डॉ.सुधा कांकरिया यांचे प्रतिपादन; सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे ‘ज्ञानविज्ञान’ पुरस्कार
नगर – ज्ञान म्हणजे आपण निरळनिराळ्या क्षेत्रात प्रगती करतो. म्हणजे हे ज्ञान लौकिक व व्यवहारीक ज्ञान होय. परंतु अध्यात्मिक ज्ञान म्हणजे सत्य ईश्वरी ज्ञान होय. विज्ञानाने आज प्रगती केली. या विज्ञानाला दोन बाजु आहेत, तर ज्ञानाला
एकच बाजु आहे. म्हणुनच जसा जसा माणूस वृद्ध होत जातो, तसा तसा तो अनुभवाने समृद्ध होत असतो. जेष्ठांचे अनुभव हे विश्वाचे विद्यापीठ आहे. म्हणून त्यांच्या हातुन मला ज्ञानविज्ञान पुरस्कार दिला गेला हे माझे भाग्यच आहे, असे प्रतिपादन
डॉ.सुधा कांकरिया यांनी केले. सावेडी जेष्ठ नागरिक मंचातर्फे यंदाच्या वर्षी ज्ञानविज्ञान पुरस्कार डॉ.सुधा कांकरिया यांना
प्रदान करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी डॉ.प्रकाश कांकरिया, अदिनाथ जोशी, मोरेश्वर मुळे, बाजीराव जाधव, शरद कुलकर्णी, बलभिम पांडव, शोभा ढेपे, ज्योती केसकर, पुष्पा चिंताबर, स्नेहन वेलणकर, लिलाताई गोविलकर,
सुप्रिया सोनटक्के आदी उपस्थित होते. डॉ.सुधा कांकरिया पुढे म्हणाल्या की, स्त्री भु्रणहत्या हे महापाप आहे. स्त्री भु्रणहत्या म्हणजे केलेला आत्मघातकी हल्ला आहे. आई आहे म्हणून जगात माणूसकी आहे, प्रेम आहे. ती दोन्ही
कुळाचा उद्धार करते. यावेळी अध्यक्ष आदिनाथ जोशी म्हणाले की, समाजात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना
दरवर्षी सावेडी जेष्ठ नागरिक मंचाच्यावतीने ‘ज्ञानविज्ञान’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षीचा पुरस्कार डॉ.सुधाताई कांकरिया यांना देण्यात आला. पुरस्कार मानपत्राचे वाचन बाजीराव जाधव यांनी केले. तर परिचय ज्योतीताई केसकर यांनी
केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बलभिम पांडव यांनी केले. तर आभार मोरेश्वर मुळे यांनी मानले.