चंदन प्लास्टिकला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली मात्र कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान

0
38

नगर – जामखेड रोडवर नगर तालुयातील सारोळा बद्धी येथील प्लास्टिक ताडपत्री बनविणारी चंदन प्लास्टिक ही कंपनी १६ मार्च रोजी सकाळी अकराच्या सुमारास आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. आगीत कंपनीची मोठी आर्थिक हानी झाली.
रविवारी सकाळी अकराच्या सुमारास सारोळा बद्दी येथील प्लास्टिक ताडपत्र्या बनविणार्‍या कंपनीस अचानक आग
लागली. काही क्षणातच धुराचे लोळ बाहेर पडू लागले. आगीने रौद्ररूप धारण केले. ही माहिती अहिल्यानगर महापालिकेच्या अग्निशमन दलास देण्यात आली. जवान तत्काळ दोन बंब व तीन मोठे पाणी टँकरसह घटनास्थळी पोहोचले व मदतकार्य सुरू केले. त्यानंतर एमआयडीसी,  राहुरी नगरपालिका, एमआयआरसीच्या . अग्निशमन दलाचीही मदत
घेण्यात आली. रात्री उशिराही आग आटोयात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. यात स्थानिक ग्रामस्थांनीही वैयक्तिक पाणी टँकर आणून आग आटोयात आणण्यासाठी मदत केल्याची माहिती मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी शंकर मिसाळ
यांनी सांगितली. आग आटोयात आणण्यासाठी अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ, वाहन चालक अशोक काळे, अंकुश कुटे, सिकंदर वाकरे, चंदू भांगरे, फायरमन मोहन रासकर, सागर जाधव, अशोक चितळे, करण राठोड, संदेश सांगळे, सूरज कारले, संकेत साठे, अविनाश साठे, धीरेश जावळे, शुभम साठे, प्रभात साठे आदींसह इतर जवानांनी प्रयत्न केले.