१ मार्च म्हटलं की आदरणीय भानुदास कोतकर साहेब यांचा वाढदिवस आठवला आणि त्यांच्या विषयी कृतज्ञतेचे विचार मनात न कळत येत गेले त्याच विचारांना शब्दांचे पाठबळ देऊन त्यांच्याविषयी काही मनमोकळेपणाने लिहावे असं वाटल.
त्यांच्या कार्यकर्तृत्वाला शब्दबद्ध करण्याचा एक अल्पसा प्रयत्न हेच माझ्या मते वाढदिवसानिमित्त त्यांचे
अभिष्टचिंतन ठरु शकते. कोतकर साहेब खरोखरच एक कणखर प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. साहेबांच्या नावातच
सर्वश्रेष्ठ अशी निसर्गशक्ति दैवीशक्ति प्राप्त आहे. भानु म्हणजे सुर्य. जी सृष्टीतील सर्वश्रेष्ठ शक्ती आहे व
या शक्तीचा दास म्हणजेच भानुदास. आजपर्यंतच्या त्यांच्या प्रत्येक कार्यपुर्तीतून निश्चितच ही दैवी शक्ती
दिसून येते. साहेबांचा जन्म केडगांव येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झालेला असल्याने सुरुवातीच्या
काळात अनेक संकटांना त्यांना तोंड द्यावे लागले. गरीबीचे चटके बसत होते. अशा परिस्थितीतच ऐरणीवरील घाव सोसीत
तावून सलाखून निघत असतानाच एक कणखर आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व घडत गेले. काही माणसे उपजतच
त्यांच्या घराण्यातील वारसानुसार चालत आलेल्या उच्चतेमुळे श्रीमंती व प्रतिष्ठेमुळे मोठेपणा प्राप्त करतात. परंतु काही
माणसे मात्र कुठलाही वारसा घराणेशाही नसताना स्व-कर्तृत्वाने मोठी होतात. कोतकर साहेब हे एक त्याचे मुर्तीमंत
उदाहरण आहे. घरच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षणही अल्पच मिळाले. तथापि भल्याभल्यांना ही मागे टाकतील असे ज्ञान त्यांच्याकडे होते. त्यांच्या प्रगतीची ओळख पाहिली तर अति उच्च विद्याविभूषीत व्यक्तिलाही लाजवेल अशा
प्रकारची प्रगती साहेबांनी केलेली आहे. नेतृत्व, निर्णयक्षमता, उपक्रमशिलता, दुरदृष्टी, सचोटी, अचूकता, वक्तृत्वशैली,
शिक्षणाविषयी जाण, सांस्कृतितेविषयी तळमळ, नियोजन, कोणतेही काम वेळेतच उच्चतम दर्जाचे करण्याचे आग्रह,
तत्परता, हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे गुण आहेत. यापूर्वीच्या कालखंडामध्ये . राजकीय क्षेत्रात
काम करत असताना सर्वसामान्यांचा नेता म्हणून साहेबांची ओळख आहे. राजकीय प्रवास केडगांवमध्ये .
सुरु केल्यानंतर केडगांवमधील . व्यक्तींना जणू मोठा भाऊ मिळाला म्हणून लोक त्यांना भाऊ म्हणून ओळखू लागले. सर्वसामान्यांचा नेता म्हणून साहेबांची ओळख आहे. खेड्यापाड्यातील
तळागाळातील कार्यकर्ते घडविण्याचे,
जीवनामध्ये सक्षमपणे उभा करण्याचे
का त्यांनी केले. साहेबांनी १९८७ साली
केडगांव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून
अऔर ३३ प्रभावीपणे कार्य केले. तसेच
शारिरीक व्यायाम नियमितपणे करणे,
पोहणे, सायकलिंग, तालीम याची आवड
असल्याने स्वतःचे शरीर तंदुरुस्त ठेवून
अनेक मल्ल घडविण्याचे काम त्यांनी
केले.
कोतकर साहेब सर्वसामान्यांसाठी
सकाळी उठल्यानंतर १२ ते १६ तास
काम करायचे. त्यांच्यामध्ये प्रचंड
इच्छाशक्ति, प्रामाणिकपणा, स्पष्टोक्ती,
निर्भिडपणा यामुळे साहेब जीवनात
यशस्वी झाले. गरिबीची जाणीव असल्या
कारणाने कायम तळमळ, अनेक
छोटेमोठे कारखाने, शिक्षणसंस्था, कृषी
उत्पन्न बाजार समिती, महानगरपालिका,
पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या
माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार
उपलब्ध करुन दिला.
कोतकर साहेबांच्या राजकीय
प्रवासामुळे केडगावचा विकास झाला.
केडगांवचा पाणी प्रश्न, रस्ते, ड्रेनेज,
स्ट्रिटलाईट, अनेक समाजोपयोगी
कार्य केल्याने केडगांव विकसित झाले.
केडगांव हे महानगर पालिकेत गेल्यानंतर
कोतकर साहेबांनी नगरसेवक आणि
आपले चिरंजीव संदिप यांना महापौर
असताना केडगांवला
प्रगतीपथावर नेले.
