बाळासाहेब भुजबळ यांचे प्रतिपादन; अहिल्यानगरच्या रामभक्तांनी घेतले अयोध्या व काशी धामचे दर्शन
नगर – साडेपाचशे वर्षाच्या संघर्षानंतर प्रभू श्रीरामाचे मंदिर निर्माण झाले आहे. लाखो हिंदूंचे स्वप्न पूर्ण झाले आहे. प्रभू राम हे सर्वांचे आदर्श आहेत. प्रभू श्री रामचंद्र एक पत्नी, एक वचनी, प्रजा हित दक्ष, धर्म रक्षक राजा होते. प्रत्येकाने प्रभू श्रीरामासारखे आदर्श जीवन जगावे. आयोध्या येथे भव्य दिव्य असे राम मंदिर पाहून सर्व भाविक मंत्रमुग्ध झाले आहेत.
प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी राम भक्तांनी मोठ्या संख्येने यावे.श्रीराम जन्मभूमी हिंदूंची पवित्र यात्रा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आयोध्या व काशीधाम येथे मंदिर मार्ग प्रशस्त करून
भाविकांना मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण केले आहेत. तसेच सर्व यात्रेकरूंची यात्रा सफल व होण्यासाठी रस्ते व रेल्वे सुविधा निर्माण केले आहेत. त्यांचे मी अभिनंदन करतो.असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे ओबीसी चे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी केले आहे. अहिल्यानगर येथील ६१ यात्रेकरूंनी आयोध्या धाम व काशी विश्वेश्वर धाम यात्रेचे उत्साहाच्या वातावरणात प्रभू श्रीरामाचे व काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले. रामभक्तांनी अयोध्या येथे प्रवेश करताच जय
श्रीरामचा नारा दिला. प्रभू श्रीरामाच्या बालरुपाचे दर्शन घेऊन भाविक मंत्रमुग्ध झाले. प्रभू श्रीरामाचे मंदिर पाहून
सर्वांच्या डोळ्याचे पारणे फिटले. न भूतो ने भविष्यतीअसा दर्शनाचा सोहळा रंगला होता. प्रभू श्रीरामाच्या दर्शना नंतर हनुमान गढ़ी, कनक महल, दशरथ महल, शिप्रा घाट येथे गंगा आरती, तसेच श्री काशी विश्वेश्वर मंदिर, श्री कालभैरव मंदिर, श्री ढुंडिविनायक गणपती मंदिर, श्री माता अन्नपूर्णा मंदिर, श्री संकटमोचन हनुमान मंदिर, श्री महामृत्युंजय
मंदिर, राजा हरिश्चंद्र घाट, छत्रपती शिवाजी महाराज घाट, अहिल्यादेवी होळकर घाट, राजा महाराणा प्रताप
घाट, मणिकर्णिका घाट असे सुंदर घाटाचे दर्शन घेतले. श्री काशी विश्वेश्वर येथील गंगाघाट येथील महाआरती ने
सर्व घाट उजळून गेला होता. अतिशय सुंदर व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शंख नाद,
घंटानाद, मोर पीस फीरवून पंचारती करण्यात आली. घाटावरील गंगा आरतीने सर्वांचे डोळे दिपले होते.
यावेळी बाळासाहेब भुजबळ, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अमोल भांबरकर, प्रकाश इवळे,
विनोद पुंड, चंद्रकांत पुंड, नारायण इवळे, अरुण गाडळकर, मनोज भुजबळ, रोहित पठारे, निनाद
गायकवाड, सूर्यकांत कांडेकर, रमेश शेरकर, पोपट शिंदे, इंजि. बाबासाहेब ससाने, माजी नगरसेविका
सुनंदाताई भुजबळ, ताराबाई शिंदे, विजया भांबरकर, शितल भुजबळ, सुरेखा वाघ, वैष्णवी कराळे, जयश्री
सातपुते आदी उपस्थित होते. यात्रेचे उत्कृष्ट नियोजन नाना सावंत आणि भक्ती ताई साळवी, विश्व हिंदू परिषद व बजरंगदलाचे कार्यकर्ते यांनी केले होते.





