बौद्ध धर्माची अस्मिता असलेल्या महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात देण्याची मागणी
नगर – बिहार मधील महाबौध्दि बुद्धविहारचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी
जिल्हाधिकारी कार्यालयावर भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी (दि.१२ मार्च) मोर्चा काढण्यात आला. शासकीय विश्रामगृह येथून निघालेल्या मोर्चात बौध्द धर्माचे
प्रतिक असलेले पंचशील ध्वजासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सम्राट अशोक यांच्या प्रतिमा
घेऊन समाजबांधव सहभागी झाले होते.
बौद्ध धर्माची अस्मिता असलेल्या महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया
समोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्रा. किसन चव्हाण,
राज्य प्रवक्ते अॅड. अरुण जाधव, जिल्हाध्यक्ष योगेश साठे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे,
जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, जिल्हा सल्लागार जे. डी. शिरसाठ, शहराध्यक्ष
हनीफ शेख, तथागत बुध्दीस्ट सोसायटीचे अध्यक्ष संजय कांबळे, राम गायकवाड, माधवराव चाबूकस्वार,
दिपक पाटोळे, लक्ष्मण माघाडे, संतोष गायकवाड, विजय हुसळे, सतिश ओहोळ, बाबाजी वाघमारे,
बाळासाहेब धस, गायकवाड आण्णा, भगवंत गायकवाड, संपत पवार, प्रवीण ओरे, अमर निरभवने, राजीव
भिंगारदिवे, रविकिरण जाधव, तेजस धीवर, बाबासाहेब धीवर, संजय कांबळे, अण्णासाहेब गायकवाड, गौतम
पाचारणे, मेहेर भिंगारदिवे, राम गायकवाड, दीपक पाटोळे, भाऊसाहेब देठे, पोपट शेटे, सोमनाथ भैलूमे,
गनी इनामदार, दीपक गायकवाड, संजय शेलार, रूपाली आढाव, लता भांड, प्रमिला शिंदे, पी.के. गवारे, दिलीप
साळवे, राजेंद्र करदींकर, प्रकाश कांबळे, धोंडिबा राक्षे, संतोष जवंजाळ, महेश पवार, संतोष कांबळे, दादासाहेब
पंडीत, नवनाथ रामफळे, शांताराम ऊबाळे, बाळासाहेब लहानसे, संतोष पटवेकर, पंडीत मोरे, भगवान बच्छाव
आदींसह फुले, शाहू, आंबेडकरी विचारांच्या समविचारी संघटनांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते.
सम्राट अशोक यांनी इ.स. पूर्व तिसर्या शतकात महाबोधी महाविहाराचे बांधकाम केले. तथागत बुद्धाला
ज्या बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली तो बोधीवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात आहे. त्यामुळे देशातील
नव्हे, तर जगभरातील बौद्ध अनुयायी भिखू आणि पर्यटक या स्थळाला भेट देतात; मात्र या महाविहाराचे
नियंत्रण आणि व्यवस्थापन आजही बौद्धांच्या ताब्यात नाही. महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे,
यासाठी १९९२ पासून आंदोलन होत आहेत. तरी सुद्धा महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा बदलण्यात
आला नाही. त्यामुळे पाच हिंदू धर्मीय यांचे प्राबल्य असल्याने बौध्द गया येथील महाविहारात पुजा आणि
कर्मकांड सुरु आहे. मात्र बौद्ध धर्म गुरुंना त्यांच्या विधीप्रमाणे पूजेचा अधिकार मिळत नाही. ज्या रूढी
परंपरांना तथागत गौतम बुद्ध यांनी नाकारले तेच कर्मकांड येथे सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आपला देश स्वातंत्र्य झाल्यावर २६ जानेवारी १९५० पासून घटना लागू झाली आहे. त्यावेळी भारतीय
राज्यघटनेचे कलम १३ नुसार घटना लागू होण्यापूर्वी केलेले सर्व कायदे आणि नियम निरस्त केले आहेत. मात्र तरी
देखील देशात १९४९ चा नियमबाह्य कायदा लावून बौध्द समूहाचे धार्मिक अधिकार काढून घेण्यात आले
असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महाबोधी महाविहार (बोधगया, बिहार) हे पवित्र बौद्ध धर्मस्थळ असून, बोधगया महाविहार कायदा १९४९ चा अन्यायकारक कायदा रद्द करावा, बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे, जागतिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेष विकास
निधी आणि सुविधा तात्काळ देण्यात याव्या, केंद्र सरकार आणि बिहार सरकारने आपले विशेष अधिकार
वापरून १९४९ चा कायदा दुरुस्त करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर मागणीचे
निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले आहे.