केडगांवचे कोथरूड
करण्याचे स्वप्न
साहेबांचे होते.
त्याच दृष्टीकोनातून
अल्पावधीतच .
केडगांवला विविध
विकास योजना
आणून आज
केडगांव मध्ये
जागेचे दर अनेक
पटीने वाढले आहे.
तसेच केडगांव मध्ये
गोरगरिबांना कर्ज
उपलब्ध होण्यासाठी भैरवनाथ पतसंस्था
स्थापन केली. गोरगरिबांच्या मुलांना
शिक्षण मिळावे यासाठी त्यांच्या मनात
शिक्षणाविषयी तळमळ होती. १९९३
मध्ये भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीची
स्थापन करुन भाग्योदय माध्यमिक व
उच्च माध्यमिक विद्यालय, केडगांव, तसेच
प्राथमिक विद्यालय, इंग्रजी माध्यमाचे
विद्यालय सुरु करुन ज्ञानदानाचे
पवित्र कार्य चालू आहे. या शिक्षण
संस्थेच्या माध्यमातून शिक्षणांची गंगा
घरोघरी पोहचविण्याचे काम साहेबांच्या
माध्यमातून होत आहे. पंचायत समितीचे
१९९६ साली उपसभापती असताना व
त्यानंतर सभापतीपद मिळाल्यावर नगर
तालुयातील अनेक गावांत विविध
विकास योजना राबविल्या. घरकुल
असतील, रस्ते, बंधारे, पाझरतलाव,
जि.प.शाळा, आणि प्राथमिक आरोग्य
केंद्र या माध्यमातून कार्य केले. तसेच
कृषी उत्पन्न बाजार समिती, अ.नगर येथे
संचालक पद ते सभापती असा प्रवास
केला. आणि कृषी उत्पन्न बाजार समि
तीमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणला.
केडगांव बायपास येथे ६७ कोटी रुपये
खर्चून नेप्ती उपबाजार समिती सुरुवात
करण्यात आली.
हॉटेल व्यवसाय कसा करावा याचे
मूर्तीमंत उदाहरण कोतकर साहेब आहेत.
१९८१ साली हॉटेल लोकसेवा नावाने
एक छोटासा ढाब्याची सुरवात करुन तेथे
२५ पैशात चपाती, १ रुपयात भाजी,
देण्याचे काम त्यांनी केले. जेवणाची चव
त्यामुळे ग्राहक आकर्षित झाले. लोकांची
सेवा लोकसेवा हा भाऊंचा विचार. हाच
विचार पुढील हॉटेल व्यवसायामध्ये
प्रगतीपथावर घेऊन गेला.
केडगांव, अहमदनगर, पुणे
शहरात खाद्य संस्कृतीमध्ये मानाचा
पुरस्कार प्राप्त करणारे, महाराष्ट्रतील
खाद्य संस्कृतीचे सुपरस्टार हे साहेब
आहेत. क्वॉलिटी, विनम्र सेवा, स्वच्छता
यामुळे संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावणारे
त्यांचे हॉटेल आहेत.
कोतकर साहेब यांनी आजारावर
मात करुन यशस्वी जीवन जगले आहेत.
आजही साहेबांमध्ये कमालीची शिस्त
आहे. साहेबांचे व्यक्तिमत्व वज्राहून
अधिक कठीन वाटत असले तरीही
त्यांच्या हृदयात मायेचा ओलावा निश्चित
आहे. त्यामुळेच त्यांच्याविषयी मनात एक
आदराची भावना निर्माण झाल्याशिवाय
राहत नाही. साहेबांकडे कुठल्याही
विद्यापीठाची डिग्री नसताना उत्तम
मॅनेजमेंट कसे करावे त्याचे उदाहरण
म्हणजे कोतकर साहेब. पंढरपूर येथे
धार्मिक वारसा टिकवण्यासाठी भैरवनाथ
देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून भव्य
वारकरी भवन निर्माण केले. केडगांवमध्ये
अनेक देवालय उभारण्याचे काम केले.
कोतकर साहेबांनी सामाजिक,
राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, शेती,
उद्योग, व्यवसाय या क्षेत्रातील केलेले
कार्य छायाचित्रासह या पुस्तकामध्ये
आम्ही मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत.
थोडयात कोतकर साहेबांचे जीवन
चरित्र यामध्ये आपणासाठी प्रकाशित
करीत आहोत. त्यांच्या जीवनातील
दुर्मिळ अशी माहिती व फोटो उपलब्ध
करुन हे पुस्तक तयार करीत आहोत.
आपणास हे नक्कीच आवडेल ही अपेक्षा.
साहेबांच्या जीवनातील अनेक प्रसंगाचे
साक्षिदार आम्ही आहोत. साहेबांविषयी
कृतज्ञतेचा भाव व्यक्त करुन त्यांना
वाढदिवसांच्या शुभेच्छा देऊन म्हणावेसे
वाटते आप जियो हजारो साल, साल के
दिन हो पचास हजार आदरणीय भाऊंना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..