुभाष माळी, किशोर माळी, जालिंदर माळी आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, मौजे पाचेगाव येथील गट क्रमांक २८३ मधील आदिवासी भिल्हे समाजाचे अतिक्रमण कायम करण्यात यावे व पिंपरी वळण ता राहुरी येथील गट क्रमांक १९८ मधील सर्व आदिवासी भिल्ल समाजाचे अतिक्रमण कायम करण्यात यावे तसेच येडू आई देवस्थानला जागा उपलब्ध करून देण्यात यावी तसेच आदिवासी समाजाच्या सर्व जमिनी वर्ग एक करण्यात याव्यात व सर्व आदिवासी समाजाला राहत्या जागेत घरकुल व इतर सुविधा देण्यात यावी तसेच
जिल्ह्यातील सर्व तालुयांना आदिवासी विकास निधीचे समान वाटप करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे
जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे.





